Wednesday, 7 December 2016

म्हणे मराठे शुद्र



काल जय महाराष्ट्र वर मराठा आरक्षणा बद्दल एक चर्चा बघत होतो . मला वाटत निखील वागळे ला तिथूनही सोडचिठ्ठी मिळाली .काहीही असो त्या पत्रकारामधे अवघ्या दोन महिन्यात टीआरपी उचलण्याची क्षमता आहे .जय  महाराष्ट्र हि वाहिनी आणखी लोकांपर्यंत वागळे मुळेच पोचली .शेवटी काय आहे न प्रत्येक पत्रकार हा व्यक्तिगत स्तरावर चांगलाच असतो .प्रत्येक वृत्त वाहिनीचा वेगवेगळ्या विषयावर काही अजेंडा असतो तोच सेट करण्याचा प्रयत्न ह्यांना करावा लागतो .शेवटी ते हि तिथे नोकरीच करतात विचारे ! त्यांनाही मजुरासारखा तासाप्रमाणे पगार असतो . असो........!

 विषय होता मराठा आरक्षणाच्या च्या आजच्या म्हणजे ७ डीसेंबर च्या उच्च न्यायालयातील सुनावणीचा. शेवटी न्यायलय म्हणजे फक्त तारीख पे तारीखच आहे हे आता तरी सर्वांनी मान्य करायला पाहिजे निदान मराठा आंदोलकांनी तरी मानायलाच हवे . त्याचा तसा प्रत्यय सुद्धा आलाच असेल आज. दोन महिन्यांनी हि केस न्यायालयाच्या समोर आली सरकारने मेहनत करून प्रतिज्ञापत्र देखील सदर केले तेही २००० च्या वर पानांचे पण काय झाले तेच जे नेहमी होते आता पुढची सुनावणी ३० जानेवारी पर्यंत ढकलली गेलीय . ते प्रतिज्ञापत्र याचिका कर्त्यांना द्यावे असे सुनवण्यात आलेय .
या वरच चर्चा सुरु   होती . त्यात संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड , कोलशे पाटील म्हणजे माजी न्यायमूर्ती , स्वतः विनोद पाटील जे याचिकाकर्ते आहेत ते आणि एक देवळे  नावाचे व्यक्ती चर्चेला बसले होते .. आणि तो आपला ह(राम ) कदम सुद्धा होता .भाजप मध्ये गेल्यापासून  लय गोड बोलायला लागलाय पठ्ठा .... एकदम बनिया झालाय .. मनसेतला  मराठा भटजींनी बाटवला ..आणि हा संधिसाधू मस्त भूमिका मांडत होता . 

काही नाही चर्चा नेहमी चालते तशी सुरु होती .
काही वेळानी प्रवीण गायकवाडला त्याचे मत विचारण्यात आले . तेव्हा तो काय बोलला ते ऐकून भारी कीव आली मला ........ बघा तो की म्हणतो ते –

या गायकवाड महाशयांनी म्हणे एक पुस्तक लिहिलंय “मराठे शुद्र” अश्या नावाचे ! त्यात आदिकालापासुनच्या दाख्ल्यान्द्वारे  सिद्ध केलाय म्हणे कि मराठे हे शूद्रच होते . त्याच्या आधारासाठी पुढील पैलू देण्यात आले त्याचे सविस्तर खंडन करण्यासाठी हा ब्लॉग

  १ .  भगवान परशुरामाने म्हणे २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली आणि म्हणूनच कलियुगात क्षत्रिय वर्ण लोप पावला . वैश्य वर्ण सुद्धा काही कारणांमुळे नामशेष झाला असेही वदले या महाभागांनी .म्हणूनच मराठे हे शुद्र आहेत कारण कलियुगात दोनच वर्ण उरले एक ब्राह्मण आणि एक शुद्र .



