Tuesday, 19 February 2019

शिवसेना : ह्य: , अद्य , श्व: ।



नमस्कार राजे..!

आज शेवटी नाही नाही म्हणता म्हणता सेना भाजपची युती झालीच. साहजिकच आहे प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. हा समाज डावे उजवे सैनिक स्वयंसेवक खांग्रेसी घड्याळी काटे अशा वर्गात विभागलेला आहे त्यामुळे समर्थन विरोध तर काहींनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. पण असं नाही वाटत का मराठी जनहो कि काहीतरी सुटतंय ? काहीतरी चुकचुकतंय ? येणारा काळ महाराष्ट्रासाठी कसा असेल? किती लाभदायक असेल ? इथल्या मूलभाषीय समाजाचे अस्तित्व त्यावर होणारा भाषिक आर्थिक कोंडमारा आणि त्यातून राजकीय पोळ्या भाजून घेणारी वेश्या वृत्ती जोपासलेला हा राजकीय समाज.



      आज सर्वांचे लक्ष ज्या शिवसेनेच्या भूमिकेकडे लागले होते ती शिवसेना काहीतरी महत्त्व ठेवून आहे महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणूनच ना? शिवसेना हा फक्त एक पक्ष नाही तो एकमेव जनांदोलनातून जन्मलेला अग्नी प्रवाह आहे. देशाच्या अन्य कुठल्याही राज्यात असं एकही राजकीय कुटुंब नाही ज्याला सत्तापदावर बसायची घाणेरडी इच्छा नाही? फक्त महाराष्ट्रात ^बाळ ठाकरे^ या जननेत्याचे ते कुटुंब आहे ज्याने कधीही सरळ लाभाच्या पदाचा ,लाल दिव्याचा , सरकारी बंगल्याचा मोह नाही केला उलट तोच लालदिवा स्वतःच्या साध्या घरचा दास करून दाखवला. मुंबई सारख्या एका राज्याच्या राजधानीत राहून पाकिस्तानच्या लोकसभेला निंदा प्रस्ताव पारित करावा लागावा असा काही पाकिस्तानचा विरोध केला. जे एतद्देशीय अन्य कुठल्याही पक्षाला जमलं नाही ते करून दाखवलं. बाळासाहेब गेल्यावरही उद्धव ठाकरेंनी खूप काही शाश्वत(वृद्धी नक्कीच झाली नाही) ठेवले. अर्थात सर्व जसेच्या तसे कधीही नसतेच.



आज आपण शिवसेना काल आज आणि उद्या यावर एक थोडक्यात दृष्टी टाकू. 1960 च्या महाराष्ट्र निर्माणाच्या आंदोलनात प्रबोधनकार ठाकरेंचा सहभाग होता त्यांचीच सावली म्हणजे बाळ ठाकरे व त्यातून जन्मली शिवसेना. आधी मुंबई पूरती सीमित असलेली शिवसेना मुंबई मध्ये मराठी लोकांसाठी त्यांच्या समस्या व अस्तित्वासाठी काम करू लागली . हळूहळू मराठी अस्तित्व टिकण्यासाठी सत्ता आवश्यक आहे हे उमजले व त्यातून मुंबई महानगर पालिका व नंतर मुंबई म्हणजेच शिवसेना हे समीकरण झाले. हा पक्ष विस्तार नंतर कोकण, नाशिक जळगाव, ठाणे पालघर, पुणे कोल्हापूर औरंगबाद, अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ अशा मोजक्या ठिकाणी झाला. पण महाराष्ट्र भौगोलिक दृष्ट्या मोठा असल्यामुळे व मुंबई कडचा भाग जास्त आपला वाटल्यामुळे वा मानवल्यामुळे बाळासाहेब व शिवसेना मुंबई कोकण नाशिक संभाजीनगर अशा पट्ट्यात व मोजक्या शहरां पुरता असलेला पक्ष झाला. तसं महाराष्ट्राच्या भौगोलिक व्यापकतेमुळे कोकण- उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा,  विदर्भ असे भाग आहेतच आणि तसंच राजकीय प्राबल्य देखील आहेच. राजकारणात महाराष्ट्राचा सामाजिक,जातीय,ऐतिहासिक,वैचारिक प्रवाहाचा पण प्रभाव दिसून येतो. 40 व्या वर्षी उभारलेला पिल्लूसा पक्ष बाळ ठाकरेंनी वयाच्या 78 व्या वर्षीपर्यंत खूप समर्थपणे सांभाळला. जेवढं ते करू शकत होते तेवढं त्यांनी केलं.शेवटी तो माणूस राजकीय चौकटीच्या बाहेरचा होता.खरा *वाघ *खरा मराठा* मराठी* होता. 


2004 साली बाळासाहेबांनी शिवसेना आपल्या पुत्राच्या हाती सोपविली. इथून सेनेचे अद्य म्हणजे आज सुरु होते.
2004 ते 2019 हा काळ सेनेचा आजचा काळ आहे असं मानुया. 2004 ला सेनेची धुरा उद्धव ठाकरेंच्या हातात दिल्यावर सेनेची साडेसाती सुरु झाली. एकामागून एक नेते सोडून गेले.आधी नारायण राणे, छगन भुजबळ,गणेश नाईक आणि एवढंच नाही तर बाळासाहेबांची प्रतिमा छाप असणारे त्याचे पुतणे व भाचे असलेलं आक्रमक व्यक्तिमत्त्व राज ठाकरेंनी सुद्धा अवघ्या दोन वर्षात 2006 ला शिवसेनेला घटस्फोट दिला व महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापिली. भुजबळ राणे नाईक यांच्या मुळे कोकण नाशिक नवी मुंबई येथे शिवसेनेला फार नुकसान झाले. आणि राज ठाकरेंनी मनसे स्थापिल्यापासून तर सेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई मध्ये लाखो मते घेतली आणि आश्चर्य हे कि बाळासाहेब हयात असताना , नेतृत्व करताना मनसेचे  तब्बल 13 आमदार जिंकून आले, एवढचे नाही तर लोकसभेला सुद्धा दीड लाखावर मनसेने मते घेतली. 2009 ची विधानसभा सेना भाजप युतीला मनसे,व राणे भुजबळ नाईक यांच्या मुळे जिंकता आली नाही. त्यांनतर अवघ्या 3 वर्षात 2012 ला महाराष्ट्राच्या राजकारणातून एकमेव असा मर्द गेला.
सेनेचे उरले सुरले क्षात्रतेज , चाणक्य नीती संपले.



