Friday, 18 November 2016

बिठूरचे नाना साहेब पेशवे(२) गेले कुठे?





बिठूरचे 
नाना साहेब पेशवे(२) गेले कुठे?


 मनोहर मळगावकर ह्यांचे पुस्तक वाचनात आले. सदर पुस्तक हे मराठीत वादळवारा ह्या नावाने भा .द. खेर ह्यांनी अनुवादित केल आहे.प्रकाशन वर्ष १९८४.  त्यातील हा सारांश इथे देतो आहे. थोडी पार्श्वभूमी सांगून मी थेट त्यांच्या कानपूर हून गायब होण्या कडे येतो.कारण अन्य माहिती आंतरजालावर बरीच उपलब्ध आहे. पण सदर कादंबरीच खर भाष्य त्या नंतरच्या घटनेवर आहे. 
 मळगावकर ह्यांच्या पुस्तकावर माझा विश्वास का?आणि मी हे इथे का देतोय? कारण  मनोहर मळगावकर ह्यांचे आजोबा पी बाबुराव हे त्याकाळी ग्वाल्हेर संस्थानात मंत्री होते.व हे नानासाहेब जे भारतातून सटकले ते ग्वाल्हेर च्या जयाजी शिंदे ह्यांच्यामुळेच.त्या वेळीस बाबुराव व नानासाहेब ह्यांच्यातील बोलणी हाच ह्या कादंबरीचा पाया आहे.हे पुस्तक नाना स्वतः आपल्याला सांगत  अस लिहिण्यात आल आहे. म्हणजे मी गेलो ,मी पत्र पाठवले अस. काय म्हणतात त्याला प्रथम पुरुषी एकवचनी तस.पण आता वेळे अभावी मी थोडक्यात सांगतोय.               

इस्ट  इंडिया कंपनी  सरकारने  दुसरे बाजीराव पेशवे ह्यांना पदच्युत करून त्यांची रवानगी बिठूर ह्या कानपूर नजीकच्या खेड्यात केली.  ब्रिटीश सरकारने त्यांना सालीना ५  लाख रुपये पेन्शन दिली.   बिठूर व आसपासच्या प्रदेशाचा संस्थानिक असा दर्जा दिला.पण  महाराजा हा किताब मात्र नाकारला. त्यांना एवढे दूर नेले कारण ब्रीटीशाना हि भीती होती कि जर ते मराठी प्रदेशात राहिले तर पुन्हा आपल्या विरुद्ध उभे राहतील.बाजीराव निपुत्रिक होते.नारायण भट व त्यांची पत्नी गंगाबाई ह्यांच्या धोंडोपंत ह्या पुत्रास  त्यांनी दत्तक घेतले. तेच पुढे नानासाहेब म्हणून ओळखले  जावू लागले 

तात्या टोपे ह्यांच्या कडून नाना ह्यांनी लष्करी प्रशिक्षण घेतलं.मनुकर्णीका म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई हि त्यांची बाल मैत्रीण.आपल लग्न मनीशी व्हाव हि त्यांची इच्छा.पण  बाजीराव ह्यांना निपुत्रिक असण्याचा शाप होता  व तो पुढे  नानासाहेब ह्यांना हि लागला अस ह्यात म्हंटल आहे. तसेच लग्नाच्या बाईशी संबंध आला कि  बाई  मेलीच. असेही नानांच्या पत्रिकेत होते. पुरोहितांच्या सल्ल्याने  बाजीरावांनी प्रथम नानासाहेबाच लग्न एका वेलीशी लावलं.ती वेल काही  दिवसात जळाली .म्हणजे शाप  गेला.मग ह्या दुसर्यांदा  स्त्री शी लावले.      नानासाहेब ह्यांची हि पत्नी  पहिल्या रात्री नंतरच गेली. मग बाजीरावांनी त्यांच्यासाठी  एक रखेल  ठेवली. तीच नाव चंपा.तिच्यापासून त्यांना गंगामाला नावाची मुलगी झाली. व नंतर युद्ध पश्चात एमिली नावाच्या anglo इंडियन स्त्रीपासून अजून एक मुलगी झाली
पुन्हा लग्न कराव तर कुणी मिळेना.पेशवे घराण्याचा हा शाप जगजाहीर झाला होता.  शेवटी बाजीरावांनी वधू  पित्यास भरघोस बक्षीस देऊ जाहीर केल.तेव्हा कुठे एक मुलगी मिळाली.ती म्हणजे  काशीबाई.त्या  मुलीशी नानांनी  विवाह  केला पण नावालाच. ते कधीच एकत्र आले नाहीत.आपल्यामुळे तिचा जीव जाईल ह्या भीतीने नानांनी तिस कायम दूर ठेवले.ती फक्त सण,सभारंभ,पूजा ह्यात पत्नी म्हणून सहभागी होइ.पत्नी म्हणून एवढाच तिचा अधिकार होता. बाकी नानांच्या आयुष्यातली खरी पत्नीची जागा हि चंपाचीच होती.              
. तसेच त्यांची एक बहिण ग्वाल्हेरला दिली होती.तिचे सासरे हे ग्वाल्हेर दरबारात होते.सखे  बंधू बाळाराव (जन्म दात्या आई वडिलांचे ) व त्यांचे पुत्र रावसाहेब हेही युद्धात कामी आले.इथे हि शाखा संपली असा मळगावकरांचा दावा आहे.  तरीही काही लोक आम्ही नानाचे  वंशज असा दावा करत असतात.त्यात उत्तर प्रदेशचे सुरज प्रताप आहेत व गुजरातचे काही आहेत.(आपण जे पुण्यात पेशवे वंशज पाहतो ते बहुतेक अमृतराव  ह्यांचे असावेत.)                  

बाजीरावांच्या मृत्यनंतर नानासाहेबांना पेन्शन नाकरली.संस्थानिक दर्जा हि काढून घेण्यात आला. त्यांची मालकी केवळ त्यांचा वाडा,त्यांची मंदिरे,घाट,व शिकार खाना एवढीच ठेवण्यात आली. नानांचा वकील अजीमउल्ला खान नानांची मागणी घेऊन लंडन ला जाऊन आले पण काही उपयोग झाला नाही. ५७ च्या कटात ते  फैजाबाद चा मुल्ला,अयोधेची बेगम हजरत महल ह्यांच्या सोबत  सहभागी झाले.

Ajimullah Khanवकील अजीमउल्ला खान 


 पण केवळ पेन्शन नाकारली हे कारण न्हवते. त्या बिठूरच्या वाड्यात इंग्रजांची चांगली उठबस होत असे.बाजीराव व नंतर नाना हे आपले दोस्त आहेत,पाहुणचार चांगला करतात अशी ढीगभर पत्रे इंग्रजांची मिळतील. तो वाडा ब्रिटीश मंडळींचा सहलीचा मुख्य अड्डा झाला होता व नाना आणि अजीम खास दोस्त.हे उलटतील अस कुणालाच वाटत न्हवत.उलट वेळ पडली तर ह्या वाड्यात आपली बायका मुल आपण सुरक्षित ठेऊ शकतो असे इंग्रजांना वाटत होते. सदर पुस्तकात तसे पत्रव्यवहार आहेत.निदान पेशव्यांच्या बाबत तरी पेन्शन नाकारली  म्हणून लढले अस म्हणू नये. त्यांची पेन्शन नाकारली  तरी ते उपलब्ध संपत्ती च्या जोरावर पुढील कैक पिढ्या आरमात जगू शकले असते.किंवा काही उद्योग करू शकले असते. ती वर्णन पुढे देतोच आहे.               

कानपूर पडल आणि अंधारात लपत छपत नाना बिठूरला वाड्यात आले. तिथे सर्व तयारीतच होते.७ पेशवे, त्यांच्या बायका  ह्यांचे दागिने,हिरे जडित कट्यारी,तलवारी,सोन्या चांदीची भांडी असे सर्व परंपरागत वैभव  गोळा केले जावू लागले.एका  ते पेटीत ते भरण्यात आले. ते सर्व वाड्याच्या विहिरीत टाकण्यात आले.बाजीरावांच्या मते त्या वाड्यात केवळ सुवर्ण मुद्राच चलनी किंमत रुपये ३५ हजार   होत्या.म्हणजे चलन म्हणून तेवढी पण वितळवून सोने केल कि अधिक किंमत असे   सोन्याच्या मूल्याने हि किंमत खूप जास्त भरते. (ह्यापैकी केवळ ३५ हजार इतकी सोन्याची किंमत असलेल्या मुद्राच पुढे लुटा लुटीत मिळून आल्या. )    चंपा व गंगामाला वकील अजीमउल्लाह खान व स्वतः नाना ह्यांनी जरुरी पुरते   तेवढे सोने स्वतःजवळ घेतलं. शेवटी काही  वस्तू राहिल्या.थोरल्या बाजीरावांची जयंती तलवार व मस्तानी ची कर्णफुले व नवलखा हार.                 

