Wednesday, 30 January 2019

30 जानेवारी : नेत्र उन्मीलन दिवस


मित्रांनो आज देशाचे अर्धमान्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्मृती दिन. गांधी नावाचं वादळ सहस्र वर्षे गाजतच राहणार आहे. पण सत्य काय नि असत्य काय याचा पूर्वाग्रह सोडून घेतलेला राजहंस पद्धतीने घेतलेला आढावा.


हा देश न्यूनाधिक 1000 वर्षच्या गुलामी चा बळी ठरला होता. तेव्हा इंग्रज आले. हळूहळू पसरले गोड बोलून अधिकारी झाले.
आणि यात महाराष्ट्र सोडून अन्यांचा अधिक सहयोग होता. मोगलाई ओसरून फिरंगीयत यायला मराठा व शीख सत्तेच्या व्यतिरिक्त अन्य भारतीयांचं संपलेलं क्षात्रतेज सर्वात जास्त कारणीभूत आहे. थोरल्या छत्रपतींनी गादीवर आल्यापासून फिरंग्यांची चाल ओळखली व मराठ्यांनी 250 वर्ष हजारदा जस जमेल तसं हे इंग्रज थोपवून धरले. ब्रिटिश सत्तेत यायच्या आधी
मोठी मराठा -इंग्रज 1,2,3 अशी युद्धे झाली . शिखांशी युद्ध झाले मराठे 2 युद्धे जिंकले व तिसऱ्यांदा हरले.

 8  टक्के मराठी व 2 टक्के शीख लोकसंख्या शेवटी किती पुरणार होती संपूर्ण भारताला कारण या व्यतिरिक्त अन्य कोणतीही भारतीय सत्ता अस्तित्वात नव्हती जी भारतासाठी लढेल. जसं मराठा इंग्रज युद्ध इतिहासात आहे तसे बिहारी इंग्रज युद्ध का नाहीय?इंग्रज तामिळी हिंदी युद्ध का नाहीय? कारण हे कि भारताचं क्षात्रतेज पूर्णतः संपलेलं होतं. भारत  अंधश्रद्धा परंपरा जातीयता स्वत्वाच्या अस्तित्वाचा अभाव व महाराष्ट्र पंजाब सोडून अन्य भारतीय हे बनियवादी गोडबोल्या भिक्षुक शाही च्या मानसिक दास्यत्वाचा भाग बनलेले होते. जे दास्यत्व धर्माच्या नावे लादले गेले होते. यात 100 टक्के (मराठी शीख) सोडून अन्य भारतीय लोकांचा विशेषतः अन्य भाषीय क्षत्रिय समाजाचा दोष होता.अशा परिस्थिती मध्ये इंग्रजांनी विवेक स्वत्व हरलेल्या भारतीयांनाच हाताशी धरून देश हडपला.



आणि मग सुरु झालं इंग्रजांच्या विरोधी युद्ध 1885 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नावाची संघटना स्थापन करण्यात आलं.खरं तर ही संघटना पण ब्रिटिशांनी च अदृश्य स्वरूपात बनवली होती.त्यांचा मागून हात होता. सुरेंद्रनाथ बनर्जी ते लोकमान्य टिळक 1920 पर्यंत हि संघटना बरोबर भारतीयांच्या काही प्रमाणात जगलेल्या क्षत्रतेजाच्या मार्गाने चालत होती पण 1920 ला टिळकांची संदिग्ध स्थितीत हत्या झाली व मोहनदास गांधी नावाचे एक गोडबोले व्यक्तिमत्व काँग्रेस चे अध्यक्ष झाले. इथूनच  भारत किमान 1000 वर्ष स्वतःच्या व्यवस्थांचा गुलाम ठेवण्याच्या ब्रिटिश हेतूला साध्य होण्याचे काम सुरु झाले व फळले.



युरोप ने जगावर सत्ता का गाजवली व आजही आर्थिक राजकीय दृष्ट्या युरोप अमेरिकेची सत्ता जगावर का आहे माहितीय? युरोप विशेषतः इंग्लड कधीच अविचारी युद्ध करणारी जमात नवहती त्यांनी कायम ज्यांच्यावर अधिकार गाजवायचा आहे त्यांचा विशेषतः त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला व नन्तर गुलामी लादली. भारतात सत्ता मिळूनही लोक विरोध करतच होते म्हणून एक असं व्यक्तिमत्त्व स्वतःचा विरोध करणाऱ्या संघटनेला त्यांनी आणून दिले जे व्यक्तिमत्त्व फार गोडबोलून लोकांवर अक्षरमोहिनी टाकणारे होते.आपले बापूजी.



गांधींनी काँग्रेस हातात घेऊन जहाल गट च सम्पवला तत्कालीन अशिक्षित मागास भट भिक्षुक शाही बनियवादाला बळी सहज पडू शकणारा हिंदू समाज विशेषतः गंगे काठचा भारत शब्दांनीच गुलाम केला परदेशी आक्रमकांना 2000 वर्ष हाकलून लावणारा क्षात्रतेजाचा भारत स्वतःच्याच माणसाच्या मोजक्या शब्दांनी गुलाम झाला. इंग्रजांना तरी बंदुका लागल्या पण इथल्या गोडबोल्या बनिया लोकांनी राम कृष्ण या क्षत्रिय आस्थांचं अमर्याद बनियाकरण करून इथल्या इथेच करोडो लोक दास केले.आणि मनमुराद खेळ मांडला शोषणाचा. 




Gandhi
Diluted the spirit of freedom amongst Hindus .
He did psychological Subversion of Crores of Hindus who are so numb and still dumb to realize the Truth of their own Dharma Shastra National identity... Their own philosophy he made them to forget forever.