    साहेब गेले नोव्हेंबर 2012 ला आणि 2013 च्या पहिल्या अर्ध्यात गुजरातचे मुख्यमंत्री देशाच्या राजकीय पटलावर ठाकरी आवाजात खांग्रेसची मायबहिण एक करू लागले. देशाचं सर्व भान एका मोदी नावाच्या माणसावर नेलं गेलं सर्व निवडणूक केंद्रकृत केली गेली.यातच 2001 ते 2011 या दहा वर्षात मुंबई महाराष्ट्रात तब्बल 2 कोटी परप्रांतीय लोकसंख्या स्थलांतरित झाली. हिंदी व उर्दू भाषिकांची लोकसंख्या मुंबई मध्ये अचानक वाढली. याच काळात 2009 पासून भाजपचे केंद्रीय नेतृत्व बदलले .दिल्लीच्या चार चौकडीत बंदिस्त असलेला भाजप संघाने स्वतःच्या माणसाच्या म्हणजे नितीन गडकरींच्या हाती दिला.गडकरींनी भाजप जुन्या नेत्यांना परत आणून वाढवला. मुंडेंशी वाद मिटवून महाराष्ट्र भाजपला पुन्हा स्फूर्ती दिली. 2013 च्या उत्तरार्धात भाजपने मोदींना नेतृत्व देऊन टाकले व देशाचे राजकारण झपाट्याने बदलून गेले. खांग्रेसची हिंदू विरोधी कामामुळे हिंदू मते एकीकडे झुकली.भाजपने संघाने पैसा, कार्यकर्ते , जीव ,घाम रक्त दिवस रात्र सर्व एक करुन आपल्या सत्तेची अघोरी भूक भागविली. यातच 2012 ला फडणवीस महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष बनविले गेले .फडणवीसांनी महाराष्ट्र भाजपला प्रत्येक जिल्हा गावात घुसलेल्या परप्रांतीय विशेषतः उत्तर भारतीय लोकांचा पक्ष बनविले. गेल्या 10 वर्षात आलेल्या 1 कोटी शुद्ध हिंदी मतांना भाजपमध्ये उत्तर भारतीय मोर्चाच्या माध्यमातून आपल्याकडे वळवून मराठी राज्य घाणेरड्या जातीय वळणाकडे नेणे सुरु होते.





    पण यात कुठे होती शिवसेना? कुठे हरवला होता तो वाघ ज्याचा दरारा होता राज्यात आणि देशाला हि एवढेच नव्हे तर पाकिस्तानला पण. 2004 ला उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष केल्यावर पक्ष वाढायला पाहिजे होता.पण शिवसेना जेवढी आहे तेवढीच राहिली.सुख एवढेच कि सेना आटली नाही. ती जेवढी आहे तितकीच आजही आहे. मे महिन्यात लोकसभेला तब्बल 282 जागा घेलेल्या भाजपला महाराष्ट्राच्या बदललेल्या भाषिक समीकरणाची व सेनेच्या गाफील,मर्यादित अस्तित्वाची पुरेपूर जाणीव होती. अवघ्या सहा महिन्यात विधानसभा झाली.171 117 हे समीकरण भाजपने अमान्य केले.सेनेनी नमते घेऊन 144-144 मानायला हवे होते पण ते मानले गेले नाही.इथूनच शिवसेना चुकली आणि वासे फिरले. एवढ्यावरच सेना थांबली नाही निवडणुका झाल्या व भाजपला चक्क दुप्पट जागा मिळाल्या पण पूर्ण बहुमत नसताना भाजपची गोची झाली.अशा वेळी योग्य काळाची वाट बघून पत्ते टाकण्यापेक्षा मूर्ख शीर्ष नेत्यांचं ऐकून सेना अगदी कमी महत्त्वाच्या 5 खात्यांवर सत्तेत सहभागी झाली तेही भाजपने न बोलवता.त्यांनतर राजीनामा देऊ अश्या धमक्या दिल्या गेल्या पण पण सत्ता तीही इवलीशी सुटली नाही.




2004 ते 2019 शिवसेना संघटनात्मक रित्या वाढविली गेली पाहिजे होती पण ते काम झालं नाही.मराठीत्व हा निवडणुकीचा आधार झाला पण मराठी कल्याणासाठी महाराष्ट्र हातात असावा लागतो हे काही मुंबई करांना समजलं नाही.हि 15 वर्ष फक्त उंटावरून शेळ्या हाकलल्या गेल्या आणि जो पक्ष आयता हातात मिळाला तो पुढच्या पिढीला वाढवता आला नाही.अशातच मुंबई व राज्यात परप्रांतीय लोकसंख्या वाढतच गेल्यामुळे भाजपला जडत यश मिळू लागले.सेनेची फार दैना झाली पण सेना खच्चीकरण कोणीही करू शकले नाही.तिचा बाणा भाषा क्षात्रतेज कोणीही सम्पवू शकलं नाही.सेनेच राजकीय महत्त्व जे साहेबांमुळे होतं ती पुण्याई आजही सध्याचे चालक उपभोगत आहेत.




2019 ला कोणतीही लहर नसेल हि जाणीव भाजपला आहे म्हणून भाजप युतीसाठी इच्छुक होता.ऐन विधानसभेला युती तोडल्याचा वचपा लोकसभेला भाजपशी युती न करता सेनेला काढता आला असता पण अर्ध्या अर्ध्या जागांवर युती झालीच.लाखो कार्यकर्ते संभ्रमात व निराश आहेत.यावेळी जर सेनेनी युती केली नसती तर शिवसैनिक व पक्षामध्ये बळ आलं असतं. भाजपला 10 जागांपुरत मर्यादित करून दिल्लीमध्ये मोदींचा रथ पून्हा थांबवता आला असता.गडकरींना किंवा सुषमा स्वराजांना बिनशर्त पाठिंबा देऊन भाजपला कायम चा धडा देऊ शकली असती शिवसेना.क्षेत्रीय पक्ष म्हत्त्वाचेच नाहीत तर ते पंत प्रधान सुद्धा ठरवू शकतात बदलू शकतात हे याआधी झालंय ते सेना एकट्या बळावर करू शकली असती.अमित शहा व मोदी फडणवीस यांनी वारंवार घाणेरडी टीका केली त्याला शाश्वत उत्तर देण्याची हि वेळ होती पण ती सेनेनी गमावली युती करून.दिल्लीला दिलेल्या समर्थनाच्या बदल्यात पूर्ण महाराष्ट्र देवगौडाच्या पक्षासारखा स्वहाती ठेवता आला असता पण विचार संपले कि फक्त सत्ता उरते तसं आज झालंय. आज सेना कायमची पिछाडीवर गेलीय.ना पक्ष संघटन वाढवलं ना धड राजकारण करता आलं.2019 ला सुद्धा अर्ध्या अर्ध्या जागा लढवून देखील भाजपचे जास्त आमदार येतील आणि परत उत्तर भारतीय घुसखोर आणि मनुवादी सत्तेत बसतील.पण मराठीत्व मात्र गप्पगुमान महाराष्ट्राचा युपी बिहार पाकिस्तान होत असताना बघत राहील.सेना उद्या आजपेक्षा जास्त दास्यत्वात गेलेला प्रवाह बनेल.