थोरल्या बाजीरावा नंतरचे नानासाहेब,माधवराव काही कमी पराक्रमी न्हवते पण कुणाची ती थोरल्या बाजीरावांची तलवार वापरण्याची हिंम्मत झाली नाही. नाना नको म्हणाले पण चंपा म्हणाली कि ते लोक ह्या पवित्र तलवारीने गायी मारतील.मग शेवटी नानांनी आपल्या म्यानातली आधीची तलवार काढून  जयंती तलवार म्यानात घातली.अगदी व्यवस्थित म्यानात बसली.जणू काही ते म्यान जयंती साठीच होते.जणू काही शेवटच्या पेशव्या च्या हातात ती जावी अशी नियतीची इच्छा असावी  मस्तानीच्या कर्णफुलांचा पण असाच किस्सा. निजामाने दिलेल्या  रत्नाच्या कंठा मोडून हि कर्णफुले घडविण्यात आली.पण त्यावरून गहजब माजला.कारण निजामाने तो कंठा लढाईत हरलो म्हणून खंडणी रूपाने दिला होता. आणि तो यवनी मस्तानीस दिलाच कसा? बाजीराव भडकले. त्यांनी ती कर्ण फुले परत घेऊन जामदार खान्यात टाकली व गर्जना केली," जी स्त्री मस्तानी  एवढी सुंदर असेल तिलाच हि कर्ण फुले मिळतील." गोपिकाबाई,आनंदीबाई  कमी सुंदर न्हवत्या.पण त्यांची पण  ती कर्ण फुले घालण्याची हिंम्मत झाली नाही. आणि .... नवलखा हार. हा हार पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट ह्यांनी त्याकाळी म्हणजे साधारण १७१५ साली ९ लाख रुपये मोजून घेतला होता. त्यात केवळ एकच पाचू चे रत्न होते.ते जगातले सर्वात मोठ्या आकराचे पाचूचे रत्न आहे अस म्हणतात.त्रिकोणी आकाराचे ते आहे. ९ लाखास घेतला म्हणून  तो नवलखा हार.नंतर गादीवर आलेल्या प्रत्येक पेशव्याने त्यात रत्न व सोने ह्यांची भर घातली  होतीच. मग १८५८ साली त्याची किंम्मत काय असेल? कंपनी सरकार ने लुटून फस्त केलेल्या हिंदुस्तानात कोण मिळणार होता त्याचा खरीददार? हे सर्व घेऊन नाना निघाले. चंपा व मुलगी गंगामाला व इतर स्त्रिया ह्यांनी  बिठूर च्या वाड्यातच थांबावे असे ठरले.चंपा रखेल असली तरी पत्नी पेक्षा तिचा दर्जा कमी न्हवता. शिवाय राजकारणाची तिला उत्तम जाण होती. तिथे जर तिला कैद केलेच तर तिला नंतर सोडवता येईल किंवा ती नानांच्या वतीने कंपनीशी बोलणी करू शकेल असा हेतू होता.                                       

nana darbari poshakh
श्रीमंत नानासाहेब तथा धोंडोपंत  पेशवे.दरबारी पोशाखात  

आता मला खरच माफ करा.गावांची नाव मी विसरलो.आणि दोन पात्रांची सुधा.  पण नेट वरून काही सापडली. इथून म्हणजे बिठूरच्या  वाड्याहून नाना व त्यांची पत्नी काशीबाई ,अजीम,व काही मोजके सेवक कम अंगरक्षक निघाले.  पहाटेची वेळ ,गाव हळू हळू जाग होऊ लागल होत.नाना हरले तर स्वतःस गंगार्पण करणार,जलसमाधी घेणार अशी आवई आधीच उठवण्यात आली होती. लोक हळू हळू घाटाकडे जमू लागले.नाना आपल्या काबिल्यासाहित नावेत बसले. नाव दूर गेली आणि नानांनी नदीत उडी मारली.घाटावरील लोकांनी ते पहिले.लोक हळहळली. गीतेचा अध्याय म्हणू लागली.इकडे दूर पाण्याखाली हळू हळू अंदाज घेत नाना पोहत होते. दिसेनासे झालो ह्या बेताने वर आले. मग एके ठिकाणी थांबले.आपले कपडे टाकून संन्यासी  वेश घेतला.कफनीच्या  आता तलवार लपवली.हातातील काठीत सुवर्ण मुद्रा लपवल्या.झोळीत कट्यार,नवलखा हार,मस्तानीची कर्ण फुले लपवली.तिथून जावे तर कुठे? बेगम हजरत महल व  नानांचे कुटुंब बहारीच ला एकत्र येऊन पुढे नेपाळ ला जाणार होते.मागून अंदाज घेऊन नाना हि तिकडे येणार होते.व रस्त्यात एके ठिकाणी  अजीम त्यांना येऊन मिळणार होता.तोवर आजू बाजूच्या गावातून दडून बसावे किंवा माहिती काढावी असा बेत होता.   कुटुंब तिकडे गेले.मग आपण काय कराव? मग त्यांना आपल्या एका मुस्लीम  सेनाधिकारीची  आठवण झाली. त्याने लढाईच्या गदारोळाचा फायदा घेऊन खूप लुटमार केली हे त्यांना आठवत होत. तसेच त्याने एक बंगला पण विकत घेतला अस त्यांना समजल होत. ते ठिकाण कानपूरच्या पुढे होते.ते तिथे गेले. तर एक म्हातारी  स्त्री एका तरुणीवर बसून तिला खिळे ठोकण्याचा प्रयत्न करत होती. नानांनी तिच्यावर एकच वार  केला ती मेली.तो आवाज ऐकून अजून एक लहान मुलगा व बाई पळत आली. ते दृश्य पाहून ते आले त्या बाजूला निघून गेली. ती तरुणी होती एमिलीव्हीलर साहेबांची मुलगी. हे व्हीलर साहेब तेच जे कधी त्यांचे मित्र होते,जे नानांच्या वाड्यात नेहमी येत,ज्यांनी एका भारतीय स्त्रीशी विवाह केला होता,पुढे  जे कानपूरच्या किल्ल्यात दडून नानांशी  लढले. त्यांचीच हि anglo इंडियन मुलगी एमिली. तिच्याकडून समजलेला प्रकार भयंकर   होता. त्या सेनाधिकारीस एमिली सती चौरा च्या घटने नंतर पळून जाताना सापडली.त्याने एमिलीचा तिच्या इच्छे विरुद्ध  धर्म बदलला,निकाह लावला व रोज बलत्कार करत असे.त्या दिवशी संधी मिळताच तिने त्याला मारले. मग हि म्हातारी म्हणजे त्या अधिकार्याची पहिली पत्नी ती बदला  म्हणून क्रूर पद्धतीने मारायचे म्हणून खिळे ठोकून मारत होती. नानांनी तिचे  पायातील खिळे काढले,जखमा बांधल्या. आजू  बाजूचा अंदाज घेत व एमिलीच्या माहितीनुसार ती जागा सुरक्षित होती   दोन दिवस तिथेच राहिले.

 नंतर ते व एमिली आधी ठरल्यानुसार अजीम भेटणार  होता तिथे निघाले. एमिली हि anglo इंडियन त्यामुळे ती दिसयला भारतीयच दिसत असे. दोघे संन्याशी  वेशात निघाले   ठरल्याप्रमाणे अजीम भेटला.सोबत अजून ४ सेवक होते. आता प्रवास हळू हळू बहारीच च्या दिशेने सुरु झाला.आता मला खरच माफ करा. ह्या जागेच नाव  खूप महत्वाच आहे हे मी विसरलो.एके ठिकाणी एका गावात एका वाड्यात  नाना साहेबांना  आश्रय दिला.नाना तिथे एके दिवशी सज्जत विचारमग्न अवस्थेत उभे होते. तेवढ्यात एक भारतीय सैनिकांची तुकडी चालत आली.ते अयोध्येकडे निघाले होते. त्यातील एकाने नाना साहेबाना ओळखले.व नाना जणू परेड ला सलामी देत आहेत अस त्यांना वाटल.मग नानांच्या नावाचा जयघोष झाला. नाना भानावर आले. तुकडी प्रमुखाने येऊन नानांचे नेतृत्व मान्य असल्याचे व पुढील आदेश द्या असे सांगितले. पराभूत राजाचे पराभूत सैनिक एकमेकाला भेटत होते. नानांनी नेतृत्व स्वीकारले असे जाहीर केल. २ तासापूर्वी कुणाच्या तरी मेहरबानी वर आश्रय दिलेल्या घरात  केवळ ८ सहकारी सोबत घेऊन पुढे नेपाळात कसे सटकावे असा विचार करत असलेले नाना पुन्हा एकवार  २ हजार सैन्याचे स्वामी नानासाहेब पेशवे झाले. 