मी पहिला परिच्छेद गांधींच्या जन्माच्या आधीची हजार वर्षे भारताची पार्श्वभूमी का मांडली? लक्षात आलं का?
गांधी हा एक माणूस नाही एक (अ)विचार आहे जो इथे का रुजला याच कारण आहे की 1000 वर्षात मराठी पंजाबी सोडून 90 टक्के भारतीयांचं क्षात्रतेज कधीच संपलेलं होतं. धनुष्याने रावण वधणारा राम, सुदर्शन चक्राने दैत्य विनाश करणारा कृष्ण व असेच अन्य सर्व हिंदू आस्थेचे प्रतीक क्षणात विसरून अगदी त्यांच्याच नावाने एक झापड एक गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करा अशी शिकवण हिंदूंनी स्वीकारली. का?



जी समाज खूप अशिक्षित व मागास झालेला असतो तो असाच गुलाम बनतो.गांधी आजही मेला नाही तो आजही हिंदूंच्या संपलेल्या क्षत्रतेजाचे प्रतीक आहे. हिंदू सत्तेत येऊनही अति सहिष्णू आहेत, जगात 4थी मोठी सेना असूनही चारिकडून आक्रमण सहन च करतोय आपण या राजकीय क्षात्रतेजाच्या अभावाचे कारण बनून गांधींचं उभा आहे. हिंदूंमधली अति सहिष्णुता पुरोगामित्व हे हि याच गांधीवादाची देणगी आहे.
ब्रिटिश गेले पण भारताला लुटणारे सत्ता तंत्र कायम ठेवून, गेल्या 70 वर्षात करोडो हिंदू संपले ज्याचा स्वतः हिंदूंनाच हिशोब माहित नाही माहित झाल्यास मान्य नसतो.धर्माच्या नावावर तथाकथित संत पुजार्यांनी खूप नुकसान केले देशाचे जे आजही सुरु आहे. पण महाराष्ट्र लढला हिंदूंना जागवून आजही उभा आहे स्वतःचे सरणारे अस्तित्व विसरून हिंदुत्वाच्या भगव्यासाठी कायम निश्चल मंदार मेरू सम .


गांधी चांगला कि वाईट हा आज प्रश्नच नसावा. सत्य काय आणि असत्य काय ते च कळलं तर पुरे.
आज 70 वर्षात हिंदू जागे झाले आता 2 ऑक्टोबर ला शास्त्रीजी जास्त असतात सोशल मीडियावर.थांबा थोडं आणखी लोक जगातील.


जे लोक म्हणतात गांधिंमुळे करोडो लोक मारले गेले मला त्यांना विचारायचं कि हे करोडो क्षत्रतेज ज्या भागात नाहीत त्याच भागात का मारले गेले? त्यांच्या क्षात्रतेजाच्या अभवाच काय? त्यांचा दोष नाहीय का? 5 टक्के मुस्लिम कट्टरतेने 25 टक्के होऊ शकतात तलवारी गाजवणाऱ्या दुर्गा भवानीचा धर्म मानणारे हिंदू का ओसरत जातायत??



त्या 1947 च्या हत्या ज्या बघून नथुराम चे मन व्याकुळ झाले त्यांचा दोष गांधींच्या आधी आणि जास्त अफगाण ते ढाका या पट्ट्यातल्या हिंदूंच्या संपलेल्या क्षात्रतेजाचा आहे.
मराठी माणूस ज्या साठी लढतोय ते कालही अन्यांमध्ये नवहते आणि आजही नाही.

शेवटी गांधी भारतीयांच्यातल्या सम्पलेल्या क्षत्रतेजाचं प्रतीक आहे


आज त्यांना दक्षिणेवर त्यांचं व त्यांच्या मुसलमानी भाषेचं आधिपत्य हवंय कुठलंच हिंदुत्व नकोय .
असो।


घाई घाईत खूप क्रम बदलले असतील पण बघा डोळे उघडून
एखादा समाज खूप काही हरवून बसला असेल तरच एका माणसाचा इतका गुलाम होऊ शकतो कि स्वतःला शत्रूपुढे सम्पवून घेईल पण विरोध करणार नाही.



जय भवानी जय शिवाजी🏹🚩

Wednesday, 26 December 2018

या दैवा या नशीबा


जेव्हापासून मनुष्य समाज अस्तित्वात आला दैव,भाग्य आलंच तसेच सुदैव आणि दुर्दैव हेही आलंच. काही चांगलं झालं आयुष्यात तर ते सुदैव म्हटले जाते आणि वाईट घडलं तर दुर्दैव पण खरचं हे दैव सुदैव दुर्दैव असतं का हो? कि हाताच्या रेषांपेक्षा हाताने केलेलं प्रत्यक्ष काम च भविष्य ठरवत असतं? बरेच लोक असं म्हणतात दैवावर विश्वास ठेवून काय होते काही ठिकाणी प्रत्यक्ष देव च होऊन बदल घडवावा लागतो मग तो आत्मिक असो अथवा सामाजिक ! 


म्हणजे दैव आपल्या हातात असतं का हो? कि ते अदृश्य असतं येणाऱ्या प्रत्येक क्षणातून व्यक्त होणारं असतं. हा शब्द सुद्धा देव या शब्दापासून आलाय म्हणजे कोणीही न पाहिलेला पण असलेला तो राघव तो मयुरेश तो हरी आलाच इथे मग त्यासोबत पाप पुण्य सुद्धा आलंच कि.
शेवटी माणसाचं कर्तृत्व हेच येणार काळ सुदैवी कि दुर्दैवी याचा निकाल देत असतं पण कधी यापेक्षा भिन्न देखील घडत असतं जे अथक प्रयत्न करूनही प्राप्त होत नाही. तिथे मग दैव आड आलं असं म्हणतो आपण नाहीतर कधी काही जमलं नाही तर दैवावर सोडून द्या असेही म्हणतो. आणि एक मस्त म्हण आहे "या दैवा या नशीबा" पण यातलं नेमकं सत्य काय याचा सांगोवा घ्यायचं ठरवलं तर हाती काही मिळेल का कि हि गुंतागुंत वाढतच जाईल ? तरीही आज ठरवलचं काहीतरी निष्कर्ष काढायचा याचा!
एक खरे उदाहरण घेतो . एखाद्या मुलाला परीक्षेत पुढचा मुलगा हुशार असला तर चांगले मार्क येतात तर एखाद्याला स्वतः खूप अभ्यास करूनही स्वबळावर लढुनही तेवढे मार्क मिळत नाही.