    या देशात हिंदुत्वाचे सर्व प्रवाह एका जातीच्या काही लोकांच्या जातीयतावादी मनुवादी हातात आहेत , त्यांना सर्व जातीय व सर्व भाषीय सांप्रदायिक सर्व समावेशकतेचा क्षात्रतेजाचा आधार नाही, फक्त बाळ ठाकरे हा माणूस अवघ्या देशात जातपात न मानणारे, भारतीय भाषिक विविधता जिथे जाऊ तिथे जपणारे व तितकेच आक्रमक उग्र पाकड्याना हाकलून लावणारे हिंदुत्व देऊ शकले पण हा प्रवाह आटत गेलाय.आता काय होईल एकजातभाषा वादी धरमपेठ सत्तेत येईल नाहीतर परत 10 जनपथ चे लुटेरे चाकर सुलतान होतील.पण राजकीय चौकटी बाहेरच सत्य कोण बघेल?त्यासाठी कोण न्याय करेल? तब्बल 5 कोटी अमराठी लोक येऊन चुकलेत इथला माणूस दिवसागणिक सम्पतोय त्याला स्वराज्यात नोकऱ्या मिळत नाहीत.दरदिवशी नगर जातायत.परप्रांतीयांच्या महानगर पालिका होतायत विधानसभा होतायत आणि याचा आधार आहे भाजप म्हणून हा गद्दार पक्ष सत्तेतून कायमचा हाकलून लावायचा होता पण झालं उलटंच. मराठी जनहो , आपण डावे असू अथवा उजवे पण देश धर्म राज्य याचं एक सत्य असतं हे तर्काने , सरकारी आकडेवारीने अभ्यासले पाहिजे व त्यानुसार सत्ता प्रणाली राबविली पाहिजे. आशा करतो की, पक्ष प्रेमाचे चष्मे उतरवून समाज पाहिल्या जाईल.



टीप:मी कुठल्याही राजकीय पक्षाची गुलामी व भक्ती करत नाही पण काहींना असं वाटतं त्यासाठी हा प्रपंच.मराठी माणूस 33टक्के संपल्यावर उरावा म्हणून ठाकरे कुटुंबाला कायम समर्थन राहील ते जसे जितके थोडके का असेना महाराष्ट्रवादी आहेत.
जय मराठी जय महाराष्ट्र...!

Saturday, 16 February 2019

मलरे .....🌹


मलरे.....: सुंदर फुल




संस्कृत पंडितांनो माझ्या
या द्रविड भाषेला संस्कृतोद्भव सिद्ध करून दाखवा.
नाहीतर गाण्याचा आनंद घ्या. गायला अवघड जात होत म्हणून एका मल्याळी मित्राला विचारून विचारून मराठी केलं.आवडतं गाणं माझं.लिंक म्हणजे दुवा देतोय नसेल तर डाउनलोड करून घ्या.https://www.masstamilan.org/1341/malare-ninne-mp3-song



थेली मानम मळ विल्लीन. निरमनियुम नेरम
 निरमारनोरु  कण विन्निल  थेलीयुन्न पोले
पुळयोरुम तळवुन्नी थनू निरन काट्टूम्
 पुळ कंगल इळनेतोरु  कूळ लुथीय पोले

कुलिरेकुम कणाविन्नील कदिराडीय कालम्
मनथारील मधुमासम् थलीराडीय नेरम

 अक मरुकुम मयी लिनकल तूयी लुनरुम कालम्
येन अकथारील अनुरागम पकरून्न यामम


…अळगे.....
अळगिल थीथोरू शीलअळगे
..मलरे.....
एन्नुयीरील विडरूम पनी मलरे

मलरे निन्ने काणा थिरुन्नाल
मिळी वेगिय निरमेल्लाम् मायून्नापोले
अलिवोडेन अरीकत्तीन अनया थिरुन्नान
अळ केकीय  कणवेल्लाम् अक लुन्ना पोले
ज्ञानेन्टे आथमा विन आळथीनूल्लील
अथिलो लमारो रु मरियाथे सूक्क्षीच
थालंगल रागंगल ईनंगलाई


ओरोरो वारंगलाई
इडरुन्न इंन्टे इडनेनजीनूल्लील
प्रणायथीन मळययी नी पोळीयुन्नी नाळील



थळरुन्नो रेंडे थनुथोरुम निंडे
अलथल्लम प्रणायथा लुनरुम्
मलरे.....अळगे....

कुलिरेकुम कणाविन्नील कदिराडीय कालम्
मनथारील मधुमासम् थलीराडीय नेरम


अक मरुकुम मयी लिनकल तूयी लुनरुम कालम्
येन अकथारील अनुरागम पकरून्न यामम


…अळगे.....
अळगिल थीथोरू शीलअळगे
.मलरे.....
एन्नुयीरील विडरूम पनी मलरे

Friday, 15 February 2019

ग्रीन कॉरिडॉर

द् ग्रीन कॉरिडॉर

मित्रांनो , आजचा भारत आपण जरी 1947 नन्तरच्या काळातला बघत असू  तरीही आजच्या भारताची मुळे हि एक सहस्र वर्ष जुनी आहेत. म्हणतात ना ^प्रेसझेन्ट इझ द रिफ्लेक्शन ऑफ हिस्टरी^ अगदी तसेच. इतिहासात काय झाले वायव्य ते ईशान्य भारत कायम क्षत्रतेजाच्या अभावात परकीय आक्रमणाला बळी पडला आणि भारतभूमीचे अतोनात नुकसान झाले.



आर्य चाणक्य नन्तर फक्त मराठा साम्राज्याने हा एकसंध भारत हृदयी धरला त्यासाठी तंजावर ते मुलतान लढला महाराष्ट्र. पण नंतर काय सर्व व्यर्थ झाले.मुळात हिंदुत्व हेच भारतीयत्व आहे हे अमराठी लोकांना कधी समजलेच नाही.
म्हणूनच ब्रिटिश सत्तेच्या विरोधात हिंदुत्व हरवलं आणि तथाकथित भारतीय समाज नावाची संकल्पना उदयास आली आणि त्याद्वारे ब्रिटिश सत्तेचा विरोध झाला. 1947 ला धर्मधारे पाक बनला तसाच भारत बनू शकला असता पण गंगेच्या किनार्यातील राजकारण्यांच्या हाती सत्ता असल्यामुळे ते झाले नाही.आणि काश्मीर ते बंगाल आसाम हा तब्बल 60 कोटी च्या आसपास असलेला अर्धी लोकसंख्या वसलेला भारत आपल्या गळी पडला ज्यात बहुतांश  लोकसंख्या हि मजहबी। जमातीची आहे. दार उल चे स्वप्न उरी बाळगून अंशतः काही चांगली मंडळी सोडली तर अन्यांनी कायम दार उल चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी च काम केलंय. 1947 ते 2019 एका जमातीचा जन्मदर , वाहाबीपणा , भारतीय संविधानिक व्यवस्था व कायद्यांच्या प्रति असलेला विरोध, धर्मांध राजकारण, शरियत अन्य गोष्टी कायम वाढतच गेल्या. आणि गंगा किनाऱ्याच्या तथाकथित सेक्युलर राजकारणाने हे चोचले पोसले एवढंच नव्हे तर त्यांचा मजहबी साम्राज्यवाद वाढायला राजकीय दृष्ट्या मोकळे रान उपलब्ध करून दिले.
अशातच मराठी माणसांमुळे हिंदुत्व जे भारताचं स्वत्व आहे तयाचा एक राजकीय प्रवाह जन्माला येऊ लागला तो म्हणजे संघ भाजप शिवसेना . दोन दशकात देशाचं राजकारण पालटून एक हिंदू किंवा भारतमातेला हार घालणारे भारतीयता मानणारे लोक विसाव्या शतकाच्या अंती सत्तेत आले. फारसे बदल करणारी ती सत्ता ठरू शकली नाही कारण स्वबळ नवहते.पण आताच्या सरकार कडे स्वबळ असूनही भारताच्या होणाऱ्या शाश्वत हानी स थांबविणे यांचे उद्देश नाही हेच दुःख.