ह्या घडामोडी साधारण जानेवारी १८५८ च्या मग पुन्हा लष्करी डावपेच आखले जावू लागले. अयोध्या पडली न्हवती.  अयोध्येकडे जावे आणि जर वाट अडवली गेली तर वर नेपाळ ला सटकावे अस ठरलं. ह्या वाटेवर ३ लढाई झाल्या. शेवटी एकूण  दीड हजार लोक ह्यांच्यासोबत नाना बहारीचला नेपाळ च्या वाटेवर  दाखल झाले. दरम्यान रावसाहेब हा त्यांचा पुतण्या कामी आला. आता खरी परीक्षा सुरु झाली. बातमी अशी आली कि नाना व सगळेच गोंधळले.  नेपाळचे राजे जंग बहाद्दूर राणा  हे ब्रिटीश सैन्याच्या मदतीला भारतात उतरत असल्याच्या बातम्या होत्या. मुळात जंग बहादूर हे राजे राजेंद्र ह्यांना दूर सारून व आपल्या मर्जीतील व्यक्तीला राजेपदावर बसवून स्वतः राजाचे राजे म्हणजे पंतप्रधान झाले होते.नेपाळी लोक त्यांना राजांचा  राजा म्हणत.पण पुन्हा संदेश देवाण घेवाण झाली व तराई च्या जंगलातील बाजूने आपण नेपाळात शिरावे असा संदेश आला.

नाना व त्यांच्या बरोबरचे सैनिक  सेवक असे दीड हजार लोक तसेच बेगम हजरत महल व अन्य स्त्रिया हे नेपाळ कडे गेले.तिथे गेल्यावर   
त्यांना एक वाड्यात नेण्यात आले.वाड्यात नानांनी व प्रमुख व्यक्तींनी मुक्काम केला.इतरांनी आजू बाजूला तंबू टाकले. वाड्याच्या सर्वात उंच मजल्यावर असलेल्या   दालनात  जंग बहादूर बसला होता.थोड्या वेळात त्याने आपला सेवक नाना साहेबांकडे पाठविला.        
आता हे  जे तुम्ही वाचाल ते तुमच्या भारतीय  महाराष्ट्रीय  मनाला पचवणे जड जावू शकेल.पण हे स्वतः नाना नीच पी बाबुराव व होळकर नरेश  जयाजी शिंदे   ह्यांना सांगितले आहे असा मळगावकर साहेबांचा दावा आहे.


सेवका करवी  जंग बहादूर ने सरळ सांगितलं कि मला तुमची मदत व रक्षा  एक हिंदू, एक ब्राम्हण म्हणून करावी लागेल.तसा शब्द मी आधीच देऊन बसलो आहे.  मला तुमच्या राहण्याच्या भाडे पोटी तुमची रत्ने हवीत.तुमच्या नवलखा हारातील रत्ने. मी वेळोवेळी ती रत्ने आपणाकडून घेऊन  जाईल. पण ह्या करारासाठी  आपली बायको हि आपल्यासोबत राहणार नाही.पण तुमच्या वयानुसार योग्य त्या वयाच्या २-४  बायका तुम्हाला  तुमच्या जवळ ठेवता येईल. नाना चमकले. म्हणजे?माझ्या बायकोवर ह्याची नजर गेली तर? निरोप सांगणाऱ्या सेवकाच्या कानाखाली त्यांनी एक मारली. तो म्हणाला "साब,ती तुमची नावालाच  बायको आहे हे सगळा हिंदुस्तान जाणतो.तुमचा शाप सर्वाना माहिती आहे. तसेही तुमच्या जवळ पर्याय नाही.इथून निघून जा.आम्ही जबरदस्ती करणार नाही. तिकडे ब्रिटीश.आणि बाकी आपल नशीब! "   नाना विचारात पडले. जिला आपण पत्नीचा दर्जा दिला नाही आज तीच आपल्या जीवनाच मोल बनत आहे?तिला पत्नीचा दर्जा दिला नाही ह्याचा काळ माझ्यावर असा सूड उगवत आहे? सेवक पुढे म्हणाला कि आज रात्री तुमच्या राणी सरकारना आमच्या महाराणी साहेबांनी भोजनच आमंत्रण दिल आहे. निदान तेवढ तरी कबूल  करा,बाकी पुढच पुढे पाहू. नानांनी संमती दिली. 

रात्री १ चे टोल  पडले तरी काशीबाई दालनात आल्या न्हवत्या.नाना तिथे वाट पाहत थांबले. त्या उशिरा आल्या.त्यांचे चालणे बदलले होते.डोळ्यात एक  चमक होती.

नानांनी विचारलं: काय म्हणल्या महाराणी? 
काशीबाई:  त्या कुठे होत्या ? फक्त राजे एकटेच होते.
नाना:ओह,मग? तुलाही तो आवडला तर? 
काशीबाई: तुम्ही मला कधी पत्नीचा दर्जा दिला नाहीत. मला हव ते  दिल नाहीत.आज मला संधी आहे.तुमच्या जिवांच मोल देऊन मला माझ्या हक्कच सुख  मिळणार  आहे.ह्यात तुमच्याशी प्रतारणा कुठे आहे ? तुम्ही मला ते सुख तुमच्या शापामुळे देवू शकत
  नाहीत कारण मग 
माझा  जीव जाईल. हे   मान्य करून तुम्ही तुमचे  व  दीड हजार लोकाचे प्राण वाचवू शकाल.ह्यात तुमच्याशी प्रतारणा  असली  तरी तुमचीच सेवा आहे.
           
नाना सुन्न झाले.सकाळ झाली.जंग बहादूर चा तो सेवक पुन्हा आला.  नाना नि विचारलं समजा तुझी अट ,काशीला तुमच्या
सोबत द्यायची मान्य केली,म्हणजे समझ हा अस तर? 
तसेच माझ ब्रिटीश सैन्यापासून रक्षणाच काय?आणि  हाराची किंम्मत किती ? तो फक्त २ लाख बोलला. नानांनी  वेळ मागितला.सेवक म्हणाला तो 
रत्न हार अनमोल आहे. हे हे आमचे महाराज जाणतात.पण नेपाळ  मध्ये रत्ने ह्या प्रकारच्या बाबत बर्याच गोष्टी प्रचलित आहेत.रत्ने म्हणलात तर त्या सोबतचे शाप आणि वर दोन्ही आले.इथे एखाद्याची बायको पळवण सोप. पण रत्ने? अजिबात नाही. चोरही रत्ने चोरत नाहीत आणि धनवान हि विकत घेताना हजारदा विचार करतात.अगदीच गरजू असेल तर विकत घेतात. जेणेकरून शाप लागणार नाही. आज त्या  हाराची किंमत कोटीत होती. नानांनी वेळ मागितला.दुसर्या दिवशी तो सेवक परत आला.नानांनी हो नाही करत त्या हाराची किंमत साडेचार लाख रुपये ठरवली ज्याची किंमत दीडशे वर्षापूर्वी केवळ एक रत्न असताना नऊ  लाख रुपये होती.त्यातील लागेल तशी रत्ने वेळोवेळी  ठराविक दिवसांनी येऊन खरेदी केली  जातील अस ठरलं
मग सेवक गेला.जंग बहादूरला सौदा 
कबूल  आहे असा निरोप घेऊन तो संध्यकाळी आला. तसेच माझ इथे असण्याच काय ? ब्रिटीश आणि जंग बहादूर ह्यांच्यात वितुष्ट नाही येणार काय ? ब्रिटीश इकडे शोधायला  नाहीत काय ? असे प्रश्न नानांनी विचारले.  तो सेवक म्हणाला कि  जंग बहादूर ने एखादा  माणूस मेला अस नेपाळात  जाहीर केल  तर यम देवता  पण त्यावर विश्वास  ठेवते. तुमच्या सारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीच  प्रेत घेऊन बनारस ला जाऊन जंग बहादर चे लोक अंतिम संस्कार करतील.मग तुम्ही हवे  तेवढे राहा.

शेवटी नाना व अजीम व जवळ जवळ दीडशे सेवक त्या वाड्यात उरले.एमिली मात्र तिथेच राहिली. तेव्हा ती गरोदर होती.तिच्याशी निकाह लावणाऱ्या व बलात्कार करणाऱ्या त्या सेनाधीकार्या पासून.अन्य सैनिकांना जंग बहादूर ने माफी मिळवून दिली.ते आप आपल्या रेजिमेंट ला पुन्हा रुजू झाले. 

