परस्परविरोधे तू वयं
पंचश्च ते शतम् ! परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पंचाधिकम शतम् !!
असा एक संस्कृत
श्लोक आहे .एक गोष्ट तर संस्कृतचे धूर विरोधी सुद्धा मानतात कि या भाषेतले श्लोक
खूपच relevent आहेत आजही ..!
वरील श्लोकाचा अर्थ
असाय कि आल्यात जर परस्पर विरोध असला तर आपण केवळ पाचच राहतो आणि आपले शत्रू मात्र
१०० होऊन जातात . आणि दुसर्यांमध्ये
म्हणजेच शत्रुमध्ये जर परस्पर विरोध झाला तर मग मात्र आपल्याकडे १०५ एवढे
बळ राहते .अर्थातच काय एकीचे बळ महत्त्वाचे .. आजही हेच तंतोतंत लागू पडते
आपल्या भारतिय समाजाला .... गेली ७० वर्षे या देशातले दोन प्रवाह मुर्खासारखे
एकमेकांशी लढत आहेत वेगवेगळ्या विषयांवर आणि यामुळेच देश प्रचंड मागे गेलाय आपला ...
विश्वातल्या सर्व
शक्तींना कित्येक वर्षांपासून हि मोरपीसाप्रमाणे
वैविध्याची श्रीमंती असलेली भूमी हस्तगत करायचीय..... ..त्यासाठीच तर
breaking india हि strategy अमलात आंली जातीय . आणि देशातील काही सत्ताप्रीय लोक
यांनाच हत्यार बनवले जातेय ..असो....!
आज आपण आर्य –
द्रविड हि भानगड काय त्यावर बोलूयात ...!
गेल्या १००
वर्षांपासून भारतातल्या तथाकथित पुरोगामी ब्रिगेडी बहुजनी सुधारणावादी अंधश्रद्धा
निर्मुलन आदी so called महान काम करायचा आव आणणाऱ्या लोकांना गेली कित्येक वर्षे बक्कळ
पैसा पुरवून भारताला ईशान्य भारत विरुद्ध पूर्ण भारत , आर्य विरुद्ध द्रविड ,सवर्ण
विरुद्ध दलित ,उत्तरीय विरुद्ध दक्षिणी भारत यांबद्दलच्या भम्पक कथांद्वारे देशात
अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न होतोय.
आर्य-द्रविड सिद्धांत
म्हणजे नेमके काय?
इंग्रज या देशात आले
तेव्हा इथे अस्पृश्यता व जातीवादाचे स्तोम माजले होते.ते कमी करायचा प्रयत्न
करण्याऐवजी इथल्याच लोकांना आपले अस्त्र बनवून देशाला कायम अस्थिर करण्याचा कौरवी
डाव आखण्यात आला.फोड आणि झोड हि नीती......!
यासाठी ब्रिटिशांनी
काही पाश्चात्य इतिहासकारांकडून आर्य द्रविड सिद्धांताचा इतिहास लिहून घेतला व
जाणून बुजून त्या खोट्या वैज्ञानिक आधारहीन थेयरीझ णा देशातल्या दलित आदिवासी आणि
दक्षिणेतील तामिळी आणि इतर द्रविड लोकांना शिकविण्यात आलेय .आणि याचाच पुरेपूर फायदा
एवढी वर्षे काँग्रेसनी घेतला आणि अश्या मानसिकतेच्या पक्षांनी जनतेला मस्त लुटलंय .
यासाठी ब्रिटिशांनी aryan
invasion theory लिहून घेतली व गेले शतकभर देशातल्या लोकाना वेगवेगळ्या प्रकारे
तसेच शिक्षण व्यवस्थेत सुद्धा ती शिकवली
जातेय.हि थेयरी पुढील विचार उद्धृत करते.
१.invasion म्हणजे
आक्रमण .एक सिद्धांत हा लिहिला गेला कि , काही हजार वर्षांपूर्वी युरोप व मध्य
आशिया खंडातून आर्य नामक समूहाचे लोक मोठमोठ्या झुंडीत भारत देशावर आले.अर्थात या
आर्यांच्या झुंडींनी भारतावार आक्रमण केले.या आर्यांनी इथे रहात असलेल्या
मूलनिवासी लोकांवर ज्यांना द्रविड असे संबोधल्या जायचे त्यांच्यावर आक्रमण केले
आणि त्यांना आक्रमणाद्वारे लढत लढत भारतीय उपखंडाच्या खालच्या भागाला ढकलले गेले .