काय आहे ग्रीन कॉरिडॉर?

मित्रानो गझवा ए हिंद अथवा मुघलिस्तान वा ग्रीन कॉरिडॉर हे एकाच दुकानातले वेगवेगळ्या प्रकारचे बूट आहेत. उद्देश एकच आहे मजहबी साम्राज्यवाद. सम्पूर्ण भारत विशेषतः नर्मदा अथवा त्याखालील भाग हा हिंदू बहुल असल्यामुळे सहजतेने व्यापता येणार नाही म्हणून जिथे भारतीयत्वाची मुळेच सम्पलेली आहेत तो भाग, जिथे हिंदू समाज अल्प आहे तिथे आपली कारस्थान करायची. पाकिस्तान ते बांगलादेश काश्मीर ते बंगाल मार्गे जोडायचा हा मूळ उद्देश आहे.आणि एक मुस्लिम मजहबी साम्राज्य परत उभारायचे जे यांचा पूर्वज औरंगजेब उभारून गेला होता.

आणि का असू नये हीच राज्ये ? मित्रांनो देशातील 70 टक्के सूनन्त म्हणजे मजहबी लोकसंख्या हि याच भागात आहे. एकट्या उत्तर प्रदेशात तब्बल 5 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे. बिहार बंगाल घाटी तर सुभान अल्लाह स्थिती.इतल्या राजकारण्यांनी च उर्दूचा द्वितीय भाषेचा दर्जा दिलाय. इथल्या मजहबी जमातीचे वाहबीपण गेली 70 वर्ष वाढलंय आणि या सर्व घडामोडींच केंद्र आहे रोहिलखण्ड म्हणजे हरित प्रदेश अथवा पश्चिम उत्तर प्रदेश जिथे अलिगढ आहे तो भाग जवळपासचा  प्रदेश समजुया. मराठे अवध व रोहिलखण्ड तसेच सोडून पंजाबात गेले नसते तर कदाचित आजचा दिवस वेगळा असता. हरित प्रदेशातल्या 10 जिल्ह्यामधून जवळपास सर्व गावे हि अखिलेसुद्दीन चं सरकार मध्ये हिंदू मुक्त केली गेली.अक्षरश: हिंदू हाकलून लावले .आणि तेही लढायचं विसरून अन्य राज्यात घुसले. आज 8 वर्षांनी परत योगी सरकार वेगळी लोकगणना करतेय.इथली प्रचंड मजहबी लोकसंख्या हा ग्रीन कॉरिडॉर बनवून च सोडेल.


हिंदू सत्तेने काय करणे ?

मग भारत कसा रक्षिणे यावर विचार केला असता भारताची प्रचंड वाढत असलेली लोकसंख्या नियंत्रित करणे, सर्व धर्मांना एक संविधान एक व्यवस्था लागू करणे , लोकसंख्या वाढीतून होणारा वसाहतवाद थांबविणे, स्वतंत्र न्याय व तपास व्यवस्था निर्मिणे हे खूप गरजेचे आहे पण व्यर्थ.
जर खरच भारत वाचविणे हिंदू सत्तेच्या मनात असते तर असे काही झाले असते पण केवळ राजकारण केले गेले.,


देशात मजहबी व भाषीय वसहतवादाची पराकाष्ठा होतेय पण रामाचे जादे सत्ता माजोरीत मग्न आहेत.


असो!
जय भारत।

Wednesday, 30 January 2019

30 जानेवारी : नेत्र उन्मीलन दिवस


मित्रांनो आज देशाचे अर्धमान्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्मृती दिन. गांधी नावाचं वादळ सहस्र वर्षे गाजतच राहणार आहे. पण सत्य काय नि असत्य काय याचा पूर्वाग्रह सोडून घेतलेला राजहंस पद्धतीने घेतलेला आढावा.


हा देश न्यूनाधिक 1000 वर्षच्या गुलामी चा बळी ठरला होता. तेव्हा इंग्रज आले. हळूहळू पसरले गोड बोलून अधिकारी झाले.
आणि यात महाराष्ट्र सोडून अन्यांचा अधिक सहयोग होता. मोगलाई ओसरून फिरंगीयत यायला मराठा व शीख सत्तेच्या व्यतिरिक्त अन्य भारतीयांचं संपलेलं क्षात्रतेज सर्वात जास्त कारणीभूत आहे. थोरल्या छत्रपतींनी गादीवर आल्यापासून फिरंग्यांची चाल ओळखली व मराठ्यांनी 250 वर्ष हजारदा जस जमेल तसं हे इंग्रज थोपवून धरले. ब्रिटिश सत्तेत यायच्या आधी
मोठी मराठा -इंग्रज 1,2,3 अशी युद्धे झाली . शिखांशी युद्ध झाले मराठे 2 युद्धे जिंकले व तिसऱ्यांदा हरले.

 8  टक्के मराठी व 2 टक्के शीख लोकसंख्या शेवटी किती पुरणार होती संपूर्ण भारताला कारण या व्यतिरिक्त अन्य कोणतीही भारतीय सत्ता अस्तित्वात नव्हती जी भारतासाठी लढेल. जसं मराठा इंग्रज युद्ध इतिहासात आहे तसे बिहारी इंग्रज युद्ध का नाहीय?इंग्रज तामिळी हिंदी युद्ध का नाहीय? कारण हे कि भारताचं क्षात्रतेज पूर्णतः संपलेलं होतं. भारत  अंधश्रद्धा परंपरा जातीयता स्वत्वाच्या अस्तित्वाचा अभाव व महाराष्ट्र पंजाब सोडून अन्य भारतीय हे बनियवादी गोडबोल्या भिक्षुक शाही च्या मानसिक दास्यत्वाचा भाग बनलेले होते. जे दास्यत्व धर्माच्या नावे लादले गेले होते. यात 100 टक्के (मराठी शीख) सोडून अन्य भारतीय लोकांचा विशेषतः अन्य भाषीय क्षत्रिय समाजाचा दोष होता.अशा परिस्थिती मध्ये इंग्रजांनी विवेक स्वत्व हरलेल्या भारतीयांनाच हाताशी धरून देश हडपला.



आणि मग सुरु झालं इंग्रजांच्या विरोधी युद्ध 1885 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नावाची संघटना स्थापन करण्यात आलं.खरं तर ही संघटना पण ब्रिटिशांनी च अदृश्य स्वरूपात बनवली होती.त्यांचा मागून हात होता. सुरेंद्रनाथ बनर्जी ते लोकमान्य टिळक 1920 पर्यंत हि संघटना बरोबर भारतीयांच्या काही प्रमाणात जगलेल्या क्षत्रतेजाच्या मार्गाने चालत होती पण 1920 ला टिळकांची संदिग्ध स्थितीत हत्या झाली व मोहनदास गांधी नावाचे एक गोडबोले व्यक्तिमत्व काँग्रेस चे अध्यक्ष झाले. इथूनच  भारत किमान 1000 वर्ष स्वतःच्या व्यवस्थांचा गुलाम ठेवण्याच्या ब्रिटिश हेतूला साध्य होण्याचे काम सुरु झाले व फळले.



