Sunday 26 August 2018

भगवा दहशतवाद :An engineered conspiracy........

हा लेख प्रत्येक भारतीयाने निक्षून वाचावा। उद्या आपली मुले आतंकवादी ठरवली जाऊ शकतात।



शरद पवार या माणसाशिवाय महाराष्ट्रात एक पानही हलू शकत नाही असा एक सार्वत्रिक समज आहे. झालेला म्हणा, हेतुपुरस्सर करविलेला म्हणा...पण या माणसाला चर्चेत रहायला आवडतं हे खरं...माणुस तसा चलाख आणि जात्याच हुशार!
रावण, कर्ण, कंस, दुर्योधन, मिर्झाराजे जयसिंग हे सर्वही नव्हते का हुशार! अगदी तसाच! फ़रक फ़क्त आपण आपली निष्ठा कुठे वाहतो त्यावर पडत असतो...
या सर्वांनी आपापल्या निष्ठा सत्याच्या शत्रूंच्या चरणी वाहिल्या आणि इतिहासात ते खलनायक म्हणून अजरामर झाले. नमनालाच हे घडाभर तेल ओतण्याचे कारण पुढचे नाटक मोठे व गंभीर आहे... लक्ष देऊन वाचा...१००% लक्ष इकडेच असूद्यात...
जगात इस्लामी दहशतवाद अमेरिका व सोव्हियत रशियानेच जागा केला असा एक सार्वत्रिक भ्रम पैदा करण्यात एव्हाना कम्युनिस्टांना अर्थात डाव्यांना पुरेसे यश आलेले आहे. स्वत:ला बुद्धीमान समजणारे अनेक बुद्धीजीवी यावर तावातावाने बोलून तुम्हाला गप करतील! परंतु तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांचा अनुभव मात्र पराकोटीचा वेगळा असतो! आणि अनुभव हा तर सर्वात जवळचा गुरु आहे!
मुघल, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा, इमादशहा, बरीदशहा या सर्वांनी भारतात ७०० वर्षे घातलेला धुडगूस हा इस्लामिक दहशतवादच होता, याकडे हे पुरोगामी जाणीवपूर्वक काणाडोळा करतात. तरीदेखील स्वातंत्र्यानंतर भारतात झालेला पहिला दहशतवादी हल्ला म्हटलं तर दाऊद इब्राहिम या मुसलमानाने घडवून आणलेले मुंबईतील साखळी बॉंबस्फ़ोट...