मग यात कर्तृत्व हरते आणि दैव जिंकते आणि जो जिंकतो त्यासाठी ते सुदैव ठरते पण अभ्यास करूनही यश न मिळणारा मात्र दुर्दैवाचा बळी ठरतो.
आता आपली मुंबई च बघा ना छत्रपतींच्या काळापासून आपली आहे पण 1960 ला ती महाराष्ट्राला मिळूच नये असे घाट बांधले गेले पण आपण जिंकली मुंबई पण तरीही भरपूर संख्येत असलेले गुजराती जमिनी व आर्थिक साम्राज्यवाद सोडायला तयार नाही.गेल्या 70 वर्षात कोट्यवधी उत्तर भारतीय व अन्य राज्यातून लोक आले पण तरीही मुंबई मराठी माणसांनी राखली अगदी 2017 च्या लहरीत सुद्धा  हे आमचं कर्तृत्व च म्हणावं  लागेल.पण आमचेच लोक तिथल्या गुजराती व उत्तरीय लोकांना भडकवून आमच्याच हातातून आमचं राज्य जावं असा प्रयत्न करतात हे ह्या सह्याद्रीचं किती मोठं दुर्दैव ! 



ज्या मुंबई ने   सर्व जातभाषिय धार्मिय लोकांना करोडो च्या संख्येत स्थान दिलं त्यांनी मात्र मुंबई या काय दिलं? भाषेच्या आधारावरील मतदारसंघ , जमीन घर नोकरी हवा पाणी सर्व मुंबई नि दिलं पण तिची भाषा इतकी अस्पृश्य वाटावी कि चक्क मतदारसंघ तयार करावेत हेच दुर्दैव!
अन्य राज्यात येऊनही एका वेगळ्या भाषा संस्कृतीचा ज्ञानकोश मिळत असतानाही तो प्राशन करता न येणे हे दुर्दैव .


आजही अवघ्या भारताला मुंबई मराठी लोकांची आहे हे मान्य नाहीय पण एवढं घुसनही ती आमचीच आहे.
बेळगाव च हि तसेच गेल्या 70 वर्षांपासून बेळगाव महानगर पालिका कर्नाटकात असूनही मराठी भाषिकांच्या समिती च्या नगर सेवकांच्या हाती आहे.या 7 दशकात आमचं बेळगाव खूप विस्तारलं. अन्य भागातून लोक आलीत लाखो च्या संख्येत शिवाय कानडी सत्तेनी कन्नड लोकसंख्या वाढावी याचा पुरेपूर प्रयत्न केला Uपण तरीही बेळगाव मध्ये सत्ता आपलीच आहे.हे झालं कर्तृत्व पण बेळगाव चा खटला तब्बल 50 हुन अधिक वर्षांपासून सर्वोच्चं न्यायालयात खितपत पडून आहे आणि म्हणून  आजही ते कर्नाटकात च आहे हेच दुर्दैव.



3 दिवसाधीच लिहिलेला हा लेख अपूर्णच वाटत होता.एक काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत होतं. कालच तसं घडलं.लेखाच्या पूर्णत्वाची हुरहूर हि आयुष्यभर मनाला छळणारी एक हुरहूर बनून जाईल असं वाटतं नव्हतं.
आयुष्यात लहानपणापासून असं कोणी असत कि जे आई बाबा पेक्षा जास्त जवळचं वाटतं. कारण तेवढा लाड केला जातो आपला त्या व्यक्तीकडून.जुने लोक खूप प्रेम करायचे आता नाही राहील तसं. आजवर अशी एकच व्यक्ती आयुष्यत आली जिने निस्वार्थ प्रेम केलं. मी पण खूप जीव लावला मी दूर म्हैसूर ला आणि ती आजारी नागपूरला .2 तारखेला भेटून आलेलो मी तेव्हा पण स्वास्थ्य  ठीक नव्हातंच पण 27 ला डॉक्टरांनी सांगितले फक्त 24 तास शेवटचे. मी सर्वात दूर तिचा सर्वात जास्त जीव माझ्यात पण मला कोणीही कळवलं नाही. Wstapp वर कळलं 28 ला रात्री ती गेली.खूप आटापिटा करूनही म्हैसूर ते बंगलोर व मग नागपूर अशा प्रवासाला दुपारी 4 पन्नास चं विमान मिळालं. 7 पर्यंत नागपूरात घरी आलो पण तोवर मला कवटाळणारे ते हात,जे म्हणीन ते आणि जेव्हा म्हणजे अगदी रात्री 2 वाजता पण शिरा म्हटलं तर शिरा करून देणारा तो वात्सल्याचा मूर्तिस्वरूप देह काष्ठग्नि मध्ये जळून खाक झाला होता. कायमचा मला न दिसण्यासाठी .एखादी व्यक्ती दिसूच नये कायमची असे दुःख नाही आणि त्यास शेवटचं आपल्याला बघता येऊ नये हे सर्वात मोठं दुर्दैव. दिवसाला प्रत्येक क्षणी कधी डोळ्यातून तर कधी मनातून फक्त आसवे देऊन गेली ती. माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं  दुर्दैव हेच आहे.😭


शेवटी सत्य हेच आहे की कर्तृत्ववान असायलाच हवं पण नेहमी कर्तृत्व अथवा कर्म तुमचं सुदैव अथवा यश ठरेल असं नाही. 
या दैवा या नशीबा हेच अंतिम सत्य.