युरोप ने जगावर सत्ता का गाजवली व आजही आर्थिक राजकीय दृष्ट्या युरोप अमेरिकेची सत्ता जगावर का आहे माहितीय? युरोप विशेषतः इंग्लड कधीच अविचारी युद्ध करणारी जमात नवहती त्यांनी कायम ज्यांच्यावर अधिकार गाजवायचा आहे त्यांचा विशेषतः त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला व नन्तर गुलामी लादली. भारतात सत्ता मिळूनही लोक विरोध करतच होते म्हणून एक असं व्यक्तिमत्त्व स्वतःचा विरोध करणाऱ्या संघटनेला त्यांनी आणून दिले जे व्यक्तिमत्त्व फार गोडबोलून लोकांवर अक्षरमोहिनी टाकणारे होते.आपले बापूजी.



गांधींनी काँग्रेस हातात घेऊन जहाल गट च सम्पवला तत्कालीन अशिक्षित मागास भट भिक्षुक शाही बनियवादाला बळी सहज पडू शकणारा हिंदू समाज विशेषतः गंगे काठचा भारत शब्दांनीच गुलाम केला परदेशी आक्रमकांना 2000 वर्ष हाकलून लावणारा क्षात्रतेजाचा भारत स्वतःच्याच माणसाच्या मोजक्या शब्दांनी गुलाम झाला. इंग्रजांना तरी बंदुका लागल्या पण इथल्या गोडबोल्या बनिया लोकांनी राम कृष्ण या क्षत्रिय आस्थांचं अमर्याद बनियाकरण करून इथल्या इथेच करोडो लोक दास केले.आणि मनमुराद खेळ मांडला शोषणाचा. 




Gandhi
Diluted the spirit of freedom amongst Hindus .
He did psychological Subversion of Crores of Hindus who are so numb and still dumb to realize the Truth of their own Dharma Shastra National identity... Their own philosophy he made them to forget forever.



मी पहिला परिच्छेद गांधींच्या जन्माच्या आधीची हजार वर्षे भारताची पार्श्वभूमी का मांडली? लक्षात आलं का?
गांधी हा एक माणूस नाही एक (अ)विचार आहे जो इथे का रुजला याच कारण आहे की 1000 वर्षात मराठी पंजाबी सोडून 90 टक्के भारतीयांचं क्षात्रतेज कधीच संपलेलं होतं. धनुष्याने रावण वधणारा राम, सुदर्शन चक्राने दैत्य विनाश करणारा कृष्ण व असेच अन्य सर्व हिंदू आस्थेचे प्रतीक क्षणात विसरून अगदी त्यांच्याच नावाने एक झापड एक गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करा अशी शिकवण हिंदूंनी स्वीकारली. का?



जी समाज खूप अशिक्षित व मागास झालेला असतो तो असाच गुलाम बनतो.गांधी आजही मेला नाही तो आजही हिंदूंच्या संपलेल्या क्षत्रतेजाचे प्रतीक आहे. हिंदू सत्तेत येऊनही अति सहिष्णू आहेत, जगात 4थी मोठी सेना असूनही चारिकडून आक्रमण सहन च करतोय आपण या राजकीय क्षात्रतेजाच्या अभावाचे कारण बनून गांधींचं उभा आहे. हिंदूंमधली अति सहिष्णुता पुरोगामित्व हे हि याच गांधीवादाची देणगी आहे.
ब्रिटिश गेले पण भारताला लुटणारे सत्ता तंत्र कायम ठेवून, गेल्या 70 वर्षात करोडो हिंदू संपले ज्याचा स्वतः हिंदूंनाच हिशोब माहित नाही माहित झाल्यास मान्य नसतो.धर्माच्या नावावर तथाकथित संत पुजार्यांनी खूप नुकसान केले देशाचे जे आजही सुरु आहे. पण महाराष्ट्र लढला हिंदूंना जागवून आजही उभा आहे स्वतःचे सरणारे अस्तित्व विसरून हिंदुत्वाच्या भगव्यासाठी कायम निश्चल मंदार मेरू सम .


गांधी चांगला कि वाईट हा आज प्रश्नच नसावा. सत्य काय आणि असत्य काय ते च कळलं तर पुरे.
आज 70 वर्षात हिंदू जागे झाले आता 2 ऑक्टोबर ला शास्त्रीजी जास्त असतात सोशल मीडियावर.थांबा थोडं आणखी लोक जगातील.


जे लोक म्हणतात गांधिंमुळे करोडो लोक मारले गेले मला त्यांना विचारायचं कि हे करोडो क्षत्रतेज ज्या भागात नाहीत त्याच भागात का मारले गेले? त्यांच्या क्षात्रतेजाच्या अभवाच काय? त्यांचा दोष नाहीय का? 5 टक्के मुस्लिम कट्टरतेने 25 टक्के होऊ शकतात तलवारी गाजवणाऱ्या दुर्गा भवानीचा धर्म मानणारे हिंदू का ओसरत जातायत??



त्या 1947 च्या हत्या ज्या बघून नथुराम चे मन व्याकुळ झाले त्यांचा दोष गांधींच्या आधी आणि जास्त अफगाण ते ढाका या पट्ट्यातल्या हिंदूंच्या संपलेल्या क्षात्रतेजाचा आहे.
मराठी माणूस ज्या साठी लढतोय ते कालही अन्यांमध्ये नवहते आणि आजही नाही.

शेवटी गांधी भारतीयांच्यातल्या सम्पलेल्या क्षत्रतेजाचं प्रतीक आहे


आज त्यांना दक्षिणेवर त्यांचं व त्यांच्या मुसलमानी भाषेचं आधिपत्य हवंय कुठलंच हिंदुत्व नकोय .
असो।


घाई घाईत खूप क्रम बदलले असतील पण बघा डोळे उघडून
एखादा समाज खूप काही हरवून बसला असेल तरच एका माणसाचा इतका गुलाम होऊ शकतो कि स्वतःला शत्रूपुढे सम्पवून घेईल पण विरोध करणार नाही.



जय भवानी जय शिवाजी🏹🚩

Wednesday, 26 December 2018

या दैवा या नशीबा


जेव्हापासून मनुष्य समाज अस्तित्वात आला दैव,भाग्य आलंच तसेच सुदैव आणि दुर्दैव हेही आलंच. काही चांगलं झालं आयुष्यात तर ते सुदैव म्हटले जाते आणि वाईट घडलं तर दुर्दैव पण खरचं हे दैव सुदैव दुर्दैव असतं का हो? कि हाताच्या रेषांपेक्षा हाताने केलेलं प्रत्यक्ष काम च भविष्य ठरवत असतं? बरेच लोक असं म्हणतात दैवावर विश्वास ठेवून काय होते काही ठिकाणी प्रत्यक्ष देव च होऊन बदल घडवावा लागतो मग तो आत्मिक असो अथवा सामाजिक ! 