हे बाहेरून आलेले आर्य गोर्या रंगाचे होते कारण युरोप व मध्य आशियातील लोकसुद्धा
गौर वर्णीय आहेत.आणि द्रविड हे काळे होते
जे आता दक्षिण भारतात ढकलल्या गेल्यामुळे राहतात. अर्थात उत्तर भारतीय लोक हे
बाहेरून आलेले आक्रमणकारी आहेत आणि देशाचे
मूलनिवासी लोक द्रविड हे दक्षिणेत राहणारेच
आहेत. म्हणजे उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय हे एकमेकांचे जनुकीय genetical
brothers नाहीत.तर ते शत्रू आहेत अशी थेयरी मांडल्या गेली.
२.यालाच आडून आडून
एक असाही विचार लिहिला गेला कि ब्राह्मण समाजातले लोक हे बाहेरून आलेले आर्य आहेत.त्यांनी
आक्रमणाद्वारे वैदिक किंवा हिंदू धर्म सर्वांवर बळजबरीने लादला व सर्व बहुजनांना शुद्र
दलितांना आपले गुलाम बनवले व वर्षानुवर्षे छळले.
या दोन उपोद्घातांचे
आधार पुढीलप्रमाणे या थेयरी द्वारे मांडले गेले.
१.उत्तर भारतीय हे
गोरे आहेत तर दक्षिण भारतीय कृष्णवर्णीय आहेत.हे उत्तरेतले लोक बाहेरून आलेले आहेत
व दक्षिणेतले मूलनिवासी आहेत.
२.युरोपातील लोकांचा
रंग व उत्तर भारतीयांचा रंग हा एकसारखाच गोरा आहे. शिवाय काळे लोक युरोप व मध्य
आशियात शोधुनही सापडणार नाही.
३.मनुस्मृती द्वारे
लोकांना गुलाम केले ते ब्राह्मन्नांनी.म्हणूनच ते बाहेरचे आहेत.
४.यासोबतच एक आधार
हा आहे कि उत्तरेतल्या सर्व भाषा आर्य म्हणजेच संस्कृतोद्भव आहेत तर दक्षिणेतल्या
भाषा द्रविड म्हणजे देशाच्या मूळ भाषा आहेत.अभिजात भाषा आहेत. याला आधार हा दिला
गेलाय कि latin ग्रीक फ्रेंच इंग्लिश जर्मन आदी युरोपीय भाषा ह्या संस्कृतशी खूप
जास्त साम्य असलेल्या आहेत. म्हणूनच तर हिंदी बंगाली पंजाबी गुजराती अन्य सगळ्या
भाषांमध्ये एक लिंक दिसते तर मराठी तमिळ तेलुगु कन्नड मल्याळी या भाषा उत्तरेतल्यांना
बोलतासुद्धा येत नाहीत.कारण त्या भाषा
अत्यंत वेगळ्या आणि गोंडी भाषेसारख्या आंडू
पांडूच्या म्हणजेच कठीण भाषा आहेत. अर्थात दक्षिणेतल्या भाषा अभिजात आहेत.आणि
उत्तरेतल्या सर्व भाषा ह्या संस्कृतातून जन्मलेल्या आहेत.
५.उत्तरेतले लोक हे वैष्णव
आहेत कारण येथे विष्णूची पूजा जास्त होते
शिवाय उत्तर भारतीय लोक पिवळे उभे गंध
लावत असतात ज्याला विष्णूगंध म्हणतात. तसेच खालचे लोक आडवे पांढरे अथवा लाल गंध
लावतात.जे शिवगंध आहे. यावरून शैव वैष्णव
विवाद जन्माला घातला गेला. शंकराच्या भक्ताविरुद्ध विष्णूचे भक्त अशी
हिंदुन्म्ध्येच जुम्प्न्याचा डाव साधला जातोय.
६.शंकर हा आदिवासी
भटके विमुक्त भिल्ल साधे भोले लोक यांचा देव आहे.तर विष्णु हा बुद्धिमान चतुर पण
लुर्या व बनियावादी ,गोड बोलून मानसिक गुलाम करणाऱ्या शेटजी भटजींचा देव आहे असही
एक आधार आहे.