Sunday, 2 December 2018

मराठा आरक्षण : एक मृगजळ


नमस्कार...!
मित्रांनो आपल्या विधानसभेने नुकतेच मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाचे विधेयक पारित केले आणि सोशल मीडिया म्हणजे सामाजिक माध्यमांमध्ये महाराष्ट्राच्या क्षमस्व उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यावर अक्षरश: शुभेच्छांचा पाऊस पडला अथवा पडला गेला.
एखादी गोष्ट ट्रेंड कशी करायची हे बनिया मानसिकतेला ठाऊक असते आणि ते त्यातच निष्णात असतात. शेवटी सामान्य जनतेस बनवणे हेच राजकीय जमातीचं मुख्य उद्देश असतं. आपण बनवलो जातोय याची तिळमात्रही जाणीव नसते.


आरक्षण दिलं याचा असा इतका उदो उदो केला गेलाय कि जणू स्वर्ग अवतरलाय पृथ्वीवर! मुळात साडेचार वर्ष केंद्राचे आणि 4 राज्याचे एकच सत्ता असताना इतका वेळ का लागला व हि आरक्षणे फक्त घोषणा पुरती निवडणुकांच्या तोंडावरच का दिली जातात? त्याआधी का नाही? आधीच्या सरकारने सुद्धा असेच केले.


सध्याच्या मराठा आरक्षणाचा सोपा अर्थ हाच आहे की हे एक आभासी जळ आहे मृगतृष्णा सारखं. कारण राज्यघटना फक्त सामाजिक मागासलेल्या समाजास आरक्षण असावे अश्या सिद्धांतावर आधारलेली आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकणे अवघड आहे. कारण क्षत्रिय असलेला मराठा समाज हा गेल्या
कालखंडात मागे पडलाय. तो सत्ता प्रस्थापितांमुळे ऐतिहासिक काळात छळला गेलेला नाहीय त्यामुळे न्यायालय हे आरक्षण तामिळनाडू सारख्या धरतीवर मान्य करेल असं वाटत नाही. उच्च न्यायालयाने मान्य केले तरी सर्वोच्च न्यायालय ते मानेलच असं नाही.
आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे समजा हा 16 टक्क्याचा पांढरा कावळा दिसलाच तरी तो कितीसा लाभ देईल?


आकडेवारी अथवा संख्याशास्त्र अज्जिबात लक्षात न घेता अंदाधुंद पणे सरकारे सत्ता राबवत अथवा लुटत  असतात आणि सामान्य भोळीभाळी जनता देखील अशा अर्थहीन निर्णयास बळी पडते.


आता तर्कशुद्ध प्रमाणे संख्या अथवा आकडेवारी बघुयात.
मित्रांनो महाराष्ट्रात सरकारी क्षेत्रात एकूण 18 लाख पदे आहेत त्यातील साडे पाच लाख पदे स्वयंचल अथवा automation
मुळे या परकीय सत्तेने कायमची बंद केलीत म्हणजे आता केवळ 12 लाख सरकारी पदे आहेत त्यातील बहुतेक पदे आधीच भरलेली आहेत. शिवाय जी पदे रिक्त आहेत ती पैशाअभावी गेली 8 वर्षे भरली गेली नाहीयत. आता मामु ने 72000 पदे भरण्याचे आश्वासन दिलेय ते अजूनही प्रत्यक्षात उतरलेले नाही.

आणि हो यातही अट हि आहे की फक्त तोकड्या 5000 रुपयांवर 72000 तब्बल 3 वर्षे लोकांना काम करावे लागणार  आहे आणि त्यांनंतर त्यातील फक्त 12 ते 15 टक्के लोक कायम अर्थात पर्मनंट करण्यात येतील आणि सध्याच्या वेतन श्रेणि अथवा pay scale नुसार त्यांना पगार दिला जाईल.
याला लूट नाही म्हणायचं तर काय?


सरकारी आकडेवारी नुसार महाराष्ट्रात 42 लाख पदवीधर बेरोजगार आहेत. हा आकडा 2 वर्ष जुना आहे म्हणजे आताशी 50 लाखावर गेला असेल हा आकडा!
72000 हे एकूण बेरोजगारीच्या अवघ्या सव्वा टक्के पदे आहेत तेही 5000 रुपये पगार तीन वर्षे नन्तर termination म्हणजे संपुष्टात आणले जातील. मुळात प्रश्न हा आहे की सरकारी क्षेत्र हे अवघे 1 टक्का पदांचे आहे तरीही त्यामागे आजही भारतीय जनता एवढी का भरवशाने मागे जाते अगदी आंधळ्या पणे हेच कळत नाही! सरकारी पदे अवघे असताना त्याच्या 100 पट लोक आवेदन  करतात आणि त्यातले 90 टक्के छाटले जातात. पैसे जातात रे वेगळे.


आपण सर्वच भारतीय गेली 70 वर्ष कायम सरकारी नोकरीच्या मागे येड्यासारखे धावतोय. फक्त गुजराथी मारवाडी जैन पंजाबी सिंधी पारशी आणि झुंडीत घुसणारे उत्तरीय लोक सोडून.