म्हणजे दैव आपल्या हातात असतं का हो? कि ते अदृश्य असतं येणाऱ्या प्रत्येक क्षणातून व्यक्त होणारं असतं. हा शब्द सुद्धा देव या शब्दापासून आलाय म्हणजे कोणीही न पाहिलेला पण असलेला तो राघव तो मयुरेश तो हरी आलाच इथे मग त्यासोबत पाप पुण्य सुद्धा आलंच कि.
शेवटी माणसाचं कर्तृत्व हेच येणार काळ सुदैवी कि दुर्दैवी याचा निकाल देत असतं पण कधी यापेक्षा भिन्न देखील घडत असतं जे अथक प्रयत्न करूनही प्राप्त होत नाही. तिथे मग दैव आड आलं असं म्हणतो आपण नाहीतर कधी काही जमलं नाही तर दैवावर सोडून द्या असेही म्हणतो. आणि एक मस्त म्हण आहे "या दैवा या नशीबा" पण यातलं नेमकं सत्य काय याचा सांगोवा घ्यायचं ठरवलं तर हाती काही मिळेल का कि हि गुंतागुंत वाढतच जाईल ? तरीही आज ठरवलचं काहीतरी निष्कर्ष काढायचा याचा!
एक खरे उदाहरण घेतो . एखाद्या मुलाला परीक्षेत पुढचा मुलगा हुशार असला तर चांगले मार्क येतात तर एखाद्याला स्वतः खूप अभ्यास करूनही स्वबळावर लढुनही तेवढे मार्क मिळत नाही.


मग यात कर्तृत्व हरते आणि दैव जिंकते आणि जो जिंकतो त्यासाठी ते सुदैव ठरते पण अभ्यास करूनही यश न मिळणारा मात्र दुर्दैवाचा बळी ठरतो.
आता आपली मुंबई च बघा ना छत्रपतींच्या काळापासून आपली आहे पण 1960 ला ती महाराष्ट्राला मिळूच नये असे घाट बांधले गेले पण आपण जिंकली मुंबई पण तरीही भरपूर संख्येत असलेले गुजराती जमिनी व आर्थिक साम्राज्यवाद सोडायला तयार नाही.गेल्या 70 वर्षात कोट्यवधी उत्तर भारतीय व अन्य राज्यातून लोक आले पण तरीही मुंबई मराठी माणसांनी राखली अगदी 2017 च्या लहरीत सुद्धा  हे आमचं कर्तृत्व च म्हणावं  लागेल.पण आमचेच लोक तिथल्या गुजराती व उत्तरीय लोकांना भडकवून आमच्याच हातातून आमचं राज्य जावं असा प्रयत्न करतात हे ह्या सह्याद्रीचं किती मोठं दुर्दैव ! 



ज्या मुंबई ने   सर्व जातभाषिय धार्मिय लोकांना करोडो च्या संख्येत स्थान दिलं त्यांनी मात्र मुंबई या काय दिलं? भाषेच्या आधारावरील मतदारसंघ , जमीन घर नोकरी हवा पाणी सर्व मुंबई नि दिलं पण तिची भाषा इतकी अस्पृश्य वाटावी कि चक्क मतदारसंघ तयार करावेत हेच दुर्दैव!
अन्य राज्यात येऊनही एका वेगळ्या भाषा संस्कृतीचा ज्ञानकोश मिळत असतानाही तो प्राशन करता न येणे हे दुर्दैव .


आजही अवघ्या भारताला मुंबई मराठी लोकांची आहे हे मान्य नाहीय पण एवढं घुसनही ती आमचीच आहे.
बेळगाव च हि तसेच गेल्या 70 वर्षांपासून बेळगाव महानगर पालिका कर्नाटकात असूनही मराठी भाषिकांच्या समिती च्या नगर सेवकांच्या हाती आहे.या 7 दशकात आमचं बेळगाव खूप विस्तारलं. अन्य भागातून लोक आलीत लाखो च्या संख्येत शिवाय कानडी सत्तेनी कन्नड लोकसंख्या वाढावी याचा पुरेपूर प्रयत्न केला Uपण तरीही बेळगाव मध्ये सत्ता आपलीच आहे.हे झालं कर्तृत्व पण बेळगाव चा खटला तब्बल 50 हुन अधिक वर्षांपासून सर्वोच्चं न्यायालयात खितपत पडून आहे आणि म्हणून  आजही ते कर्नाटकात च आहे हेच दुर्दैव.



3 दिवसाधीच लिहिलेला हा लेख अपूर्णच वाटत होता.एक काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत होतं. कालच तसं घडलं.लेखाच्या पूर्णत्वाची हुरहूर हि आयुष्यभर मनाला छळणारी एक हुरहूर बनून जाईल असं वाटतं नव्हतं.
आयुष्यात लहानपणापासून असं कोणी असत कि जे आई बाबा पेक्षा जास्त जवळचं वाटतं. कारण तेवढा लाड केला जातो आपला त्या व्यक्तीकडून.जुने लोक खूप प्रेम करायचे आता नाही राहील तसं. आजवर अशी एकच व्यक्ती आयुष्यत आली जिने निस्वार्थ प्रेम केलं. मी पण खूप जीव लावला मी दूर म्हैसूर ला आणि ती आजारी नागपूरला .2 तारखेला भेटून आलेलो मी तेव्हा पण स्वास्थ्य  ठीक नव्हातंच पण 27 ला डॉक्टरांनी सांगितले फक्त 24 तास शेवटचे. मी सर्वात दूर तिचा सर्वात जास्त जीव माझ्यात पण मला कोणीही कळवलं नाही. Wstapp वर कळलं 28 ला रात्री ती गेली.खूप आटापिटा करूनही म्हैसूर ते बंगलोर व मग नागपूर अशा प्रवासाला दुपारी 4 पन्नास चं विमान मिळालं. 7 पर्यंत नागपूरात घरी आलो पण तोवर मला कवटाळणारे ते हात,जे म्हणीन ते आणि जेव्हा म्हणजे अगदी रात्री 2 वाजता पण शिरा म्हटलं तर शिरा करून देणारा तो वात्सल्याचा मूर्तिस्वरूप देह काष्ठग्नि मध्ये जळून खाक झाला होता. कायमचा मला न दिसण्यासाठी .एखादी व्यक्ती दिसूच नये कायमची असे दुःख नाही आणि त्यास शेवटचं आपल्याला बघता येऊ नये हे सर्वात मोठं दुर्दैव. दिवसाला प्रत्येक क्षणी कधी डोळ्यातून तर कधी मनातून फक्त आसवे देऊन गेली ती. माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं  दुर्दैव हेच आहे.😭


शेवटी सत्य हेच आहे की कर्तृत्ववान असायलाच हवं पण नेहमी कर्तृत्व अथवा कर्म तुमचं सुदैव अथवा यश ठरेल असं नाही. 
या दैवा या नशीबा हेच अंतिम सत्य.

Sunday, 2 December 2018

मराठा आरक्षण : एक मृगजळ


नमस्कार...!
मित्रांनो आपल्या विधानसभेने नुकतेच मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाचे विधेयक पारित केले आणि सोशल मीडिया म्हणजे सामाजिक माध्यमांमध्ये महाराष्ट्राच्या क्षमस्व उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यावर अक्षरश: शुभेच्छांचा पाऊस पडला अथवा पडला गेला.
एखादी गोष्ट ट्रेंड कशी करायची हे बनिया मानसिकतेला ठाऊक असते आणि ते त्यातच निष्णात असतात. शेवटी सामान्य जनतेस बनवणे हेच राजकीय जमातीचं मुख्य उद्देश असतं. आपण बनवलो जातोय याची तिळमात्रही जाणीव नसते.