यानंतर आजतागायत भारतात अनेक मुसलमानांनी हजारो बॉंबस्फ़ोट करून लाखो निरपराधांचा जीव घेतलेला आहे. (स्फ़ोटांची संख्या १८,८४२ सौजन्य: jihadwatch.org)
परंतु तरीही हा पहिला हल्ला महत्वाचा आहे! कारण हा हिंदु समाजाला पहिलाच धक्का होता. या काळात विठठलाची शासकीय पूजा कधीही न केलेले महाराष्ट्राचे एकमेव मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी एक पत्रकार परिषद घेऊन मुंबईत ११ स्फ़ोट झालेले असूनही १२ स्फ़ोट झाल्याचा खोटाच निर्वाळा दिला होता! सर्व ११ स्फ़ोट हिंदुबहुल भागात होऊन ३५० च्या वर हिंदू मारले गेलेले असताना १२ वा स्फ़ोट मशीदीसमोर झाला असा धादांत खोटा दावा करून हिंदूंच्या भडकणा-या भावनांना भ्रमित करण्याचे “महत्कार्य” राज्यातील सर्वोच्च संवैधानिक पदावर बसून पवारांनी करून दाखविले होते. दाऊदला मुंबईबाहेर पळून जाण्यातही त्यांनी मदत केल्याची वृत्ते पुढे अनेक वर्षे अधून मधून येत असत. हिंदु समाज विसराळू आहे. त्यामुळे त्यांना अधुन मधुन असे पुराणातील दाखले द्यावे लागत असतात. असो.
याचा ले. कर्नल पुरोहित आणि मोदी यांच्याशी काय संबंध ? सांगतो..सर्व सविस्तर सांगतो!
मुंबई स्फ़ोटापासून सुरु झालेले स्फ़ोटांचे सिलसिले पुढे इतके विकोपाला गेले की भारतात कुठेही एखादा स्फ़ोट होणार, त्यात हिंदु किडामुंगीसारखे मरणार व एखादी इस्लामी दहशतवादी संघटना त्या स्फ़ोटाची जबाबदारी स्वीकारून मोकळी होणार, लोकही काही दिवस हवालदिल होऊन,  चरफ़डून पुन्हा आपापल्या कामाला लागणार. पोलीस तपास संथगतीने सुरु रहाणार, काही दहशतवाद्यांना अटक झालीच तरी तारीख पे तारीख च्या खेळात वेळ दवडत ते आरामात तुरुंगात सरकारी खर्चाने मटण बिर्याणीवर ताव मारत रहाणार...पुढच्या स्फ़ोटाची वाट पहात भयाने पछाडलेली जनता देवळात जातानाही पोलीसापुढे हात वर करून त्याला अंगझडती घेण्यास पूर्ण सहाय्य करणार! परंतु एकालाही असे वाटत नसे की काय संबंध माझी झडती घ्यायचा? मी का अपराधी म्हणून संशयाने पाहिला जात वावरतोय? तेही माझ्याच देशात, माझ्याच भूमीत आणि माझ्याच देवाला जाताना!  पण छे हो! पुरोगामी महाराष्ट्रात असला अभद्र विचार करून कसा चालेल!
पण इकडे इस्लामी दहशतवादाचे नियोजन करणारी मंडळी मात्र चांगलीच चिंतेत पडली होती, कारण गेल्या अनेक शतकांत अनेक धर्मांच्या लोकांना, संस्कृतींना जसे हिंदुंनी निपचित पडलेल्या अजगराने हरीण पचवावे तद्वत पचवून भगवाच ढेकर दिला होता तसेच हे हल्लेही हिंदुंनी पचवून टाकले. मुसलमान ना? तो बॉंब फ़ोडायचाच! जन्मसिद्ध हक्कच आहे तो त्याचा! अशाच थाटात सगळे विचार करू लागले! इतकेच काय! मुसलमानांना वाईट वाटू नये म्हणून शिवराय आमरण मुसलमानांशीच लढले हे ठाऊक असूनही सर्वजनीक जीवनात मात्र त्यांच्या  सैन्यात कसे मुसलमान होते हे हिंदूच अहमहमिकेने सांगू लागले.
भारतात नागरी युद्धे भडकून एकदाचा तो देश छिन्नविच्छिन्न करावा व त्याचे ज्याला जितके हवेत तितके तुकडे त्यांनी तोडून घ्यावेत या विचाराने मग ख्रिश्चन-मुसलमान व डावे असे सर्व गट एकत्र आले.
यात धर्मप्रसारासाठी झटणारे इवांजलिस्ट, कम्युनिस्ट, मारक्सिस्ट, नक्षलवादी, फ़ुटीरतावादी, मुसलमान अतिरेकी गट, पुरोगामी इतकेच काय पण फ़ितुर झालेले काही जन्महिंदुही सामील झाले. याच्या पुराव्यांसाठी जिज्ञासूंनी राजीव मल्होत्रांचे ब्रेकिंग इंडिया हे पुस्तक अवश्य वाचावे. आता या सर्वांचे अर्थकारण कसे चालायचे? ती जबाबदारी अमेरिकन गुप्तचर संघटना सी.आय.ए. व पाकची आय.एस.आय. यांनी उचलली! हे हवेत मारलील बाण नसून रॉ या भारतीय गुप्तचर संघटनेचे एक जबाबदार अधिकारी आर.एस. एन. सिंग यांनी २०१४ साली याचे पुरावे सादर केले होते, तेही इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