महाराष्ट्र देशातले सर्वात औद्योगिक दृष्टीने प्रगत राज्य आहे. दिल्ली सरकारची 25 टक्के तिजोरी एकटा महाराष्ट्र भरतो.
भारताच्या अर्ध्या लोकसंख्येची अथवा राज्यांचे वार्षिक बजेट
आपण देतो मग तरीही राज्यकर्ता मराठा समाज मागे का?
मागे सांगितल्याप्रमाणे 1 टक्के सरकारी क्षेत्र आहे म्हणजेच 99 टक्के खासगी क्षेत्र आहे. आणि सुदैवाने एकट्या महाराष्ट्रात देशातील 25 टक्के उद्योग आहेत. किती हे भाग्य पण माहितीये का? या खासगी क्षेत्राला आपण ,आपल्या सरकारने जागा दिल्या राज्यात उद्योगांसाठी सर्वात सुकर मार्ग तयार करून दिला
म्हणूनच सगळं जग सह्याद्रीच्या कुशीत गुंतवणूक करतंय पण सर्वात मोठे दुर्दैव हे कि या 99 टक्के असलेल्या खासगी क्षेत्रात आपल्याच स्थानिकांना नोकऱ्या देण्यात याव्या अशी कुठलीही अट अगदी आधीपासून आपल्या अति सर्वसमावेशक राज्यकर्त्यांनी ठेवली नाही आणि आज त्याचेच फळ आपण भोगतोय. मी हे का म्हणालो हे पुढंच वाचून कळेल.


1960 मध्ये स्थापित झालेला महाराष्ट्र आज वर कायम परकीयांच्या झुंडीचा बळी ठरला आहे. 2011 च्या जनगणनेत मराठी लोकसंख्या अवघ्या 69 टक्क्यांवर आलीय आपण एक तृतीयांश संपलोय पण याची जाणीव च आपल्याला होऊ देऊ नये याचा पुरेपूर बंदोबस्त प्रसार माध्यमे, जातीय व धार्मिक संघटना , पक्ष यांनी करून ठेवलाय.
2001 मध्ये आपल्या राज्यात हिंदी+उर्दू भाषिक 7 टक्के होते ते
2011 मध्ये तब्बल 18 टक्क्यांवर गेलेत म्हणजे 11 टक्के वाढ फक्त 2001-2011 या अवघ्या दहा वर्षात ! टक्क्यांनी सांगायचे तर तब्बल 1 कोटी वीस लाखाच्या जवळपास पर राज्यातून लोक आलेत या दहा वर्षात. एवढे कशे पोसले गेले महाराष्ट्रकडून? आणि स्वतःच्याच समाजाला सर्वात जास्त शिक्षण संस्था व उदयोग असलेले राज्य आरक्षण मागावयास भाग पाडते किती हा राजकीय जमातीचा हरामीपणा!
आजवर परप्रांतीयांना न रोखणार सरकार होते आज त्यांना गोंजारून स्वतःची शाश्वत मतपेटी बनवणारे भाट सत्तेत आहेत.


12 कोटी च्या महाराष्ट्रात तब्बल 4 कोटींच्या वर अमराठी लोक आजमितीला राहतात. दोन छत्तीसगड अथवा दोन विदर्भ इतकी लोकसंख्या अन्यांची पोसली गेली अथवा घुसली म्हणून सुविधा व नोकऱ्यांवर ताण पडलाय.


आजही दिवसाला हजारो नोकऱ्या राज्यातल्या खासगी क्षेत्रात निघतात पण त्या इथल्या मूळच्या लोकांना का मिळत नाहीत याच उत्तर कोणीही देत नाही उलट हा प्रश्नच कोणी विचारत नाही. विचारला मी कि मला इंजिनाचा रिकामा डब्बा किंवा कृष्णकुंज चा समर्थन म्हणून हिणवले जाते पण स्वतः च्याच राज्यात रिकामे होतोय आपण संख्येने आणि खिशानेही याची जाणीव नाहीय आपल्याला। असो


मराठा व अन्य मराठी बंधूंनो खासगी क्षेत्रात कर्नाटक केरळ उत्तर प्रदेश सारखं 80 टक्के स्थानिक भाषा येणारेच असावे असं विधेयक जोवर महाराष्ट्रात येत नाही तोवर बेरोजगारी व गरिबी हे प्रश्न सुटणार नाही. आरक्षण मिळूनही ते एक टक्का नोकऱ्यांसाठी असेल. खासगी क्षेत्रात मराठी भाषिकांना आरक्षण हेच समाधान आहे. बघा आज तरी जात धर्म उजवे डावे अविचार सोडून महाराष्ट्राचा विचार करणार का?


आकडे अभ्यासा तर्क शुद्ध अभ्यास करा मग कळेल.इथे अन्यांमुळे अस्तित्वच संपतंय.
🚩🚩🚩

Friday, 28 September 2018

Invention Of Reliable source of electricity By Ancient Indian Scientist Agasti Rishi.

Invention Of Reliable source of electricity By Ancient Indian Scientist Agasti Rishi.

 विद्युत उत्पत्तीचा शोध : वैदिक वैज्ञानिक अगस्ती ऋषी

Danielle Cell In ancient Indian Way.


"त्वम् ज्ञानमायो विज्ञानमयोसि" असे एक वाक्य अथर्व शीर्षात आहे. विज्ञान हा शब्द आणि त्याचा सुयोग्य अर्थ  आदिकाळापासून भारतीयांना ज्ञात होता. आपले सर्व ऋषी हे वैज्ञानिक च होते. जुने संस्कृत
ग्रन्थ हे विज्ञाचा खजिनाच आहे।
आज आपण विद्युत उत्पत्तीच्या शोधाबद्दल माहिती घेणार आहोत. हजारो वर्षांपूर्वी एक महान ऋषी होऊन गेले त्यांचे नाव महामुनी अगस्ती. या ऋषींनी आपल्या अपार तपस्येने जे ज्ञान प्राप्त केले ते अगस्ती संहिता या ग्रंथात सामावलेले आहे.
त्यातील काही श्लोकांनुसार विद्युत उत्पत्तीचा शोध हजारो वर्षी आधीचाच आहे हे सिद्ध होते. त्यातील एक श्लोक ज्याचे विवरण आपण पुढे अर्थसहित बघणार आहोत त्यात श्लोकात विद्युत घटबद्दल माहिती दिलेली आहे. हा असा विद्युत घट नागपूर येथील स्वदेशी विज्ञान संस्था या संघटनेच्या माध्यमातून नागपुरातील प्राध्यापक श्री.प्रशांत होले यांनी प्रायोगिक रीतीने सिद्ध करून दाखविला.