आरक्षण दिलं याचा असा इतका उदो उदो केला गेलाय कि जणू स्वर्ग अवतरलाय पृथ्वीवर! मुळात साडेचार वर्ष केंद्राचे आणि 4 राज्याचे एकच सत्ता असताना इतका वेळ का लागला व हि आरक्षणे फक्त घोषणा पुरती निवडणुकांच्या तोंडावरच का दिली जातात? त्याआधी का नाही? आधीच्या सरकारने सुद्धा असेच केले.


सध्याच्या मराठा आरक्षणाचा सोपा अर्थ हाच आहे की हे एक आभासी जळ आहे मृगतृष्णा सारखं. कारण राज्यघटना फक्त सामाजिक मागासलेल्या समाजास आरक्षण असावे अश्या सिद्धांतावर आधारलेली आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकणे अवघड आहे. कारण क्षत्रिय असलेला मराठा समाज हा गेल्या
कालखंडात मागे पडलाय. तो सत्ता प्रस्थापितांमुळे ऐतिहासिक काळात छळला गेलेला नाहीय त्यामुळे न्यायालय हे आरक्षण तामिळनाडू सारख्या धरतीवर मान्य करेल असं वाटत नाही. उच्च न्यायालयाने मान्य केले तरी सर्वोच्च न्यायालय ते मानेलच असं नाही.
आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे समजा हा 16 टक्क्याचा पांढरा कावळा दिसलाच तरी तो कितीसा लाभ देईल?


आकडेवारी अथवा संख्याशास्त्र अज्जिबात लक्षात न घेता अंदाधुंद पणे सरकारे सत्ता राबवत अथवा लुटत  असतात आणि सामान्य भोळीभाळी जनता देखील अशा अर्थहीन निर्णयास बळी पडते.


आता तर्कशुद्ध प्रमाणे संख्या अथवा आकडेवारी बघुयात.
मित्रांनो महाराष्ट्रात सरकारी क्षेत्रात एकूण 18 लाख पदे आहेत त्यातील साडे पाच लाख पदे स्वयंचल अथवा automation
मुळे या परकीय सत्तेने कायमची बंद केलीत म्हणजे आता केवळ 12 लाख सरकारी पदे आहेत त्यातील बहुतेक पदे आधीच भरलेली आहेत. शिवाय जी पदे रिक्त आहेत ती पैशाअभावी गेली 8 वर्षे भरली गेली नाहीयत. आता मामु ने 72000 पदे भरण्याचे आश्वासन दिलेय ते अजूनही प्रत्यक्षात उतरलेले नाही.

आणि हो यातही अट हि आहे की फक्त तोकड्या 5000 रुपयांवर 72000 तब्बल 3 वर्षे लोकांना काम करावे लागणार  आहे आणि त्यांनंतर त्यातील फक्त 12 ते 15 टक्के लोक कायम अर्थात पर्मनंट करण्यात येतील आणि सध्याच्या वेतन श्रेणि अथवा pay scale नुसार त्यांना पगार दिला जाईल.
याला लूट नाही म्हणायचं तर काय?


सरकारी आकडेवारी नुसार महाराष्ट्रात 42 लाख पदवीधर बेरोजगार आहेत. हा आकडा 2 वर्ष जुना आहे म्हणजे आताशी 50 लाखावर गेला असेल हा आकडा!
72000 हे एकूण बेरोजगारीच्या अवघ्या सव्वा टक्के पदे आहेत तेही 5000 रुपये पगार तीन वर्षे नन्तर termination म्हणजे संपुष्टात आणले जातील. मुळात प्रश्न हा आहे की सरकारी क्षेत्र हे अवघे 1 टक्का पदांचे आहे तरीही त्यामागे आजही भारतीय जनता एवढी का भरवशाने मागे जाते अगदी आंधळ्या पणे हेच कळत नाही! सरकारी पदे अवघे असताना त्याच्या 100 पट लोक आवेदन  करतात आणि त्यातले 90 टक्के छाटले जातात. पैसे जातात रे वेगळे.


आपण सर्वच भारतीय गेली 70 वर्ष कायम सरकारी नोकरीच्या मागे येड्यासारखे धावतोय. फक्त गुजराथी मारवाडी जैन पंजाबी सिंधी पारशी आणि झुंडीत घुसणारे उत्तरीय लोक सोडून.


महाराष्ट्र देशातले सर्वात औद्योगिक दृष्टीने प्रगत राज्य आहे. दिल्ली सरकारची 25 टक्के तिजोरी एकटा महाराष्ट्र भरतो.
भारताच्या अर्ध्या लोकसंख्येची अथवा राज्यांचे वार्षिक बजेट
आपण देतो मग तरीही राज्यकर्ता मराठा समाज मागे का?
मागे सांगितल्याप्रमाणे 1 टक्के सरकारी क्षेत्र आहे म्हणजेच 99 टक्के खासगी क्षेत्र आहे. आणि सुदैवाने एकट्या महाराष्ट्रात देशातील 25 टक्के उद्योग आहेत. किती हे भाग्य पण माहितीये का? या खासगी क्षेत्राला आपण ,आपल्या सरकारने जागा दिल्या राज्यात उद्योगांसाठी सर्वात सुकर मार्ग तयार करून दिला
म्हणूनच सगळं जग सह्याद्रीच्या कुशीत गुंतवणूक करतंय पण सर्वात मोठे दुर्दैव हे कि या 99 टक्के असलेल्या खासगी क्षेत्रात आपल्याच स्थानिकांना नोकऱ्या देण्यात याव्या अशी कुठलीही अट अगदी आधीपासून आपल्या अति सर्वसमावेशक राज्यकर्त्यांनी ठेवली नाही आणि आज त्याचेच फळ आपण भोगतोय. मी हे का म्हणालो हे पुढंच वाचून कळेल.


1960 मध्ये स्थापित झालेला महाराष्ट्र आज वर कायम परकीयांच्या झुंडीचा बळी ठरला आहे. 2011 च्या जनगणनेत मराठी लोकसंख्या अवघ्या 69 टक्क्यांवर आलीय आपण एक तृतीयांश संपलोय पण याची जाणीव च आपल्याला होऊ देऊ नये याचा पुरेपूर बंदोबस्त प्रसार माध्यमे, जातीय व धार्मिक संघटना , पक्ष यांनी करून ठेवलाय.
2001 मध्ये आपल्या राज्यात हिंदी+उर्दू भाषिक 7 टक्के होते ते
2011 मध्ये तब्बल 18 टक्क्यांवर गेलेत म्हणजे 11 टक्के वाढ फक्त 2001-2011 या अवघ्या दहा वर्षात ! टक्क्यांनी सांगायचे तर तब्बल 1 कोटी वीस लाखाच्या जवळपास पर राज्यातून लोक आलेत या दहा वर्षात. एवढे कशे पोसले गेले महाराष्ट्रकडून? आणि स्वतःच्याच समाजाला सर्वात जास्त शिक्षण संस्था व उदयोग असलेले राज्य आरक्षण मागावयास भाग पाडते किती हा राजकीय जमातीचा हरामीपणा!
आजवर परप्रांतीयांना न रोखणार सरकार होते आज त्यांना गोंजारून स्वतःची शाश्वत मतपेटी बनवणारे भाट सत्तेत आहेत.