एव्हाना बिठूरच्या बातम्या आल्याच होत्या.(वर लिह्याच राहून गेल)नाना साहेबांचा वाडा जनरल नील च्या सैन्याने लुटला व आग लावली.आगीत चंपा व पुत्री गंगामाला व अन्य  स्त्रिया होरपळून गेल्या. त्यांच्या शिकारखान्या तील वाघ, सिंह,हरीण,ससे   ह्यांची शिकार झाली.घोडे हत्ती वाटण्यात आले.विहिरीतून काही  पेट्या मिळाल्या. त्या वाटण्यात लुटीत सामील सैन्याच्या-सैनिक व अधिकारी ह्यांच्या हुद्यानुसार वाटण्यात   आल्या.नानांचा  काय तो रुबाब होता.ते दौर्यावर जात तर २० हत्ते, ४० घोडे,१००-१५० सशस्त्र  पायदळ त्यांच्या सोबत असे.चांदीच्या अंबारीत किंवा पालखीत  नाना बसत.पेन्शन बंद झाली तरी त्यांचा  पेशवाई थाट आर्थिक तोशीस न पडता सुरु होता.म्हणून म्हणतो कि पेन्शन नाकरली,महाराजा किताब दिला नाही म्हणून हे लढाईत उतरले असे नाही.समजा हे ब्रिटीश सैन्याच्या बाजूने उभे राहिले असते तर? आणि पुढे राणीनी कारभार हातात घेतला व कंपनीस दूर सारले. दत्तक मंजूर केले जाऊ लागले.  म्हणजे आजही पेशवे आपल्याला दिसू शकले असते. पण ह्या नानांनी आपल्या बापावरचा पळपुटा बाजीराव हा कलंक धुवून काढणारच ह्या एका ध्येयाने स्वातंत्र्य युद्धात उडी घेतली.
Nanacha Lavajama
                
नानांचा दौरा 


१८५८ चा जुलै .भयंकर पाउस.पाउस तर पाउस.त्यात ताप.हा ताप तिथे पावसाळ्यात येईच.ताप आला कि माणूस ३-४ दिवस जगे. ताप,हात पाय जबर दुखत आणि थेट मृत्यू.जवळ जवळ २० लोक दगावली.पाउस संपला.दिवाळी आली. काशीबाई परत आली. तिने  म्हणल्या नुसार तीने  एमिलीच्या बाळाला दत्तक घेतले. त्याच नाव  समशेर ठेवलं.वर्षामागून वर्ष गेली.पावसळ्यात तराईच्या जंगलातून नाना मुक्काम हलवत.पाउस संपला कि पुन्हा तिथे येत.  वर्षे सरत होती.त्यांना एमिली पासून  कन्या रत्न झाले   नाना, एमिली व त्यांची मुलगी.सोबत अजीमउल्ला हा वकील/दिवाण,बंधू बाळाराव.वेळोवेळी जंग बहादूरचा सेवक येई. रत्ने घेऊन जाई.नानांची पत्नी काशीबाई हि जरी जंग बहादूर सोबत असली व त्याने जरी तिला जनान खान्याची मुख्य राणी असा किताब दिला असला तरी ती मनाने पती मात्र नाना साहेबांनाच मानी.दर दिवाळीस पाडव्याला  ती नाना साहेबाना ओवाळण्यास येई. जंग बहादुर  हि तिच्याकडून नानांना असे निरोप पाठवी जे सेवक अथवा पत्रातून देता येत नसत.नाना मात्र तिच्याशी फारस बोलत नसत. ती  कसे आहात?विचारी
नाना फक्त हो म्हणत.ओवाळणी टाकीत आणि निघून जात.   ह्या काशी  ने तिकडे राजधानी काठमांडूत जंग बहादूर ची प्रतिष्ठा धुळीस मिळवली.त्याच्या दरबारातील  चित्रकार त्याच्याशी तीच नाव  गेल होत. अनेक दरबारी  मानकरी  तिने आपल्या जाळ्यात  ओढल होत. तिने दत्तक घेतलेला एमिलीचा मुलगा बहादूर हा अवघ्या १६ व्या वर्षी नेपाळ रॉयल आर्मीत  बनला होता. नानांना हे ऐकून बरे वाटे.कि ती आपली नाही,होऊ शकली   हि नसती पण तिने जंग बहादूर च्या दरबाराची प्रतिष्ठा धुळीस मिळवली.एवढ होऊनही जंग बहादूर ने काही तिला दूर केल नाही. तिला नेपाळी जनतेने कामदेवी ठरवून टाकल.सौंदर्याचा अविष्कार वैगेरे वैगेरे   तिच्यावर गाणी रचण्यात आली.विशेष करून सैनिकात आजही गोरखा बटालीयन  व काठमांडू परिसरात लोक गीतात तिची सौंदर्याची स्तुती पर  गाणी ऐकू येतात.                
                                       

दरम्यान नानाचं प्रेत बनारस ला जाऊन अंतिम संस्कार पार पडले होते. नंतर काही वर्षांनी  नानांच्या बहिणीचे सासरे येऊन गेले.नानांची हि बहिण त्यांच्या सोबतच बिठूरहून निघाली होती.तीच लग्न झाल होत पण पाठवणी बाकी होती. तिथून बहारीच व नेपाळ.नंतर जंग बहादर ने तिला परत ग्वाल्हेर ला सोडण्याची व्यवस्था केली.तिचे सासरे आले ते साल होत १८६५.ते  म्हणाले कि माझे मालक (जयाजी शिंदे,ग्वाल्हेर नरेश ) हे शब्द टाकतील.निदान जीवितास तर धोका नाही. 
पण नानांनी प्रस्ताव अमान्य केला. ते व एमिली व त्यांची कन्या निवांत आयुष्य जगत होते.त्यांना आता पुन्हा ते सर्व नको होत.पुरेसा ऐशोरम,कुटुंब आणि फावल्या वेळात   देवाची आराधना मला अजून काय हव अस ते म्हणाले. मग ते(सासरे) म्हणाले कि मागे एकदा आमचे महाराज तुमच्या वाड्यात आले होते. वेळ प्रसंगी गरज पडली तर  तुम्ही एक हत्ती सोन्याने लादून आमच्या महाराजांच्या सोबत ग्वाल्हेरला पाठवला होता. त्यातील काही गरज आहे का? नाना त्यालाही नाही म्हणाले. 
                    
१८७० साली नानांचे बंधू बाळाराव गेले.नानांना हा फार मोठा आघात होता. १८७१ ला अजीम मक्केला जातो म्हणून गेला. उरलेलं आयुष्य तिकडेच काढीन.गरज लागली तर हजर कळवा हजर  होइन अस सांगून गेला.  १८७२ च्या दिवाळीत काशी बाई पाडव्याचे ओवाळायला म्हणून आल्या.त्यांनी सांगितलं कि आता राजे पेचात अडकले आहेत.तुम्ही इथे आहत अशी खबर त्यांचा भाऊ बद्री व त्यांच्या आधीचे राजे राजेंद्र ह्यांनी लढाई ची  तयारी  सुरु केलीय. म्हणून हल्ली महाराजांनी आपल्य्कडून रत्ने खरेदी केली नाहीये. कारण  अधिक काळ तुम्हास आश्रय देऊ शकत नाही.एकदा जर तुम्ही इथे आहात हे समजल व हि माहिती ब्रिटीश सरकारला समजली तर जंग बहादूर संपलाच. कारण त्यानेच शपथेवर तुम्ही मेला असे सांगितलं होत.ब्रिटीश सरकारला काहीतरी कारण हवेच  आहे एवढा मुलुख गिळण्यासाठी.            

नियतीच चक्र पुन्हा उलट फिरलं. पुन्हा ती पळापळ. एकेदिवशी एमिली व मुलगी निघाले. नंतर नाना सध्या वेशात काठीत  सोने भरून निघाले. १३ फेब्रुवारी १८७३ ला ते कानपुरात आले.गंगा किनारी त्यांनी वडील बाजीराव ह्यांचे श्राद्ध केले. गंगापुत्राने (गंगा नदीकाठील ब्राम्हणास गंगापुत्र म्हणतात) त्यांना त्यांच्या वडिलांचे नाव विचारले.ह्यांनी बाजीराव सांगितलं. मग त्यांच्या वडिलांचे नाव विचारले ह्यांनी राघोबा सांगितले,मग राघोबांच्या वडिलांचे नाव विचारले तर पुन्हा बाजीराव.हे ऐकून तो उडालाच व म्हणाला, "मालक माझ भाग्य थोर जे आपण मला भेटलात.कुठे होतात आपण ? मी पांडे.मंगल पांडे माझा चुलत चुलत भाऊ.(वास्तविक मंगल पांडे ह्यांच्या हौतात्म्या  नंतर सर्वच पांडे आम्ही त्याचे भाऊ अस म्हणू लागले. तुम्ही कधी युपीत गंगाकिनारी काही कार्य केल असेल तर समजेल हे कसे चतुर असतात ते)  आम्ही सगळे कानपूर, बिठूर व आस पासची लोक आजही आपली आठवण काढतो. हे ब्रिटीश लोक आपल्याला गुन्हेगार म्हणतात.शाळेत पण मुलांना तोच इतिहास शिकवतात.पण आम्ही मात्र मुलांना सांगतो कि ते आपले राजे होते.आणि हे ब्रिटीश परके.ह्यांच्या विरुद्ध ते लढले.त्यांनी आपल्या सैनिकांच्या विरुद्ध दोन स्मारके उभारली आहेत.एक बिबिघरात व एक इथेच सती चौरा घाटात.दोन्हीकडे जे ब्रिटीश लोकांचे म्हणजे घाटावर स्त्री पुरुष व बिबिघरात महिला ह्यांचे जे  हत्याकांड झाले ते आपल्या सैनिकांनी केल अस त्यावर लिहून ठेवलाय अस म्हणतात."नानांनी त्यास उत्तर दिल कि बाबा मी आता काही राजा नाही.माझे विधी आटप.  मग शांत पणे तुझ्या घरी जावू मग बोलू.त्यानुसार नाना त्याच्या घरी गेले,जेवले.दुपार नंतर ते त्या दोन ठिकाणी गेले.ते शिलालेख वाचले.नंतर एका बागेत  लपत गेले.ती बाग  केवळ ब्रिटीश लोकांसाठीच होती.त्यात नानांनी स्वताचा क्रूरकर्मा वैगेरे उल्लेख वाचला. 