                IN OUR GREAT WAY OF LIFE TO WHICH WE CALL HINDU. RUSHIS AND MUNIS ARE ALWAYS WORSHIPPED.  TECHNICALLY RUSHI MINS SCIENTIST. WE HAVE MANY  SUCH ANCIENT RUSHIS AND ONE OF THEM IS “AGASTI RUSHI”. HIS WOK IS GATHERED IN A BOOK NAMED “AGASTI SAMHITA”. FROM THE MEANING OF SOME SHLOKAS OF THE SAMHITA WE PREPARED AN ELECTRIC CELL CALLED AS “VIDYUTGHATAM”.  IT IS NOTHING BUT THE “DANIEL CELL” WHICH IS A RECENT INVENTION WHEN COMPARED TO AGASTI CELL.  THIS SHOWS THAT HOW SCIENTIFIC OUR ANCIENT INDIA WAS!

Introduction & Construction:  THE SHLOK GIVEN BELOW IS FROM AGASTISAMHITA WHICH HAS THE FOLLOWING MEANING.



“Place a cleansed copper plate in the clay pot. Apply layer of copper sulphate on it. Also scatter sawdust on it. Now place mercury dipped zinc plate on it.” we did the same and the cell is constructed as given below.




Description of Experiment: The two wires are connected through it to the voltmeter then we see that the cell exactly gives voltage of 1.01V. Which indicates the electric presence. we use simple clay pot for it and we added all the material as per the shloka.


The shloka further states that :

 “IF such hundred cells are connected then the electric power dissociate water into oxygen and hydrogen. The hydrogen gas when when filled in gas balloons and they are tied to spacecraft the craft goes upwards due to the lightest hydrogen .Also when this power is subjected to the solution of potash and water then gold and silver plating can be done.  ”

This power is called as ‘SHATKUMBHI’ i.e. SHAT-Hundred & KUMBHI-Pots.


Results And Graphs : Graphs indicates that when the experiment is performed with zinc the internal resistance is half of with amalgam. The cell exactly gives 1.01 Volts.

Conclusion : The cell is very effective. We can firmly say that india is the epicenter of science from ancient period or the complete world had made such inventions in recent 200 years which we knew from thousands of years. The shloka also gives very essential info about lightest nature of hydrogen and flying the spacecraft by using hydrogen gas. Also gas balloons were known to us. Its very useful and admirable work of our rushis which the modern world must be aware of.

{John Frederic Daniell

London, England. A great advance in battery technology was the invention of what came to be known as the Daniell cell, which John Frederic Daniell made public in 1836. It was the first reliable source of electric current.}



हेच संशोधन जॉन डॅनियल ने 1836 साली एका सेल चा शोध लावून केले. ज्याला आधुनिक विज्ञान जगतामध्ये प्रसिद्ध अशा डॅनियल सेल च्या नावाने ओळखले जाते.
वरील माहितीववरून हे सिद्ध होतेच कि भारतीयांना विद्युत शक्तीचा शोध फार आधीपासून माहित होता. हा विद्युत घट विद्युत उत्पत्तीचा विश्वसनीय स्रोत आहे.पण विद्युत निर्मिती साठी पाणी जमीन आदी प्रकृतीचे दोहन होते आणि तेही अचक्रीय स्वरूपाने म्हणूनच असे विज्ञान जे अप्राकृतीक आहे ते आपल्या आदी पुरुषांनी नाकारले.

© Sagar Ghorpade


Thursday, 20 September 2018

हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा।

हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा। 
बरं मग। 
भाग 61



मी: राजे आपणास मनाचा मुजरा। वरून बघताय न ...राजे......? तुमचा महाराष्ट्र ......... तुमची राजधानी ..... आणि....आपल्या महाराष्ट्राची आताची आपली मुंबई ..

जींचा फार अभिमान आहे आपल्याला।

राजे: हं बरं मग


मी: राजे बघा ना आज काय अवस्था झालीय तुमच्या महाराष्ट्राची सर्वत्र हाहाकार आहे। हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत। त्यांना कोणी वालीच उरला नाहीय।

राजे: बरं मग


मी: राजे हेच नाही तर आता हिंदुत्वाचा भगवा फडकवणाऱ्या आपल्या राज्यात भर दिवस शेकडो बलात्कार होतात। जिथे आपण शत्रू च्या पत्नीस देखील आईसाहेब म्हणून साडीचोळी दिली। तिथे असे होतंय राजे।

राजे: बरं मग


मी:राजे तुम्ही बारा बलुतेदारांना एकत्र केलं। भट बामन महार मांग रामोशी तेली तांबोळी कुणबी माली 92 कुळी 96 कुळी। पण राजे आज सगळे तुटले। प्रत्येकाला जात महत्त्वाची झालीय। जातीच्या आधारावर मोर्चे आणि राजकारण होतंय राजे आज। त्यात शेकडो लोकांचे बळी गेलेत राजे। पाण्यासारखा पैसा वाया जातोय। समाजाचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय राजे।


राजे: बरं मग।


मी: राजे एवढंच नाही आपली राजभाषा मराठी ला सुद्धा वाईट दिवस आलेत राजे। परप्रांतीयांमुळे मराठीची पायमल्ली होतेय राजे। आज सत्तेला धोंडा सुद्धा त्यांचाच हस्तक आहे।

राजे:बरं मग


मी: राजे तुमचे किल्ले पडीक अवस्थेत आहेत। रायगडी तर दारू पिण्याचे उद्योग सुद्धा केले काहींनी। त्यांना आम्ही चोपले।

राजे:बरं मग


मी: राजे तुमच्या नावाने मत मागून सत्तेत आलेले लोक तुमचे स्मारक बांधत आहेत अरबी समुद्रात तब्बल 100 कोटी खर्चून। पण तुमच्या रयतेला मात्र अवघ्या 10 हजाराच्या कर्जासाठी आत्महत्या करावी लागतेय।