या सर्वांनी अखेरीस असे ठरविले की मूर्ख हिंदूंना अजून भ्रमित करण्यासाठी “हिंदु दहशतवाद” नावाचा नवा बागुलबुवा उभा करायचा!  कटाची सर्व सिद्धता झाली! आधीच या अभद्र युतीत सामील असलेले काही राजकारणी दिमतीला होतेच! आणि एक दिवस अचानक मुंबईत ७ “हिंदु दहशतवादी” शिरले! सर्वांच्या हातात सिद्धिविनायकाच्या बाहेर डेव्हीड कोलेमन हेडली नामक अमेरिकन माणसाने विकत घेऊन त्यांना दिलेले भगवे गंडे दोरे होते. कपाळी कुंकु होते! इतकेच काय कानाला भोकेही पाडली होती, नव्हे नव्हे उत्तम फ़ारसी विरहित हिंदी बोलण्याचे वर्ग पूर्ण करून ही मुले आली होती! आणि त्यांनी तासाभरातच भारताची आर्थिक राजधानीच वेठीला धरली!  या कटाची पुसटशी कल्पना असलेले काही उमदे अधिकारी याच काळात अचानक काही कारण नसताना एकाच गाडीत बसवून या “हिंदू” मुलांपुढे पेश केले गेले, ज्यात एटीस प्रमुख करकरे, पवारांचे अनेक वर्षे अंगरक्षक राहिलेले अशोक कामटे व दाउदची अर्धी गॅंग टिपणारे शार्पशूटर साळस्कर यांचा समावेश होता. होत्याचे नव्हते झाले. “बडे बडे शहरोंमे छोटी छोटी बाते होती रहती है।“ असे वाक्य बोलावयास लाऊन या काळात एका चांगल्या नेत्याची धुळधाण करवली गेली.  व पुढे तोच नेता मुखाच्या कर्करोगाने देवाघरी गेला. त्याचा बोलविता धनी मात्र त्याच रोगातून जिवंत वाचला! आहे की नाही कमाल! इतक्यात घात झाला! ज्ञानोबा-तुकोबांच्या या महाराष्ट्रात आपल्या मुलाचे नाव तुकाराम ठेवणा-या त्या आईची कूस धन्य करीत हवालदार तुकाराम ओंबाळे यांनी गोळ्यांचा अक्शरश: पाऊस आपल्या छातीवर सिंहासारखा झेलत त्यातल्या एका पोराला जिवंत पकडला आणि सगळाच दाव उलटला!
जगातला सगळ्यात मोठा हिंदु दहशतवादी हल्ला क्षणात इस्लामी ठरला व अजमल कसाब भारताच्या तावडीत सापडला! क्षणात सूत्रे हलली व तत्कालीन भारत सरकारच्या सर्व पाईक नेत्यांना सूचना गेल्या की भगवा दहशतवाद हा शब्द लोकांच्या मनावर बिंबवा! आणि मग राहुल गांधी असो, सुशीलकुमार शिंदे असो, पी. चिदंबरं असो की दिग्विजय सिंग असोत सर्वजण एकमुखाने भगव्या दहशतवादाची कोल्हेकुई करू लागले!
इकडे याच काळात हिंदु धर्माचा पाया खिळखिळा करता यावा या करिता “मराठा सेवा संघ” नमक एक संघटना पाकिस्तानच्या निधीतून कामाला लागली.मराठा हे नाव दिसले की महाराष्ट्र डोळे झाकून विश्वास ठेवत असे. या विश्वासाला तडा देणारी हीच ती संघटना! त्यांना हिंदू धर्मात फ़ूट पाडण्याचे कार्य सोपविण्यात आले. विशेषत: हिंदू धर्माची प्रखर ज्योत ज्यांच्या मुळे तेवत राहिली त्या शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तुकाराम महाराज व रामदास स्वामी यांना टार्गेट करून या लोकांनी शिवधर्म नामक एक धर्म स्थापन केला व हिंदूंना मूळ धर्मापासून दूर नेण्यास या लोकांनी सुरुवात केली. यासाठी संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड या व अशा शेकडो फ़ुटकळ संघटना पाकिस्तानातील शोहदा ब्रिगेड, ३१३ ब्रिगेड, जमात-ए-इस्लामी आदींच्या तालावर नाचू लागल्या. अभ्यास नसलेल्या हिंदू मुलांना जाळ्यात ओढून नासवू लागल्या. या सर्व घडामोडींचा सविस्तर अहवाल एक राष्ट्रनिष्ठ सैनिक तयार करीत होता व वेळोवेळी केंद्र सरकारला कळवीत होता. त्याचे