आर्य द्रविड सिद्धांताचे
खंडन :
आता आपण तार्किक
वैज्ञानिक व ऐतिहासिक दृष्टीने वरील सर्व गोष्टी कशा खोट्या ते सिद्ध करूयात .देशातले
डावे उजवे आणि इतरही लेखक इतिहासकार व राजकारणी ज्या महान संशोधकाचा वारसा सांगतात
तो म्हणजे मक्स्मुल्लर हा विदेशी लेखक. हा लेखक कडवा भारतविरोधी होता पण तो तेवढाच
बुद्धीवादिसुद्धा होता.यानेच जगात सर्वप्रथम वेदांची भाषांतरे केली.त्यात मुदाम
चुका केल्या.तो भारताचे शोषण करावे यासाठीच काम करायचा. आर्य आक्रमणाचा सिद्धांत यानेच
लीहिल .याच महाशयांना डावे पुरोगामी आजही पूजतात. पण या देशाला symbolism materialism अर्धवट पणा याची घान सवय लागलेली आहे.तसेच
झालेय. भारतद्वेष पसरवणाऱ्या साहित्याचा जनक हा मक्स्मुल्लर महाशयांनी मरतेवेळी खर
बोलावे या मान्यतेप्रमाणे एक खरे काम करावे अये एक काम केले ते असे कि ,शेवटच्या
काही दिवसात यांनी हे मान्य केले कि आर्य द्रविड सिद्धांत खोटा आहे.हा म्हणाला कि
कोण कुठून आले हे सांगता येतच नाही.दस्तुरखुद्द मक्स्मुल्लर महाशयांना हे मानावेच
लागले या मागे काहीही सत्य नाही.हे सर्व आपण प्रज्ञाभारती श्रीधर भास्कर वर्णेकर
महोदयांच्या भारतीय तत्त्वज्ञानावरील पुस्तकात मिळते.
हे सर्व कुभांड
रचणार्यांना आणि आजही ते मानणार्यांना एवढे सुद्धा लक्षात येत नाही.कि उत्तर भारतात
विशत असा हिमालय पर्वत आहे हिमाचल प्रदेश हे नावच मुळी बर्फावरून देण्यात आलेले आहे.आपल्याला
माहितच आहे कि काश्मीर हा बर्फाचा भाग आहे तिथे कित्येक महिने नुसता बर्फच बर्फ
असतो .शिवाय युपी बिहार एवढी थंडी अन्यत्र कुठेच पडत नाही. दार्जीलिंग कुल्लू मनाली
, सिक्कीम सोनमर्ग गुलमर्ग हि सगळी थंड हवेची ठिकाणे हि उत्तरेत आहेत कारण उत्तरेत
हिमालय पर्वत आहे आणि तिथे थंडी जास्त पडते याच कारणामुळे तिथले लोक गोरे आहेत.पण
याचा अर्थ असा सुद्धा होत नाही कि तिथे काळे लोक सापडणारच नाहीत .मायावती मुल्ला
मुलायम हे कलेच आहेत तर जयललिता गोऱ्या आहेत.शिवाय दक्षिण भारताचा नकाशा पहिला असता असे
लक्षात येत कि भारतीय उपखंड हा दक्षिणेला निमुळता होत जातो म्हणूनच तर त्याला
पेनिन्सुलर इंन्दिया म्हणतात . दक्षिण भारत उष्णकटीबंधात येतो .भौगोलिक संशोधन संस्थांनी
वैज्ञानिक आधारावर हे सिद्ध केले आहे कि दक्षिण भारतातवर सूर्यकिरणे तीव स्वरूपात
पडतात..