राजे: बरं मग


मी: राजे नागपुरातल्या शेटजी भटजींनी तुम्हालाही शस्त्र हीन करून देवत्व बहाल करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा विरोध झाला राजे। तुमचे राम कृष्णासारखे बनियाकरण होतंय राजे।

राजे: बरं मग


मी : राजे बारामती तले ख्वाजे स्वतःला जाणता राजा म्हणवून घेतायत तुमची जागा घेऊ पाहतायत ते लुटारू। 

राजे: बरं मग


मी:राजे एक घाणेरडी जमात जन्मलीयं मूठभर लोकांची जी तुमच्या जाजवल्य इतिहासाचे मुडदे पाडत आहे। माहिलांबद्दल अश्लील लिहिते आहे। तुम्हाला मुस्लिम आक्रमकांचे समर्थक ठरवते आहे।

राजे : बरं मग।


मी:राजे आज सर्वत्र शोषण आहे। आमचे दुःख दूर करण्यास तुम्ही परत  या राजे। अन्याय दूर करण्यास परत सह्याद्रीच्या कुशीत जन्म घ्या राजे।

राजे: अरे वेड्या सागरा मी काय फक्त एक माणूस आहे का रे? 

मी एक विचार नाहीय का? एक कर्तृत्वाचं आचरण नाहीय का? मी फक्त ओठीच का रे उरलो तुमच्या। आचरणात का नाही? 

मासाहेबांनि आम्हास कृष्ण राम शिकवले। गीता शिकवली त्यातल्या 12 व्या अध्यायात श्लोक आहे ना 

मय्येव मन आध्तस्व मयि बुद्धिम निवेशय।
निवशिष्यसी मयि एव अत ऊर्ध्वम न संशय:।।
याचा अर्थ नीट समजून घेतल्यावरच मी स्वराजाचा संकल्प केला।

शेवटी राम कृष्णा सारखं शिवाजी हे सुद्धा एक क्षत्रतेजाचं आचरण आहे। 

शेवटी शिवाजी काय आहे रे तुमच्यासारखाच एक मुलगा जो ध्यास घेतो स्वराज्य स्थापनेचा। लढतो जनकल्याणासाठी। 

शिवाजी तुमच्यातच असतो रे तुम्ही आपले अंतरंग झाकून ठेवता त्यात बघ बरं जरा डोकावून
तुझ्यात आणि सर्वात आहेच मी । त्या सुप्त क्षत्रतेजास जागव ध्यास धर जनकल्याणाचा।
तुम्हीच शिवाजी व्हा। घडवा सुखी समाज।


शिवाजी तुमच्यातच जन्माला येईल रे। मी तर फक्त प्रेरणा आहे। तुमचं युद्ध शिवाजी होऊन तुम्हासच लढणे आहे।
असो आम्ही निघतो।

मी:🙏😊🤗 राजे परत भेटा कधीतरी असेच।

राजे: जय भवानी।

मी:जय शिवाजी।
.


Tuesday, 11 September 2018

दहाची नोट....!



स्थळ : पुणे रेल्वे स्थानक

एव्हाना गाडी यायची वेळ झाली होती. सगळे प्रवासी आपला बोगी नं स्क्रीन वर बघून त्या त्या जागी सामान घेऊन धडपड करत जात होते. रुळाच्या पलीकडे लोखंडाचा लांब पाईप होता ज्यातून रेल्वे गाडीत पाणी भरतात तो पाईप. आणि तिथेच लाल रंगाच्या फाटक्या कपड्यात ती उभी होती . पायात चप्पल सुद्धा नाही . त्या दगड गिट्टी असलेल्या रुळाच्या बाजूच्या जागेवर उभे राहावे लागणे तेही अनवाणी हे तिचे आणि तिच्यासारख्या कित्येकांचे दुर्दैव भारताला मिळालेल्या तथाकथित स्वातंत्र्याच्या 7 दशक पुरती नन्तर सुद्धा. ती चेहऱ्यावर सुरकुत्या असलेली , पंचविशीत असूनही चाळिशीकडे झुकलेली दिसत होती जणू अवेळी पडलेल्या पावसाने आमच्या विदर्भातली पराटी कापूस उद्धवस्त केली तशी. कृश आणि दरिद्री अवस्था.


तेवढ्यात गाडी आली माझा डबा एस 1 होता . 15 वी सीट साईड लोवर म्हणतात ना तीच. मी सामान घेऊन आत गेलो आणि बसलो. खिडकीतून सहज बाहेर पहिले असता ती हो तीच त्या रेल्वे मध्ये पाणी भरायच्या पाईप मधून ओंजळीने पाणी पीत होती. आपली तृष्णा भागवत होती. पण आयुष्यात असलेल्या दुर्दैवाचे काय तिला प्रश्न पडला नसेल काय? उणीव पुरुषत्वाची आणि स्त्रीत्वाचीही त्यात नशिबी आली गरिबी , जागोजागी रेल्वे मध्ये टाळ्या वाजवून पैसे मागण्याची वेळ. तरीही तीच हो ना तीच तो नाही म्हणता येत त्यांना कारण वैज्ञानिक दृष्ट्या ते एक्स झिरो फिमेल्स असतात.


अशीच पाणी पिऊन ती माझ्या डब्ब्यात चढली. आणि टाळ्या वाजवून पैसे मागू लागली. मी गाणी ऐकत बसलेलो, माझ्याकडे आली आणि इशाऱ्यात त्या केविलवाण्या चेहऱ्याने पैसे मागितले. मी क्षणाचाही उशीर न करता पाकिटातून 20 ची नोट काढून देऊन दिली. तिने डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. आणि निघून गेली.