नाव ले. कर्नल श्रीकांत पुरोहित. अनेक वर्ष भारतीय तोफ़खान्यात अतुलनीय शौर्य गाजविलेल्या या अधिका-याला स्वेच्छेने लष्करी गुप्तवार्ता विभागाचा देवळाली कॅंपमधील कारभार सोपविण्यात आला होता. परंतु केंद्रातील सरकारच मुळी त्या काळात व्हॅटिकन व इस्लामाबाद येथून हलत होते! त्यामुळे या राष्ट्रनिष्ठ सैनिकाचीच गुप्त वार्ता महाराष्ट्राकडे पाठविली गेली व त्याचा बंदोबस्त करण्याचे आदेश आले. वरील सर्व घटनाक्रमात पवार साहेबच सरकारात होते हे लक्षात घेण्यासारखे आहे. मालेगावला असाच एक स्फ़ोट मुसलमानांनी घडवून आणल्यावर पवार साहेबांनी अलीबागला एक चिंतन शिबीर घेऊन सर्व स्फ़ोटांनंतर मुसलमानांनाच का अटक करता? असे विचारत पोलीसांना जणू हिंदुंनाही कटात गोवण्याचे आदेशच दिले!    आणि तिथुन पुढे घडलेल्या प्रत्येक स्फ़ोटात या कर्तबगार लषकरी अधिका-याला गोवण्यात आले!
ज्या एटीएस ला पुरोहितांनी अधिकृतपणे अरबी व फ़ारसी भाषा शिकवली, कुराण वाचायला शिकवले त्यांनाच अटक करण्याची नामुष्की पोटासाठी या पोलीसांवर आली. याला कारण केवळ शरद पवार होते .
पुढे पवारांच्या संपर्कातील अनेक नेते, कार्यकर्ते हीच री ओढू लागले व इस्लाम बद्दल कुणी बोलू लागला की त्याला मालेगाव, समझोता एक्सप्रेस , इशरत जहां असले तेच ते दाखले देऊ लागले. अभ्यास करणे रक्तातच नसलेल्या हिंदूंनाही हे शब्द मग अंगवळणी पडले व कुठेही स्फ़ोट झाला की आता हा कुणी केला? मुसलमानांनी की हिंदूंनी असे तेच विचारू लागले! या दरम्यान एक मोठेच सत्तांतर या देशाने अनुभवले! व अशाच एका “हिंदू दहशतवाद” फ़ेम दंगलीतून अर्थात गोध्रा कांडातून मोदी नामक एका महानायकाचा उगम झाला! नव्हे नव्हे पुरोगाम्यांनीच तो केला! मोदींना जितके मोठे हिंदुंनी नाही केले तितके मोठे त्यांच्या विरोधात अपप्रचार करून ते काम माध्यमांनी व त्यांच्या अन्नदात्यांनी केले. वरील सर्व बाबींचा तटस्थ अभ्यास रॉ मधील काही लोक करत होते, त्यांनी थेट मोदींनाच हे पुरावे सादर केले! आणि गम्मत पहा! पुढच्याच दिवशी मोदी बारामतीत हजर झाले! सगळीकडे एकच बोंब उठली! मोदींना हे करण्याची काय गरज होती? वगैरे वगैरे, परंतु एकदाही आमदारकीची निवडणूक न लढवता जो मनुष्य थेट त्या आमदारांचा बाप अर्थात मुख्यमंत्री होतो व एकदाही खासदारकीची निवडणूक न लढवता जो मनुष्य थेट खासदारांचा मुखिया अर्थात पंतप्रधान होतो त्याला आपण राजकारण शिकविणारे कोण हे या पोलोटिकल पंडितांना सांगावे तरी कुणी! असो. परंतु या भेटीने पवारांची जी गाळण उडाली ती आजतागायत कायम आहे! ज्यांचे बोट धरून राजकारणात आपण आलो त्यांनाच बुडविणा-या पवार साहेबांना म्हणुन तर मोदींचे ते वाक्य फ़ारच झोंबले “मी पवार साहेबांचे बोट धरूनच राजकारणात आलेलो आहे!”
मित्रो! आगे आगे देखो होता है क्या! समझने वालोंको इशारा काफ़ी है! नासमझ हो तो इशरत भी क्या कम है!
जल्दी नितीश कुमार बनो! नही तो तुम्हारा शरद पवार हो जायेगा!
एका अत्यंत कर्तबगार लष्करी अधिका-याची, राष्ट्रसेवेची, ऐन उमेदीची ९ वर्षे तुरुंगात खितपत घालविणा-यांना त्याची फ़ळे तर नक्कीच मिळणार! परंतु आपण आता तरी शहाणे होऊयात आणि हा हिंदु दहशतवाचा बागुलबुवा पवार साहेबांच्या हयातीतच फ़ोडून टाकुयात! एकेकाळी पंतप्रधानपदाचा हक्काचा दावेदार असणा-या माणसाला आज बारामतीतूनही निवडून येण्यासाठी जंग जंग पछाडावे लागत आहे याचे रहस्य संगतीत दडलेले आहे! “असंगाशी संग प्राणाशी गाठ “ हे काही कुणी उगाचच नाही म्हटलेले!