दुसर्या दिवशी ते बिठूर ला गेले.दुरून आपला भस्मसात वाडा पाहिला.त्याचं मन भूतकाळात रमल.तिथून ते ग्वाल्हेर ला आपल्या बहिणीकडे गेले व तिथून राजवाड्यात.शिंदे सरकार उभेच होते.त्यांनी एकास   आत बोलावलं व सांगितलं जा नीट दाढी  करून कपडे  करून ये. त्यांनी काही घटना सांगितल्या.नानासाहेब गायब झाल्यापासून हिंदुस्तानभर  लोक नाना म्हणून पकडले गेले.पण तुम्हाला प्रत्यक्ष पाहणाऱ्या कुणाही इंग्रजाने त्यांना ओळखले नाही.साक्ष इंग्रज व्यक्तीची शक्यतो ग्राह्य धरतात. त्यातले दोन नाना माझेच होते.म्हणजे मीच पाठवले होते. अजून दोन ठेवले. एक मध्ये वारला.हा एक उरलाय. हा कपडे करून आला कि  तुमच्यासारखाच  दिसतो.तुम्ही एक काम करा.माझा जीव वाचवा,मी पळून पळून थकलो असून मला स्थैर्य हवे आहे,मला काही राज्य वैगेरे नको,ब्रिटीश सरकार कडे माझ्यासाठी शब्द टाका अस पत्र माझ्या नावाने लिहा. शिंद्यांनी योजना पेशव्यांना सांगितली. शिंदे म्हणाले इथला  ब्रिटीश  रेसिडेंट माझा चांगला  मित्र आहे.उठावास  पण आता १५ वर्ष होऊन गेली.कारभार पण आता कंपनीकडून राणी कडे आला आहे.बघू काय प्रतिसाद येतो ते. नानांनी पत्र लिहील.ते पत्र तो तोतया नाना व शिंदे संध्यकाळी रेसिडेन्सीत गेले. त्या तोतयास  डॉक्टर टोड  समोर उभ करण्यात आल .हा डॉक्टर टोड  बिठूरला नानांचा डॉक्टर होता. अर्थातच त्याने हे नाना नाहीत अस सांगितलं. तो तोतया निघाला व त्याची रवानगी कोठडीत झाली. म्हणजे नानांना माफी नाही हे स्पष्ट झाल. इथे पहा पेशवा ह्या शब्दातील जादू. होत काय त्यांच्यकडे कुटुंबाच्या नावाशिवाय? एक हुजर्याहि सोबत नाही.पण ब्रिटीश सरकारला केवढा धाक  

मग तिथून नाना निघाले कोंकणात - मालवणला.तिकडे बंदरात  एक बोट त्यांची वाटच पाहत होती.ते बोटीत गेले. बोटीच्या अरब खलाशाने त्यांना  अरबी रिवाजाचे  कपडे दिले व एका खोलीत  सोडले.आत दोन  बुरखा धारी महिला बसल्या होत्या.त्यातील एक जवळ येऊन बिलगून बाबा म्हणाली. ती होती त्यांची मुलगी व  एमिली. तिथून ते मक्केस गेले.मक्केला अजीम होताच.  ते तिकडून constantinople  (कॉन्स्तान्तिनोपाल) (म्हणजे हल्लीच इस्तंबूल ) येथे गेले. शिंदे सरकारांचे आर्थिक व्यवहार जगभर होतेच. तिथल्या पेढीवर त्यांना हवी ती रक्कम  शिंद्यांच्या हुंडीवर मिळत असे. (त्यांच्यकडे सोन्याने लादून  हत्ती जो पाठवला  होता.) 

शेवटी नाना म्हणतात,"आज मी इथे खुश  आहे.इथे बहुतेक वर्षभर स्वछ सूर्यप्रकाश असतो.माझा वाडा,त्यापलीकडील नारळीची बाग ते तळे . माझी नव लख्खा हरतील सर्व रत्ने आता माझ्या शिरपेचात आहेत. मस्तानी बाईची कर्ण फुलेही लंडन मधील तितक्याच  सुंदर स्त्रीला मिळाली.सोबत एमिली आणि मुलगी व अजीम सारखा विश्वासू वकील आणि शांतता".

मूळ लेखक:मनोहर मळगावकर

अनुवादक: भा.द.खेर 

आणि ह्याचा केवळ  सारांश-कौस्तुभ गुरव             


उत्तर प्रदेश सरकारने बिठूर येथे उभारलेले स्मारक आपण खालील लिंक वर पाहू शकता. 

http://galleries.fin-mas.com/p673552669/h3E9B0213#h3e9b0213

त्यातील एक फोटो 
      
nana smarak of bithur

निरीश्वरवाद


 आपल्या भारतात निरीश्वरवादाची किती उज्ज्वल परंपरा आहे. ऋग्वेदापासून... हे सगळे जे तुम्ही टाकले आहे, ते अब्राहमीक संप्रदायाच्या संदर्भात आहे. धर्माच्या नाही. धार्मिक निरीश्वरवाद खूप क्लिष्ट असला तरी आपल्याला (भारतीय मनाला) खूप सहज समजण्यासारखा आहे..

उदाहरणार्थ, ऋग्वेद, मंडळ १०, सुक्त १२९ ज्याला पॉप्युलरली लोक "नासदीय सुक्त" म्हणून ओळखतात.. हे सुक्त भारतीय निरीश्वरवादाचे जनक म्हणता येईल..

नासदासीन नो सदासीत तदानीं नासीद रजो नो वयोमापरो यत |
किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद गहनं गभीरम ||

 तेव्हां म्हणजे मुळारंभी असत् नव्हते आणि सत्ही नव्हतें! अंतरिक्ष नव्हतें आणि त्यापलीकडचें जे आकाश तेंही नव्हतें! (अशा स्थितींत) कोणीं (कोणाला) आवरण घातलें (म्हणावें)? कोठे? कोणाच्या सुखासाठीं? अगाध व गहन पाणी (तरी) होतें काय?

न मर्त्युरासीदम्र्तं न तर्हि न रात्र्या अह्न आसीत्प्रकेतः |
आनीदवातं सवधया तदेकं तस्माद्धान्यन न परः किं चनास ||

तेव्हां मृत्यू म्हणजे मृत्युग्रस्त नाशवंत दृश्य सृष्टी नव्हती, व म्हणून (दुसरा) अमृत म्हणजे अविनाशी नित्य पदार्थ (हा भेद) हि नव्हता. (तसेंच) रात्र आणि दिवस यांचा भेद कळण्यास कांहीं साधन (=प्रकेत) नव्हतें. (जें काय होतें) ते एकलें स्वधेनें म्हणजे आपल्या शक्तीनें वायूशिवाय श्वासोच्छ्वास करीत म्हणजे स्फुरत होतें. त्याखेरीज किंवा त्यापलीकडे दुसरें असे कांहींच नव्हतें.

तम आसीत तमसा गूळमग्रे.अप्रकेतं सलिलं सर्वमािदम |
तुछ्येनाभ्वपिहितं यदासीत तपसस्तन्महिनाजायतैकम ||

अंधकार होता, आरंभी हे सर्व अंधकाराने  व्याप्त (आणि) भेदाभेदविरहित पाणी होतें, (किंवा) आभू म्हणजे सर्वव्यापी ब्रह्म (आरंभींच) तुच्छानें म्हणजे फोल मायेने आच्छादिलेले होते - असें (यत्) जें (म्हणतात), तें (तत्) मूळ एक (ब्रह्मच) तपाच्या महिम्यानें (रूपांतरानें पुढें) प्रकट झालेले होतें.

कामस्तदग्रे समवर्तताधि मनसो रेतः परथमं यदासीत |
सतो बन्धुमसति निरविन्दन हर्दि परतीष्याकवयो मनीषा ||

याच्या) मनाचे जें रेत म्हणजे बीज प्रथमत: निघालें तोच आरंभी काम (म्हणजे सृष्टि निर्माण करण्याची प्रवृत्ति किंवा शक्ती) झाला. (हाच) असतामध्यें म्हणजे मूळ परब्रह्मांत सताचा म्हणजे विनाशी दृश्य सृष्टीचा (पहिला) संबंध होय, असें ज्ञात्यांनी अंत:करणांत विचार करून बुद्धीनें निश्चित केले आहे.

तिरश्चीनो विततो रश्मिरेषामधः सविदासी.अ.अ.अत |
रेतोधाासन महिमान आसन सवधा अवस्तात परयतिः परस्तात ||

(हा) रश्मी म्हणजे धागा किंवा किरण यांच्या (मध्यें) आडवा पसरला; आणि खालीं होता म्हटलें तर वरहि होता. (यांच्यातलें काही) रेतोधा म्हणजे बीजप्रद झाले, व (वाढून) मोठेही झाले. त्यांचीच स्वशक्ति अलीकडे व प्रयति म्हणजे प्रभाव पलीकडे (व्यापून) राहिला.