प्रतिवाद :
गायकवाड  आपण भगवान परशुरामांना मानता त्यांचे कार्य मानता हे ऐकून खूपच आश्चर्य वाटते मला . एकीकडे म्हणायचं कि हिंदूंच्या सर्व पुराणकथा या भाकडकथा आहेत .यांचे सर्व धर्मग्रंथ अंधश्र्द्धेनी भरलेले आहेत .राम कृष्ण झालेच नाही हनुमान झालेच नाही.खर्च एक वानर आकाशात उडू शकतो का असेही म्हणता तुम्ही लोक. पुष्पक विअमा मंत्रसिद्धी या सर्व गोष्टी म्हणजे थोतांड आहेत असे नेहमीच ब्रिगेडी पुरोगामी लोकांकडून सांगण्यात येते .
मग प्रश्न असा पडतो कि परशुरामाने सर्व पृथ्वी नि:क्षत्रिय केली हे तुम्ही कसे काय मानता? हि तर स्पष्ट शब्दात अंधश्रद्धा आहे . म्हणजे पृथ्वी हि हिंदूंना अगदी पुरांकालापासून  माहिती होती यातून हेही स्पष्ट होतेच. जर हंदू धर्म ग्रंथ हे ब्राह्मणी थोतांड आहे तर मग हे कसे मानले जाऊ शकते ? अआदिकालात कोणी परशुराम झाला मुळात हीच अंधश्रद्धा आहे कारण तुमच्या नुसार संस्कृत भाषा वापरून हे सर्व थोतांड रचलेले आहे न? यालाच तर आ ह काळोखे साहेब संस्कृत भाषेचे गौडबंगाल म्हणतात . एकूणच काय तर आम्हा हिंदूंपेक्षा तुम्हीच जास्त पुराणमतवादी आहात.तुमचे हे रेकॉर्डेड अभिमत तुमची पुराणमतवादी भूमिका स्पष्ट करते .

बर आता माझ्या सर्व वाचकांनो मला सांगा बर ज्या पुराणकथा आपण पहिल्या नाहीत फक्त ऐकल्या वाचल्या आहेत त्यावर विश्वास ठेवणे  योग्य कि  अयोग्य ? म्हणे कोणी परशुराम झाला होता ज्याला विष्णूचा सहावा अवतार मानण्यात येते .पृथ्वीवरील काही क्षत्रिय सगळेच नाही ह काही क्षत्रिय म्हणजे राजे खूप माजले होते अत्याचारी झाले होते त्यांचा बिमोड करून जनतेला सुख व धर्माचे शासन मिळावे म्हणून विष्णूने अवतार घेतला .तोच हा परशुराम अवतार . जमदग्नी ऋषी व रेणूक राजाची कन्या रेणुका यांच्या पोटी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला तो म्हणजे परशुधारी राम परशुराम .
यांची आई राजकन्या होती आणि वडील ऋषि होते .ब्राह्मण म्हणून जन्माला आले आणि परशु हे शस्त्र घेऊन निहित कार्य पूर्ण केले म्हणूनच यांना इदं ब्रह्मम इदं क्षात्रं किंवा शापादपि शराद्पि असेही म्हणतात . जर प्रवीण गायकवाड यांचे नुसार      हे पुराणातले थोतांड सत्य मानले तर  परशुरामांनी २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली हे मानावे लागते.

जर असे मानले तर प्रश्न असा पडतो कि एकवेळ पृथ्वीला नि:क्षत्रिय केल्यावर म्हणजेच सगळे क्षत्रिय मारल्यावर पुढच्या २० वेळी मारायला क्षत्रिय उरणारच  कसे?  बर असे मानले कि फक्त पुरुष मारले बायका पोरांना हात सुद्धा नाही लावला तर मारलेल्या क्षत्रियांचे कारटे मोठे होऊन क्षत्रिय व्हायला निदान २५ वर्षे तरी लागलेच असतील नाही का? २५  वर्षात साधारण एक पिढी जन्माला येते .

मग एकवीस पिढ्यांचा हिशोब बघुयात .

२५  वर्षे एक पिढी तर २१ पिढ्यांना :

२५ * २१ =  ५२५ वर्षे

अबब हे काय तब्बल ५२५ वर्षे लागली असतील परशुरामाला २१ पिढ्या संपवायला म्हणजे त्यांचे वय ५२५ वर्षे असणार . खर्च सांगा कोणीतरी ५२५ वर्षे जगू शकतो का ? विज्ञानानुसार तर ह्युमन लाइफ फक्त १०० वर्षाचे आहेत .म्हणजेच हि पुराने काहीही सांगतात आणि ह्यांच्यावर विश्वास ठेवणारे हे पव्या सारखे लोक आम्हा हिंदूंना अंधश्रद्ध म्हणत असतांना हे लोक स्वतःच किती मूर्ख आणि अंधश्रद्ध आहेत याचाच परिचय इथे येतो.




  २ .  १९०२ पासूनच म्हणे राजर्षी शाहू महाराजांनी मराठ्यांना आरक्षण दिले .ते आरक्षण १९५० येत पर्यंत गुप्तरीत्या नामशेष झाले अथवा करण्यात आले.