आता प्रश्न भाषेचा .तर हे एकदम सत्य आहे कि
दक्षिणेतल्या सर्व भाषा मराठी धरून अभिजात आहेत म्हणजेच क्लासिकॅल लांग्व्हेज आहेत
.पण याचा आधार विदेशी लोकांनी देण्यापेक्षा स्वतः दक्षिण भारतीयांची पुराने
धर्मग्रन्थ आणि तामिळी व अन्य भाषेतले २००० वर्ष जुने साहित्य शिलालेख त्यांच्या
मान्यता काय सांगतात ते म्हण्त्त्वाचे आहे.तामिळी समाजामध्ये हि मान्यता दृढ आहे
कि त्यांची भाषा हि भगवान कार्तिकेयाने व अगस्ती ऋषि ने त्यांना शिकवलेली आहे.अगस्ती मुनी हे कावेरी जी त्यांची पत्नी लोपामुद्रा आहे.तीच्य काठी बसून
आपले जीवन घालविले .यांनीच तमिळ भाषा जन्माला घातली व पुढे कार्तिकेयाने तिचा
प्रसार केला असे पक्के मत स्वतः तामिळी जनतेचे आहे . मुरुगन सुब्रामानिम स्वामी
किंवा कार्तिकेय या नावाने कार्तिकस्वामी महारष्ट्रात जसा गणपती आराध्य म्हणून
पुजला जातो तसा तिथे पुजला जातो.तामिळी लोक हे शैव कमी आणि कार्तिकेय पूजक जास्त
आहेत.त्यांच्या गळ्यात सोन्याचे लोकेत असते ज्यावर कार्तिकेयाची प्रतिमा कोरलेली
असते. ज्यांनी तामिल्नादूचा अभ्यास केलाय ते हे जाणतात .याशिवाय एक समाज असाही आहे
कि भारत मुनींनी भरतनाटयम तामिल्नादुंत लिहिले व साक्षात शंकराला पाचारण केले
तांडव करायला .येथे हे लक्षात घ्या कि भ्र्त्नात्याम चे दोन प्रकार आहेत एक तांडव
जे पुरुष करतात आणि एक लास्य जे स्त्रिया करतात.शंकरांनी तांडव करत असताना डमरू
वाजवला व त्यातून जे शब्द आले टी म्हजे तमिळ भाषा असाही एक समज रूढ आहे.
तसेच राहिला
भाषांच्या लिपीचा प्रश्न तर दक्षिणेतल्या सर्व लिप्या ह्या ब्राह्मी भाषेतून
विकसित झाल्या आहेत .हे द्राविडी लोकांनीच शोधून दाखवले आहे. शिवाय द्रविड हा
शब्दही संस्कृतच आहे.द्रविड म्हणजे द्रवाने वेढलेला.संस्कृत भाषेचे युरोपीय
भाषांशी विलक्षण साम्य निश्चितच आहे म्हणूनच भारतात फ्रेंच जर्मन शिकणारे लोक आधी
संस्कृत शिकतात म्हणजे मग या भाषा अगदी सोप्या होऊन जातात.महादेवन कृष्णन कल्याणं
हि संस्कृत नावे तर यांचीच जास्त असतात .तसेच महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
विश्नुसःस्र्नाम महालक्ष्मी अष्टक या सर्व स्तोत्रांना रेकॉर्ड करून गाण्यांच्या
रुपात दक्षिणेतल्या लोकांनीच आणले.उत्तरेत मध्य भारतात संस्कृत आणि संस्कृती यांचा
प्रभाव मोग्लांमुळे पुरता नष्ट झालाय हे सत्य मानावेच लागेल.
राहिला प्रश्न
ब्राह्मणाचा तर त्यातल्या काहिंनी गेली कित्येक वर्षे बहुजन्नांना लुबाडले आहे व आजही येन
केन प्रकारे लुबाडत आहेतच.पण या लुटीला फुले शाहु साने सावरकर यांरखे विरोधक कमीच का मिळाले?? शिवाय पेशवे घराणे आनंदीबाई जोशी संत द्न्यानेश्वरांचे आई बाबा तसेच सर्वच ब्राह्मण महिला यांनाही तितकेच लुटले गेले?? आणि गावापासुन शहरापर्यंतच्या जमिनदार ठाकुर पाटील देशमुखांनी दलितांना काय कमी लुटले? क्षत्रियांनी आपले काम बजावले नाही। म्हनुनच प्रबोधनकार ठाकरे म्हणतात ते भिक्षुकशाहीचे बंड झाले। अर्थात काही चांगले अपवाद वगळता.मुद्दामच माझ्या ब्लोगच
नावात काही शब्द घातलाय मी म्हणजे कोणालाही वाईट वाटू नये.ह्यावर अजूनही मला तोडगा
सापडला नाही माझा ब्लॉग वाच्नार्यांनो तुमच्याकडे यावर समाधान असेल तर सांगा.