को अद्धा वेद क इह पर वोचत कुत आजाता कुत इयंविस्र्ष्टिः |
अर्वाग देवा अस्य विसर्जनेनाथा को वेद यताबभूव ||

सताचा) हा विसर्ग म्हणजे पसारा कशापासून किंवा कोठून आला, हें (यापेक्षां) प्र म्हणजे विस्तारानें येथें कोण सांगणार? कोण निश्चयात्मक जाणतो देवही या (सत् सृष्टीच्या) विसर्गानंतरचे. मग ती जेथून निघाली तें कोण जाणणार?

इयं विस्र्ष्टिर्यत आबभूव यदि वा दधे यदि वा न |
यो अस्याध्यक्षः परमे वयोमन सो अङग वेद यदि वा नवेद ||

सताचा) हा विसर्ग म्हणजे पसारा जेथून झाला, किंवा तो निर्मिला गेला अगर न गेला, तें परम आकाशांत असणारा या जगाचा जो अध्यक्ष (हिरण्यगर्भ) तो जाणीत असेल; किंवा नसेलही! (कोणी सांगावें?)



वसंत देव कृत प्रसिद्ध हिंदी भाषांतर
सृष्टी से पहले सत् नहीं था।
असत् भी नहीं।
अन्तरिक्ष् भी नहीं। आकाश भी
नहीं था।
छिपा था क्या? कहाँ? किसने ढका
था?
उस पल तो अगम-अतल जल भी कहाँ
था?।। १।।

नहीं थी मृत्यू थी अमरता भी
नहीं।
नहीं था दिन रात भी नहीं।
हवा भी नहीं साँस थी स्वयमेव
फिर भी।
नही था कोई कुछ भी। परमतत्त्व
से अलग या परे भी।। २।।

अंधेरे में अंधेरा-मुँदा
अँधेरा था।
जल भी केवल निराकार जल था।
परमतत्त्व था सृजन-कामना से
भरा। ओछे जल से घिरा।
वही अपनी तपस्या की महिमा से
उभरा।। ३।।

परम मन में पहला बीज जो उगा वही
काम बनकर जगा।
कवियों-ज्ञानियों ने जाना।
असत् और सत् का निकट सम्बन्ध
पहचाना।। ४।।

फैले सम्बन्ध के किरण-धागे
तिरछे।
परमतत्त्व उस पल ऊपर या नीचे?
वह था बँटा हुआ। पुरुष और
स्त्री बना हुआ।
ऊपर था दाता वही भोक्ता। नीचे
वसुधा स्वधा भोग्या।। ५।।

सृष्टी यह बनी कैसे? किससे? आई
है कहाँ से?
कोई क्या जानता है? बता सकता है?
देवताओं को नहीं ज्ञात, वे आए
सृजन के बाद।
सृष्टी को रचां है जिसने उसको
जाना है किसने?।। ६।।

सृष्टी का कौन है कर्ता? कर्ता
है अथवा अकर्ता?
ऊँचे आकाश में जो रहता। सदा
अध्यक्ष जो बना रहता।
वही सचमुच में जानता या नहीं
जानता।
इसका किसी को नहीं पता नहीं है
पता।। ७।


आस्तिक ते जे वेदप्रामाण्य मानतात.. नास्तिक ते जे वेदप्रामाण्य मानीत नाहीत..

आस्तिक निरीश्वरवादी मते - सांख्य, न्याय, पूर्वमीमांसा, वैशेषिक, काही प्रमाणात योग
आस्तिक सेश्वरवादी मते - वेदांत, काही प्रमाणात योग
नास्तिक निरीश्वरवादी मते - बौद्ध, जैन, चार्वाक
नास्तिक सेश्वरवादी मते - शीख/ गुरुमत


उपरोक्त नासदीयस ुक्त हे आधुनीक शास्त्र जे BIG BANG ची थेरी मांडत त्याच्याशी जवळीक साधत.


ओर्कुत्वरून निश्रेयस साभार प्रस्तुत 

Tuesday, 15 November 2016

मस्तानी मराठे

 भन्साळीच्या ''बाजीराव मस्तानी" या आगामी चित्रपटाबद्दल सर्वत्र चर्चा रंगली आहे। 

हा पेशवाई इतिहास असल्यामुळे कुठे ब्राह्मणी विरोध तर कुठे बहुजनि समर्थन असे नाट्य बघायला मिळते आहे । मग यात अखन्ड बहुजनांचे कैवारी आपले अपमाननीय पुरुषोत्तम खेडेकर व संभाजी ब्रिगेड कसे मागे राहणार?? बघुया खेडे(वेडे)कर साहेब काय म्हणतात ते


 । आपल्या प्रतिइतिहास लेखनाच्या अतिशहाण्या पराक्रमाने निर्मिलेल्या पुस्तक व लेखांनमधे ते लिहितात की ,"बाजीराव (थोरले) पेशवे म्हणजेच राऊ हे बाळाजी विश्वनाथ यांचे पुत्र नसुन बाजिराव हे तत्कालीन मराठा पेशवा धनाजी जाधव व बाळाजींची पत्नी राधाबाई यांच्या अनैतिक संबंधातुन जन्मले होते। 


पुढे साहेब लिहितात की तत्कालीन मराठा सरदार हे ब्राह्मण बायकांच्या काम पूर्ति साठी जायचे।तसेच शनिवारवाड्याची मागची दार ही मराठ्यांसाठी नेहमीच उघडी असायची असही वेडेकर साहेब सांगतात। अर्थात् जेव्हा पेशवा शानिवारवाड्याच्या ग़ॅलरीतुन बुधवार पेठेच्या खिडक्यांकडे बघत मग्न असत तेव्हा पराक्रमी मराठे मागच्या दारातुन वाड्यात घुसायचे व अातमध्ये गुल खिलवायचे।


आणिक असाच पेशवाईचा जन्म झाला।मग प्रश्न असा पडतो की मराठेहे दलाल बिलाल होते की काय?? । खेडेकरी बहुजनांनो सांगा बर मग निरभ्र आकाशात निर्भय पणे बुधवार पेठेच्या खिडक्याकडे बघणारा पेशवा मर्द की लपुन छपुन आणितेही मागच्या दारातुन घुसुन व्याभिचार करणारे वेडेकर निर्मित मराठे???

हाच काय तो महान महान मराठ्यांचा महान पराक्रम म्हणावा।  पेशवाई मराठयांमुळे जन्मली हे जरी खरं असेल तरी जन्म अशा पद्धति ने होत असेल हे आम्हास ठाउकच नव्हते। आपण खरच महान इतिहासकार आहात। याचप्रमाणे आपण शिवरायांचे वर्णन"आठ बायका करणारा मर्द" असे करता । आम्ही तर शिवाजी महाराज तलवार घेउन यवनांना नडले, अगदी परधर्मिय स्त्रीदेखील रक्षिली म्हणुन त्यांना मर्द मराठा म्हणतो। आपण तर आनखिनच मुल्ल्यांचे चार चाँद लावले शिवाजी राजांच्या व्यक्तिमत्तवाला। मग शिव धर्म संस्थापक असलेले आपणही आठ विवाह करा म्हणजेच आपल्या राजाचा आदर्श टिकेल।


 आणि हो खेडकरी बहुजनांनो आपल्या येणाया पिढिला आवर्र्जुन हा इतिहास सांगा कारण बामणी इतिहास मराठे व शिवाजी यांचे असे वर्णन तर करितच नाहीं। आपल्या पोरांनी विचारल आई बाबा मराठे कोण तर मागच्या दारातुन घुसणारे दलाल। ।


आपण  प्रति इतिहास लिहिण्यात तर फुलेंनाही पछाडले आहे। मला तर असे वाटते की फुलेंआधी आपल्यालाच भारतरत्न मिळायलाहवे। कारण आपल्या या बहुजनांच्या कल्याणकारी इतिहास रचनेमुळे गरिब बहुजनांचा फारच लाभ झालाय।


जसे बहुजनांवरिल अत्याचार,बेकारी उपासमार आदि सर्व समस्या जणु संपल्याच। 

फक्त बामण तेवढे जिते हायेत तेहि संपतिलच लवकर जसे आपल्या बहुजन मित्र श्याम दानव यांनी दाभोळकर हत्या केली तसेच सुरु ठेवा।   


आणि हो बहुजन हिताय  असे नाव आपल्या पुस्तकांना देउ नका कारण संस्कृत हि बामणि भाषा आहे।  आणि बहुजन मराठयांनो तुमच्या पुरवजांच्या प्रतापाचा चित्र पट आलाय तो नक्की बघा।   


आतातरी जागे व्हा माझ्या मराठीजन प्रभूतींनो. जातीवादामुळे काहीच मिळू शकत नाही . थोरले बाजीराव आपले पूर्वज होते त्यांना सन्मान द्या 


थोरल्या बाजीरावांच्या दोन बहिणी अनुताई आणि भिउताई ह्या मराठा घरात दिल्या होत्या. अनुताई हि इचलकरंजीच्या  घोरपडे नावाच्या मोठ्या सरदाराला दिली होती तर भिउताई बारामतीकर नाईक या सावकाराशी  विवाहबद्ध होत्या.