प्रतिवाद: शाहू महाराजांचे आधिपत्य फक्त कोल्हापुरात होते पूर्ण महाराष्ट्रात नाही प्रवीण भाई ...! १९५० पर्यंत दिल्लीचा नियम आणिक कायदा लागू झाला सर्वत्र ...! आणि मग हे मराठ्यांचे एका जिल्हा पर्यन्तचे आरक्षण काढले कोणी? निश्चितच तुमच्या लाडक्या नेहरूंनी ... आणि त्यावेळच्या यशवंतराव चव्हाण यासारख्या  दम नसलेल्या  सो कॉल्ड मराठा  महाराष्ट्रातल्या नेत्यांनी .  एवढी वर्षे दिल्लीच्या कॉंग्रेसची बूट polish केली तरी वर काय चाललाय ते लक्षात नाही आल तुम्हा मराठा नेत्यांना. ७० वर्षे मराठा समाजाला मतपेटी समजून तुम्ही त्यांच्या भरोशावर सत्ता उपभोगली आणि त्यांना मागास करून ठेवले . आता ब्राह्मण मुख्यमंत्री झाला म्हणून हे मोर्च्याच शहाणपण सुचत आहे .आधी का नाही विचार केला याचा . शोधून काढा कोणी तुमचे अधिकार हिरावले ते ... 


  ३ .  सातारच्या प्रतापसिंह छत्रपतींनी त्यांच्या काळात धर्मसंसद बोलावून धर्मचार्यांकडून मराठे हे शूद्रच आहे स्पष्ट केले होते .. व  निर्णय हाच झाला कि मराठे हे शूद्रच आहेत.


प्रतिवाद: हे  राजे लोकल होते त्यांना इंग्रजांनी फक्त नावची राजा हि पदवी दिली होती त्यांना वास्तविक राजे हे इंग्रज होते देशाचे आजही आणि तेव्हाही देशात कायदा प्रशासनिक मॉडेल हे इंग्र्जांचेच आहे . या राजावर हसायला येत मला ...
यांना छत्रपती शिवाजी व संभाजी राजांचे वंशज मानायचेच कसे? छत्रपतींनी सर्व नियम व्यवस्था स्वतः बनवल्या होत्या शूद्रांच्या घरी रोटी बेटी व्यवहार सुरु केले होते.सखु बाईंना दिले होते शूद्राला. शिवाजी राजांनी स्वतःला क्षत्रियकुलावतंस म्हणवून घेतले होते .हे ब्राह्मणी भट  धर्माचे गुलाम फुकाच्या धर्म संसदेचा दाखला देतात .आमच्याच उपकारावर जगणारे भटजी सांगतील का आमची जात ? अश्या राजा मुळेच समाज अधोगतीला गेलाय ......  
यांना मानणारे तुम्ही त्या भिक्षुकक्षाहीच्या त्या अधर्माच्या संसदेच्य निर्णयाला मानत आहात त्याचा पुरावा देत आहात वाह ... रे... वाह .. क्या बात है....?

पव्या तूच आमच्या पेक्षा जास्त गुलाम आहेस त्या भिक्शुक्षाहीच्या थोतंडाचा ..आणि आम्हाला चालले सांगायला म्हणे हिंदू धर्म थोतांड आहेत ब्राह्मण असे ण तसे . मग तूम्ही कशाला मानता  हे सर्व ??/  

  ४.  पुढे हे म्हणतात कि विविध आयोग जसे कि मंडळ आयोग आणि अन्य आयोगांनी मराठे हे जातीय आणी सामाजिक दृष्ट्या मागास आहेत. हे सिद्ध केलय.



प्रतिवाद: अरे एवढ सगळ होत तर मग तुच्या काँग्रेसनी सर्व पुराव्यानिशी वट हुकुम किंवा संविधान संशोधन करूनच सुधारित विधेयक मराठा आरक्षणाचे का नाही काढून घेतले?



  ५.  dr.पंजाबराव देशमुखांनी तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मराठ्यांना मागासच किंवा शूद्राच म्हटले आहे . मग मराठ्यांना आरक्षण का दिले जात नाही .
प्रतिवाद: मग आधीच द्यायचे होते कि आरक्षण .... 
का नाही दिले ? नाही तर नाही मग मराठ्यानंना गेली ७० वर्षे मागास का ठेवले .....




हे सगळे महामूर्ख लोक आहेत समाजाला फसवत आहेत ...



मराठा म्हणजे –

वाघाच्या जबड्यात घालतो हात मोजतो दात हि आमची जात .......

आणि ब्रिगेडी पुरोगामी लोकांची औकात फक्त हात वापरून घाण  घाण  लिहिण्याची...   





जय महाराष्ट्र 



No comments:

Post a Comment