आता शैव वैष्णव
विवाद . विष्णूच सगळे अवतार राम कृष्ण बुद्ध हे क्षत्रिय कुळात झाले .परशुरामाची
आई रेणुका हि राजाची लेक होती शिवाय परशुरामाने आयुष्यभर क्षत्रिय कार्यच केले
त्यामुळे विष्णु हा ब्राह्मणांचा देव नसून आम्हा क्षत्रियांचा देव आहे.क्षत्रियांना
म्हणजे राजा पाटील देशमुख उत्तरेतले ठाकूर राजपूत जमिनदार यांना उगाचच अन्नदाता
नाही म्हणत एवढ्या वर्षांपासून .जसा विष्णु पालान्हार तसा क्षत्रिय पण.राजापण. आणि
हो शाक्त्य गाणपत्य सौर कापालिक या संप्रदायाचे लोक मग काय अंटारटीका खंडातून
टपकले भारतात ?
सर्वात महत्त्वाचे
म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी annhilation of caste या पुस्तकात आर्य द्रविड
सिद्धांताला सरळ सरळ खोटे मानले आहे.एवढेच नाही तर who were shudras ? या पुस्तकात
चक्क शुद्र हेच क्षत्रिय असल्याचेही म्हटले आहे. काँग्रेसी व पुरोगामी पिल्ले
स्वतःला आम्बेडकर महोद्यांपेक्षा शहाणे समजतात का? काँग्रेसनी तर १९९१ मध्ये त्यांच्या
मृत्यु नंतर ४० वर्षांनी त्यांना भारतरत्न दिला तेवा नाही रे केकाटले तुम्ही ?? हे
सर्व लोक आंबेडकरी विचारांचे मारेकरीच आहेत .
उत्तर पुर्वेतले लोक
तिथल्या वातावरणामुळे थोडे चीनी दिसतात त्यांच्या तर हत्या झाल्या दिल्लीमध्ये मग
त्यासाठीप्न एखाद सिद्धांत लिहायला पाहिजे हो न? समाजात एकता आणायला काय केले
आजवर?
सगळेच भारतीय लोक हे
संस्कृतीने निश्चितच द्रविड आहेत . आर्य शब्दाचा अर्थ विवेकी असा होतो म्हणूनच
कृण्वन्तो विश्वमार्यम म्हणजे विवेकी समाज घडवणे. उत्तरेतून संस्कृती नष्ट झाली
मोगल तुर्क अफगाण शान कुशन हून यांचेमुळे उत्तरेत युरोपीय मानसिकतेचा प्रभाव आहे .गोरेपणाला
महत्त्व उत्तरेत आहे दक्षिणेत नाही.सगळे पंजाबी कपुरांचे पोट्टे फक्त गोर्या चामडी
मुळे हिरो बनवले जात आहेत .पण आर माधवन ट.गोपीचंद नितीन कुमार यांसारख्या खर्या
सुंदर कलाकरांना काहीही किंमत उरली नाहीय . उत्तर व मध्य भारतीयांनी निश्चितच
भारतीयत्व स्वताहून सोडले हे अगदीच खरे आहे .
हि भारतभूमी द्रविडांचीच
आहे यात काहीच शंका नाही.
महाराष्ट्र आर्य कि
द्रविड यावर पुढचे पारिजात ओव्न्यात येईल तूर्तास आपले आभार .....
तुमचा अभ्यास आणि दृष्टिकोण विशुद्ध आहे.खऱ्या अभ्यासकाचा. फक्त एकच सूचना आहे- आपले लेखन आणखी मुद्देसूद व संतुलित होऊ द्या.
ReplyDeleteतुम्ही तथ्य तेच मांडताय पण ते तावातावाने मांडताना संतुलन बिघडायची शक्यता असते. तेवढे सांभाळा.
sir my new bog address.... sangnaremana.blogspot.com
Deleteplease give me your blog address
धन्यवाद दादा ...असाच मार्गदर्शन करत राहा .... खरेतर मजकडे आणखी भन्नाट निकष आहेत द्रविड संस्कृती आणि भाषा ठरवण्याचे ...वेळेअभावी ते टाकले गेले नाही.... तेही लिहीनच थोड्या वेळाने ....
ReplyDeleteSundar Lekh aahe!! Khoop Avadla!!!
ReplyDelete