॥ www.dasbodh.com ॥

Monday 6 August 2018

मित्र दिन

Tukaram Chinchanikar is feeling यदि वेदा: प्रमाणं स्यु: जीवेय
मित्र दिन साजराच करायचा असेल तर अशा चिंतनाने करा.
वेदवाणी !
Image result for mahabharat krishna with arjun

*ॐ दृते॒ दृᳯह॑ मा मि॒त्रस्य॑ मा॒ चक्षु॑षा॒ सर्वा॑णि भू॒तानि॒ समी॑क्षन्ताम् ।*
*मि॒त्रस्या॒हञ्चक्षु॑षा॒ सर्वा॑णि भू॒तानि॒ समी॑क्षे । मि॒त्रस्य॒ चक्षु॑षा॒ समी॑क्षामहे॥*
यजुर्वेद ३६.१८
देवता ईश्वरो देवता
छंद - भुरिग् जगती
स्वर - निषादः
ऋषि - दध्यङ्ङाथर्वण ऋषिः
अर्थ - *हे अविद्यारूपी अंध:काराचा निवारक जगदीश्वर! ज्याने सर्वजण मित्राच्या दृष्टीने मला सम्यक् पाहतील, मी मित्राच्या दृष्टीने सर्वांस सम्यक् पाहु शकेन, अशा प्रकारे सर्व आम्ही लोक परस्परांस मित्रदृष्टीने पाहु असे आम्हांस दृढसंकल्प करा.*
पुन्हा ऋग्वेद - १०.१९१ शेवटच्या सूक्तात म्हणतो. आदरणीय मोदींनी पंतप्रधानपदाच्या प्रथम अभिभाषणांत लाल किल्ल्यावरून हा उच्चारलेला मंत्र.
हे संघटन सूक्त म्हणून प्रसिद्ध आहे.
*ॐ संस॒मिद्यु॑वसे वृष॒न्नग्ने॒ विश्वा॑न्य॒र्य आ ।*
*इ॒ळस्प॒दे समि॑ध्यसे॒ स नो॒ वसू॒न्या भ॑र ॥*
*ॐ सं ग॑च्छध्वं॒ सं व॑दध्वं॒ सं वो॒ मनां॑सि जानतां ।*
*दे॒वा भा॒गं यथा॒ पूर्वे॑ संजाना॒ना उ॒पास॑ते ॥*
*ॐ स॒मा॒नो मंत्रः॒ समि॑तिः समा॒नी स॑मा॒नं मनः॑ स॒ह चि॒त्तमे॑षां ।*
*स॒मा॒नं मंत्र॑म॒भि मं॑त्रये वः समा॒नेन॑ वो ह॒विषा॑ जुहोमि ॥*
*ॐ स॒मा॒नी व॒ आकू॑तिः समा॒ना हृद॑यानि वः ।*
*स॒मा॒नम॑स्तु वो॒ मनो॒ यथा॑ वः॒ सुस॒हास॑ति ॥*
अग्निः - देवता
छंद - विराडनुष्टुप्
स्वर - गान्धारः
संवनन संवाद
अर्थ - *हे सुखवर्षक अग्निदेव! आपण संपूर्ण विश्वाचे स्वामी आहात. समस्त तत्वांमध्ये आपणच विद्यमान आहात. यज्ञवेदी अथवा पृथ्वी आपणच प्रकाशित होतात. आपण आम्हांस विभिन्न प्रकारचे ऐश्वर्य प्रदान करा.*
*हे मनुष्यानो! तुम्ही सर्व एकत्र चला, एकत्र बोला, तुमचं मन समान ज्ञानसंपन्न हो, जसे पूर्वीचे देव लोक एक समान ज्ञानसंपन्न होऊन आपल्या ध्येयांस प्राप्त करते झाले, तसेच तुम्ही एकत्र कार्य करा.*
*हे स्तुती करणार्यांनो ! आपणा सर्वांची प्रार्थना एकसमान होवो, परस्परसंबंध एकच होवो. आपले विचारतंत्र समानरुप होवो.*
*हे स्तोताओं, मी आपल्या जीवनांसच एकाच मंत्राने अभिमंत्रित करतो. एक समान आहुती प्रदान करून यज्ञमय करतो.*
*हे स्तोताओ ! तुमचं हृदय एक समान होवो, तुमचे मन एक होवो, संकल्प एक होवो, तुम्ही संगठित होऊन आपले सर्व कार्य संघटित करु शकाल.*
शुभाशिष !