12 कोटी च्या महाराष्ट्रात तब्बल 4 कोटींच्या वर अमराठी लोक आजमितीला राहतात. दोन छत्तीसगड अथवा दोन विदर्भ इतकी लोकसंख्या अन्यांची पोसली गेली अथवा घुसली म्हणून सुविधा व नोकऱ्यांवर ताण पडलाय.


आजही दिवसाला हजारो नोकऱ्या राज्यातल्या खासगी क्षेत्रात निघतात पण त्या इथल्या मूळच्या लोकांना का मिळत नाहीत याच उत्तर कोणीही देत नाही उलट हा प्रश्नच कोणी विचारत नाही. विचारला मी कि मला इंजिनाचा रिकामा डब्बा किंवा कृष्णकुंज चा समर्थन म्हणून हिणवले जाते पण स्वतः च्याच राज्यात रिकामे होतोय आपण संख्येने आणि खिशानेही याची जाणीव नाहीय आपल्याला। असो


मराठा व अन्य मराठी बंधूंनो खासगी क्षेत्रात कर्नाटक केरळ उत्तर प्रदेश सारखं 80 टक्के स्थानिक भाषा येणारेच असावे असं विधेयक जोवर महाराष्ट्रात येत नाही तोवर बेरोजगारी व गरिबी हे प्रश्न सुटणार नाही. आरक्षण मिळूनही ते एक टक्का नोकऱ्यांसाठी असेल. खासगी क्षेत्रात मराठी भाषिकांना आरक्षण हेच समाधान आहे. बघा आज तरी जात धर्म उजवे डावे अविचार सोडून महाराष्ट्राचा विचार करणार का?


आकडे अभ्यासा तर्क शुद्ध अभ्यास करा मग कळेल.इथे अन्यांमुळे अस्तित्वच संपतंय.
🚩🚩🚩

Friday, 28 September 2018

Invention Of Reliable source of electricity By Ancient Indian Scientist Agasti Rishi.

Invention Of Reliable source of electricity By Ancient Indian Scientist Agasti Rishi.

 विद्युत उत्पत्तीचा शोध : वैदिक वैज्ञानिक अगस्ती ऋषी

Danielle Cell In ancient Indian Way.


"त्वम् ज्ञानमायो विज्ञानमयोसि" असे एक वाक्य अथर्व शीर्षात आहे. विज्ञान हा शब्द आणि त्याचा सुयोग्य अर्थ  आदिकाळापासून भारतीयांना ज्ञात होता. आपले सर्व ऋषी हे वैज्ञानिक च होते. जुने संस्कृत
ग्रन्थ हे विज्ञाचा खजिनाच आहे।
आज आपण विद्युत उत्पत्तीच्या शोधाबद्दल माहिती घेणार आहोत. हजारो वर्षांपूर्वी एक महान ऋषी होऊन गेले त्यांचे नाव महामुनी अगस्ती. या ऋषींनी आपल्या अपार तपस्येने जे ज्ञान प्राप्त केले ते अगस्ती संहिता या ग्रंथात सामावलेले आहे.
त्यातील काही श्लोकांनुसार विद्युत उत्पत्तीचा शोध हजारो वर्षी आधीचाच आहे हे सिद्ध होते. त्यातील एक श्लोक ज्याचे विवरण आपण पुढे अर्थसहित बघणार आहोत त्यात श्लोकात विद्युत घटबद्दल माहिती दिलेली आहे. हा असा विद्युत घट नागपूर येथील स्वदेशी विज्ञान संस्था या संघटनेच्या माध्यमातून नागपुरातील प्राध्यापक श्री.प्रशांत होले यांनी प्रायोगिक रीतीने सिद्ध करून दाखविला.


                IN OUR GREAT WAY OF LIFE TO WHICH WE CALL HINDU. RUSHIS AND MUNIS ARE ALWAYS WORSHIPPED.  TECHNICALLY RUSHI MINS SCIENTIST. WE HAVE MANY  SUCH ANCIENT RUSHIS AND ONE OF THEM IS “AGASTI RUSHI”. HIS WOK IS GATHERED IN A BOOK NAMED “AGASTI SAMHITA”. FROM THE MEANING OF SOME SHLOKAS OF THE SAMHITA WE PREPARED AN ELECTRIC CELL CALLED AS “VIDYUTGHATAM”.  IT IS NOTHING BUT THE “DANIEL CELL” WHICH IS A RECENT INVENTION WHEN COMPARED TO AGASTI CELL.  THIS SHOWS THAT HOW SCIENTIFIC OUR ANCIENT INDIA WAS!

Introduction & Construction:  THE SHLOK GIVEN BELOW IS FROM AGASTISAMHITA WHICH HAS THE FOLLOWING MEANING.



“Place a cleansed copper plate in the clay pot. Apply layer of copper sulphate on it. Also scatter sawdust on it. Now place mercury dipped zinc plate on it.” we did the same and the cell is constructed as given below.




Description of Experiment: The two wires are connected through it to the voltmeter then we see that the cell exactly gives voltage of 1.01V. Which indicates the electric presence. we use simple clay pot for it and we added all the material as per the shloka.


The shloka further states that :

 “IF such hundred cells are connected then the electric power dissociate water into oxygen and hydrogen. The hydrogen gas when when filled in gas balloons and they are tied to spacecraft the craft goes upwards due to the lightest hydrogen .Also when this power is subjected to the solution of potash and water then gold and silver plating can be done.  ”

This power is called as ‘SHATKUMBHI’ i.e. SHAT-Hundred & KUMBHI-Pots.


Results And Graphs : Graphs indicates that when the experiment is performed with zinc the internal resistance is half of with amalgam. The cell exactly gives 1.01 Volts.

Conclusion : The cell is very effective. We can firmly say that india is the epicenter of science from ancient period or the complete world had made such inventions in recent 200 years which we knew from thousands of years. The shloka also gives very essential info about lightest nature of hydrogen and flying the spacecraft by using hydrogen gas. Also gas balloons were known to us. Its very useful and admirable work of our rushis which the modern world must be aware of.

{John Frederic Daniell

London, England. A great advance in battery technology was the invention of what came to be known as the Daniell cell, which John Frederic Daniell made public in 1836. It was the first reliable source of electric current.}



हेच संशोधन जॉन डॅनियल ने 1836 साली एका सेल चा शोध लावून केले. ज्याला आधुनिक विज्ञान जगतामध्ये प्रसिद्ध अशा डॅनियल सेल च्या नावाने ओळखले जाते.
वरील माहितीववरून हे सिद्ध होतेच कि भारतीयांना विद्युत शक्तीचा शोध फार आधीपासून माहित होता. हा विद्युत घट विद्युत उत्पत्तीचा विश्वसनीय स्रोत आहे.पण विद्युत निर्मिती साठी पाणी जमीन आदी प्रकृतीचे दोहन होते आणि तेही अचक्रीय स्वरूपाने म्हणूनच असे विज्ञान जे अप्राकृतीक आहे ते आपल्या आदी पुरुषांनी नाकारले.

© Sagar Ghorpade