 पण मला काही वेळासाठी विचार देऊन गेली जो भावनिक दृष्टीने जन्मभर मला दुःख पर्वताएवढे याची जाणीव देत राहील. मी आपला तेच अंतकरणातल्या देवाला विचारू लागलो देवा असे का असावे रे या लोकांचे नशीब  त्यांना ना पुरुष म्हणून जन्म दिला तू ना स्त्री म्हणून, तृतीय पंथी किंवा किन्नर अथवा (दुर्दैवाने हा शब्द लिहावा लागतोय) छक्का अशी शेलकी संबोधने कायमचीच त्यांच्या नशिबात. समाज बघून हसतो त्यांना. चीड उडवतो त्यांची. त्यांना कामे देत नाही. त्यांची अशी गत केलीय आपण. सृष्टीच्या सृजनाचे प्रतीक शालूका आणि लिंग यांच्या ने बनलेल्या शिवाच्या पिंडीला मानणारा समाज, अर्धनारीश्वर रुपी आदी पुरुषास भजणारा समाज या मानव रुपी देवाचा इतका तिरस्कार का करतो कोण जाणे?

मी याच विचारात होतो तर कोणीतरी डोळयांसमोर 10 रुपयाची नोट धरली मी आश्चर्याने वर पहिले तर काही निमिषांनी परत आलेली तीच होती . आणि तेही 10 रुपये परत करायला आलेली विशाल हृदयी ती. मी दिलेल्या 20 रुपयातले 10 परत करावे किती हा मर्यादा असलेला स्वभाव. स्वतः जवळ काही नसून असलेले ते आचरणातले समाधान. तो विवेक जो धर्माच्या नावाने दुकाने पक्ष फेसबुक पासून नोकऱ्या सुद्धा चालविणाऱ्या लोकांमध्ये नाहीय. तो तिचे ठायी दरिद्री नारायणी रुपात विलसतो आहे. मी 10 ची नोट परत घ्यायला नाही म्हणालो. पण ती ऐकायला तयार नव्हती. ते दहा रुपये डोक्यावर ठेवून म्हणाली ठेव जपून कामात येईल. मला घ्यावीच लागली नोट परत. नमस्कार करून पाकीटातल्या दत्त गुरूंच्या फोटो च्या कप्प्यात ठेवली ती नोट. कायम जपून ठेवेन ती आता. अतिलोभो न कर्तव्य:। हा मर्यादेचा गुरु मंत्र देऊन गेली ती. आणि मी परत दुःखाच्या डोहात एक डुबकी मारून आलो.

असो ।

Tuesday, 4 September 2018

कृष्ण....!

कृष्ण

लहानपणी आपल्यासारखा एक छोटू बाला आपल्याला घरच्या  देव्हाऱ्यात बसलेला दिसतो. टकलू आणि नंगु असतो तो मग त्याला रोज आंघो ळ घालून मस्त अष्टगन्ध लावून छान मऊ कपडे घालून पाळण्यावर बसवताना सगळे आपण मोठे झालो पण तो कृष्ण आजही तितकाच आणि तसाच आहे तेवढाच गोंडस निरागस मोठे डोळे सगळीकडे फिरवून बघणारा सर्वांना आकर्षणारा द्वारकधीश कृष्ण. स्वतःचे नाव सार्थकी लावणारा एकमेव देव म्हणजे कृष्ण लक्ष्मी ची पूजा करा ती सर्वांना प्राप्त होत नाहीं. पण कृष्ण म्हणजे काळा नाही. कर्षती आकर्ष यति स: कृष्ण:. आकर्षणारा तो म्हणजे कृष्ण. तो आकर्षून ठेवतोच .



घरी लोणी काढलं कि पहिला वाट त्याचाच एक बाळ नेहमी सर्व घरात असते ते म्हणजे कान्हा। ज्याला त्याची आई दोऱ्यात बांधून ठेवू शकली नाही. तो कृष्ण ज्याने ब्रह्मांड स्वतःच्या सामर्थ्याने बद्ध केले तो कृष्ण हे लिहितांना माझे मन दास्यत्वात गेलय त्याच्या कारण तो कैवल्य देणारा मुकुंद आहे. पूर्णावतार आहे योगेश्वर आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्रेमाचा देव कुठला असेल तर तो हा प्रेमातून शाश्वत सुख देणारा राधावल्लभ.

सुनीतीचा महामेरू आणि चंचलतेचा कारक. सत्य आणि त्रेता युगातून मृत्यू लोकांस नवे तत्वज्ञान देणारा दार्शनिक. अगाध प्रेम शिकविणारा कायस्थ , भौतिक जगात शांती स्थापविणारा क्षत्रिय आणि अद्वैताचं ज्ञानामृत पाजणारा विप्र, परसावी च्या हातून केळाची साले खाणारा शूद्र आणि चातुर्वर्ण सृजन करणारा चतुर्भुज श्रीहरी. जिथे मन त्याच्या श्वासातल्या बासरी तुन निघणाऱ्या वृंदावनी सारंगाला कायमचे वश होते असा मुरली मनोहर.  सगळे राग त्याचे ख्याल, प्रेमाची गीते, शृंगार म्हणजेच कृष्ण. नीर भरन कैसे जाऊ सखी अब या टिलक कामोद रंगापासून ते बन बन ढुंढन जाऊ या वृंदावनी सारंग पर्यंत प्रत्येक राग त्यालाच वाहिलेला आहे.



धर्मवार कायम तटस्थ असणारा निश्चल आणि धर्मासाठी रणांगण पळून जाणारा रण छोड अन्यांस हसवून मग त्यांचे हसे करणारा हा महायोद्धा. ऐहिक सुख दुःखाच्या वर शाश्वत सुख प्रदान करणारा केशव गलीमल हरण नाम. गोपिकाप्रिय रासरसेश्वर तडत ध्वीती.

बस यापुढे केवळ कृष्ण कृष्ण आणि कृष्णच.

©Sagar Ghorpade