ब्राह्मण स्त्रिया आपल्या मातासामान आहेत . शिवरायांनी तर परस्त्रीस देखील मासाहेब म्हणूनच वागवले. मग आपल्याच मराठी ब्राह्मण महिलांच्या चारित्र्यावर हि धूळफेक योग्य आहे का?????



आपलाच एक मराठी मुलगा 





मराठी भाषा दिवस

मराठी दिवस



गेल्या काही काळात महाराष्ट्र सरकारच्या खात्यावर ‘पुण्य’ तसं कमीच जमा आहे. पण त्यात महाराष्ट्र सरकारनं केलेलं एक पुण्यकर्म म्हणजे कविकुलगुरु कुसुमाग्रजांची जन्मतिथी, २७ फेब्रुवारी, ‘मराठी दिवस’ म्हणून जाहीर करणे. कुसुमाग्रजांची स्मृती जतन केली जाईल, एवढं सोडलं तर वेगळा आणखी ‘मराठी दिवस’ म्हणजे काय? दिवसच काय, मराठी महिना आहे, मराठी वर्ष आहे, मराठी भारतवर्ष आहे आणि मराठी विश्वही आहे.
म्हणजे, असायला हवं.
पण आज तसं असल्याचं चित्र नाही.


उलट महाराष्ट्राचं, मराठी चित्र फारच फुटलेलं, विस्कटलेलं दिसतंय. ज्या महाराष्ट्रानं संपूर्ण देशाचं - आता तर जगाचं मूलभूत चिंतन मांडायला हवं, कृतीशीलपणे, तो महाराष्ट्रच आता स्वत:विरुद्ध फुटल्यासारखा झालाय. आणि ज्या मराठी भाषेतून जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधली उत्तुंग प्रतिभा फुलून यायला हवीय, त्या मराठी भाषेची महाराष्ट्रातच पीछेहाट चालू आहे.
आपल्या या महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणात इंग्लिश सक्तीचं आहे, पण मराठी मात्र सक्तीची नाही. सक्ती का करायला लागावी? महाराष्ट्रातच मराठीचा मनापासून स्वीकार का नाही? उलट प्राथमिक शिक्षणात मराठी सक्तीची करायला विरोध आहे, संस्था कोर्टात जातात. लोकांना ‘मला इंग्लिश नीट येत नाही’ हे म्हणायची लाज वाटते, पण मराठीत मी ‘कम्फर्टेबल नाही’ हे म्हणायची लाज वाटत नाही, बहुधा एक प्रकारचा अभिमानच वाटतो. सगळा भारत एक आहे आणि सर्व भाषा आपल्याच आहेत, पण महाराष्ट्रातच मराठी भाषेला विरोध आहे. मराठी भाषेचा आग्रह धरण्याला जातीयतावादी,

संकुचित समजलं जातं. बरं झालं कुसुमाग्रजांनीच आठवण करून दिलीय ‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ या फटक्यात :
परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी
मायमराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका
कुसुमाग्रज याचं कारणही सांगतात :
भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे


तर उलट कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून कल्पना निघाली की महाराष्ट्रात प्रशासकीय सेवांसाठी होणार्या स्पर्धापरीक्षांना हिन्दी किंवा उर्दूचा पर्याय द्यावा. भारताच्या अल्पसंख्याक आयोगाच्या शिफारसींचा त्यासाठी दाखला दिला गेला. खरी शिफारस आहे की एखाद्या राज्यात भाषिक अल्पसंख्याकांची लोकसंख्या राज्याच्या लोकसंख्येच्या १५% पेक्षा जास्त असेल तर शासकीय सेवा भरतीच्या परीक्षा त्या भाषेतही घेतल्या जाव्यात. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात हिन्दी भाषिकांची संख्या ११% आणि उर्दू भाषिकांची संख्या ७% आहे. तसा हा आकडा सुद्धा खरा मानता येणार नाही, कारण उर्दू म्हणजे मुस्लिमांची भाषा, अशी जातीयतावादी शिकवण देणार्यांनी मराठी मुस्लिम समाजाला पढवलंय की मातृभाषा उर्दू म्हणून नोंदवा - खरंतर येत नसते उर्दू, घरात मराठी बोलत असतात. उर्दूची धाव ‘केळी के साल के उप्पर से धाड्कन् पड्या’ एवढीच जात असते. पण जातीय धर्मांधतेपायी मराठीला नकार देऊन मातृभाषा उर्दू नोंदवतात.



महाराष्ट्राचे थोर कार्यकर्ते, विचारवंत, साहित्यिक हमीद दलवाई सांगत असत की मराठी मुस्लिमानं मातृभाषा मराठीच सांगितली पाहिजे. म्हणून तर ते स्वत: जितके उत्तम कार्यकर्ते होते तितकेच उत्तम साहित्यिकही होते. त्यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी लिहिलेलं आत्मचरित्र ‘मी भरून पावले आहे’ आणि त्यांचंच कार्य पुढे चालवणारे त्यांचे सहकारी सय्यदभाई यांचं आत्मचरित्र ‘दगडावरची पेरणी’ हे मराठी साहित्यिकांचे सार्वकालिक आदर्श नमुने आहेत. पण संकुचित, विषारी अज्ञानातून परशुरामाच्या प्रतिमेला विरोध करणार्या शक्ती मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथिंदडी हमीदभाईंच्या घरापासून काढू देत नाहीत. मग अध्यक्ष कोतापल्ले सांगतात हे ‘सेक्युलर’ व्यासपीठ आहे! साहित्य संमेलनात साहित्य कमी, राजकारण जास्त; मराठी भाषेची जोपासना कमी, हेवेदावे, गटबाजी, पायखेचणीच जास्त


.
वर दुष्काळात तेरावा महिना, प्रशासकीय सेवांच्या स्पर्धापरीक्षांमध्ये हिन्दी-उर्दूचा पर्याय देण्याचा प्रस्ताव.मुळात हिन्दीभाषा तज्ञलोकांनी त्यांची भाषा मोगलांच्या तावडीतुन सोडवणे जास्त हितकारक ठरेल. शिवाय प्रत्येकराज्यात नोकर्यांसाठी जाउन तिथल्या स्थानीयभाषेचा विरोधकरणे हे काही धर्मलक्षण नाही. मराठयांचे भारतभर राज्यअसतानाही मराठी कधीच कोणाही अन्य भाषिावर लादली गोली नाहीं . तंजावुर चे मराठी लोक तमिळ शिकतात बोलतात तर वदोदरा चे गुजराती मध्य व उत्तरभारतातील लढवय्ये लोक हिन्दीलाच मातृभाषाकरुन बसलेत. हे योग्यच इसे आम्ही मानतो. पण हे सेकुलरिज़्मसर्वच भाषिकांनी दाखवाव.

 मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे, लोकभाषाही आहे. राज्याच्या प्रशासनात काम करण्यासाठी जी परीक्षा घ्यायची ती मराठीतूनच असायला हवी कारण निवडल्या जाणार्या अधिकार्यांना सामान्य जनतेशी संवाद ठेवायचाय, मराठीतून प्रशासन चालवायचंय, इतक्या साधा भूमिकेचा विसर पडतो. महाराष्ट्रात यायचं, राहायचं, काम करायचं, घर घ्यायचं तर मराठी आलीच पाहिजे हा आग्रह राहिला दूर, प्रशासकीय सेवांच्या भरतीतच मराठीला पर्याय हिन्दी-उर्दूचा. तुका म्हणे त्यातल्या त्यात महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं हा प्रस्ताव नाकारला - कोण तरी शहाणं आहे म्हणायचं तिथे. पण असा प्रस्ताव येऊ शकतो हीच काळजीची गोष्ट आहे. आत्ता आला, बारगळला, पण परत येणारच नाही याची खात्री देता येत नाही.


मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत - पण अजून बराच लांबचा पल्ला गाठायचाय. दरम्यान तमिळ भाषा अभिजात भाषा म्हणून मान्यता पावली सुद्धा. मराठी ही ज्ञानभाषा असायला हवी, नवं ज्ञान, नवं संशोधन मराठीतून व्हायला हवं हा विचारच कमी होताना दिसतो. भाषा सतत विकसित होत राहायला हवी, तिनं नवे नवे प्रवाह सामीलही करून घ्यायला हवेत आणि नवे नवे प्रवाह निर्माणही करायला हवेत.


तेवढं मात्र काही क्षेत्रांत होताना दिसतंय. मधल्या काळात मराठी चित्रपटांना आलेली अवकळा दूर होऊन मराठी चित्रपट नव्या प्रतिभावंत कलाकृती देतोय - दादासाहेब फाळकेंनी निर्माण केलेल्या पहिल्या चित्रपटाच्या शताब्दी वर्षाच्या काळात हे घडतंय ही आनंदाचीच गोष्ट आहे. गिरीश कर्नाड किंवा पंडित सत्यदेव दुबेंच्या उंचीची माणसंही म्हणत असत की भारतीय नाट्यसृष्टीत नवीन काही प्रथम कुठे घडत असेल तर ते मराठी नाट्यसृष्टीत. साहित्य आणि नाट्य संमेलनांच्या राजकारणापासून, येड्याचा बाजार करून ठेवणार्या बोगस मतदानापासून दूर अनेक तरुण कवी, लेखक, कलाकार, अभिनेते, दिग्दर्शक उत्तम कलाकृती निर्माण करतायत.


मानवी जीवनांतल्या विविध क्षेत्रांमधली प्रतिभावंत नवनिर्मिती आणि विस्कटलेलं, विषारी होऊन बसलेलं राजकीय-सामाजिक जीवन यामध्ये मात्र विलक्षण तुटलेपण आहे, दरी आहे, विसंगती आहे. काही काळापूर्वी जपानमध्ये प्रवास करण्याची मला संधी मिळाली होती. जपानची लोकसंख्या सुमारे १२ कोटी, म्हणजे जवळपास महाराष्ट्राएवढीच. पण जपानला भाषिक न्यूनगंडाचा कुठे त्रास होताना दिसत नव्हता. इंग्लिशचा स्वीकार केलेला असून सर्वत्र भाषा, पाट्या जपानी भाषेत, लिपीत होत्या. मेडिकल, इंजिनियरिंगसकट सर्व ज्ञानशाखांमधलं थेट पीएच्.डी. पर्यंतचं शिक्षण जपानी भाषेत मिळण्याची व्यवस्था आहे, त्याची नोकर्या-उद्योग
ांनी नीट गाठ जोडलेली आहे.


वैभवानं ओसंडून वाहणार्या आठ पदरी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना आठ-आठ मजली पुस्तकांची दुकानं आहेत, त्यातले पहिले सात मजले जपानी भाषेतल्या पुस्तकांनी भरलेले आहेत आणि सर्वच मजले जपानी माणसांनी भरलेले. महाराष्ट्रालाच भरलेली धाड दूर होईल तर कुसुमाग्रजांची जन्मतिथी खर्या अर्थानं साजरी होईल, नित्य नवा ‘मराठी दिस’ जागृतीचा होईल.




उत्सुकता जिज्ञासा जागवणारी एक गुगल वरची पोस्ट

Mystrey Of The Jesus


क्या कोई बता सकता है की अपने समय
की हॉलीवुड की सबसे बड़ी ब्लॉकबस्टर फ़िल्म The Vinci code को भारत में क्यों बैन कर
दिया गया? क्या कोई बता सकता है की ओशो रजनीश ने ऐसा क्या कह दिया था जिससे उदारवादी कहे जाने वाले और अभिव्यक्ति की स्वतंत्रता को ढिंढोरा पीटने वाला अमेरिका रातों-रात उनका दुश्मन हो गया था और उनको जेल में डालकर यातनायें दी गयी और जेल में उनको थैलियम नामक धीमा जहर दिया गया जिससे उनकी बाद में मृत्यु हो गयी? क्यों वैटिकन का पोप बेनेडिक्ट उनका दुश्मन हो गया और पोप ने उनको जेल में प्रताड़ित किया?


दरअसल इस सब के पीछे ईसाइयत का वो बड़ा झूठ है जिसके खुलते ही पूरी ईसाईयत भरभरा के गिर जायेगी। और वो झूठ है प्रभु इसा मसीह के 13 वर्ष से 30 वर्ष के बीच के गायब 17 वर्षों का आखिर क्यों इसा मसीह की कथित रचना बाइबिल में उनके जीवन के इन 17 वर्षों का कोई ब्यौरा नहीं है? ईसाई मान्यता के अनुसार सूली पर लटका कर मार दिए जाने के बाद इसा मसीह फिर जिन्दा हो गया था। तो अगर जिन्दा हो गए थे तो वो फिर कहाँ गए इसका भी कोई अता- पता बाइबिल में नहीं है। ओशो ने अपने प्रवचन में ईसा के इसी अज्ञात जीवनकाल के बारे में विस्तार से बताया था।


जिसके बाद
उनको ना सिर्फ अमेरिका से प्रताड़ित करके निकाला गया बल्कि पोप ने अपने प्रभाव का इस्तेमाल करके उनको 21 अन्य ईसाई देशों में शरण देने से मना कर दिया गया। असल में ईसाईयत/Christianity की ईसा से कोई लेना देना नहीं है। अविवाहित माँ की औलाद होने के कारण बालक ईसा समाज में अपमानित और प्रताडित करे गए जिसके कारण वे 13 वर्ष की उम्र में ही भारत आ गए थे। यहाँ उन्होंने हिन्दू, बौद्ध और जैन धर्म के प्रभाव में शिक्षा दीक्षा ली। एक गाल पर थप्पड़ मारने पर दूसरा गाल आगे करने का सिद्धान्त सिर्फ भारतीय धर्मो में ही है, ईसा के मूल धर्म यहूदी धर्म में तो आँख के बदले आँख और हाथ के बदले हाथ का सिद्धान्त था। भारत से धर्म और योग की शिक्षा दीक्षा लेकर ईसा प्रेम और भाईचारे के सन्देश के साथ वापिस जूडिया पहुँचे। इस बीच रास्ते में उनके प्रवचन सुनकर उनके अनुयायी भी बहुत हो चुके थे। इस बीच प्रभु ईसा के 2 निकटतम अनुयायी Peter और Christopher थे। इनमें Peter उनका सच्चा अनुयायी था जबकि Christopher धूर्त और लालची था।



जब ईसा ने जूडिया पहुंचकर अधिसंख्य यहूदियों के बीच
अपने अहिंसा और भाईचारे के सिद्धान्त दिए तो अधिकाधिक यहूदी लोग उनके अनुयायी बनने लगे। जिससे यहूदियों को अपने धर्म पर खतरा मंडराता हुआ नजर आया तो उन्होंने रोम के राजा Pontius Pilatus पर दबाव बनाकर उसको ईसा को सूली पर चढाने केलिए विवश किया गया। इसमें Christopher ने यहूदियों के साथ मिलकर ईसा को मरवाने का पूरा षड़यंत्र रचा। हालाँकि राजा Pontius को ईसा से कोई बैर नहीं था और वो मूर्तिपूजक Pagan धर्म जो ईसाईयत और यहूदी धर्म से पहले उस क्षेत्र में काफी प्रचलित था और हिन्दू धर्म से अत्यधिक समानता वाला धर्म है का अनुयायी था। राजा अगर ईसा को सूली पर न चढाता तो अधिसंख्य यहूदी उसके विरोधी हो जाते और सूली पर चढाने पर वो एक निर्दोष व्यक्ति की हत्या के दोष में ग्लानि अनुभव् करता तो उसने Peter और ईसा के कुछ अन्य विश्वस्त भक्तों के साथ मिलकर एक गुप्त योजना बनाई।



अब पहले मैं आपको यहूदियों की सूली के बारे में बता दूँ। ये विश्व का सजा देने का सबसे क्रूरतम और जघन्यतम तरीका है। इसमें व्यक्ति के शरीर में अनेक कीले ठोंक दी जाती हैं जिनके कारण व्यक्ति धीरे धीरे मरता है। एक स्वस्थ व्यक्ति को सूली पर लटकाने के बाद मरने में 48 घंटे तक का समय लग जाता है और कुछ मामलो में तो 6 दिन तक भी लगे हैं। तो गुप्त योजना के अनुसार ईसा को सूली पर चढाने में जानबूझकर देरी की गयी और उनको शुक्रवार को दोपहर में सूली पर चढ़ाया गया। और शनिवार का दिन यहूदियों के लिए शब्बत का दिन होता हैं इस दिन वे कोई काम नहीं करते।


शाम होते ही ईसा को सूली से उतारकर गुफा में रखा गया ताकि शब्बत के बाद उनको दोबारा सूली पर चढ़ाया जा सके। उनके शरीर को जिस गुफा में रखा गया था उसके पहरेदार भी Pagan ही रखे गए थे। रात को राजा के गुप्त आदेश के अनुसार पहरेदारों ने Peter और उसके सथियों को घायल ईसा को चोरी करके ले जाने दिया गया और बात फैलाई गयी की इसा का शरीर गायब हो गया और जब वो गायब हुआ तो पहरेदारों को अपने आप नींद आ गयी थी। इसके बाद कुछ लोगों ने पुनर्जन्म लिये हुए ईसा को भागते हुए भी देखा। असल में तब जीसस अपनी माँ Marry Magladin और अपने खास अनुयायियों के साथ भागकर वापिस भारत आ गए थे। इसके बाद जब ईसा के पुनर्जन्म और चमत्कारों के सच्चे झूठे किस्से जनता में लोकप्रिय होने लगे और यहदियों को अपने द्वारा उस चमत्कारी पुरुष/ देव पुरुष को सूली पर चढाने के ऊपर ग्लानि होने लगी और एक बड़े वर्ग का अपने यहूदी धर्म से मोह भंग होने लगा तो इस बढ़ते असंतोष को नियंत्रित करने का कार्य इसा के ही शिष्य Christopher को सौंपा गया क्योंकि Christopher ने ईसा के सब प्रवचन सुन रखे थे। तो यहूदी धर्म गुरुओं और christopher ने मिलकर यहूदी धर्म ग्रन्थ Old Testament और ईसा के प्रवचनों को मिलकर एक नए ग्रन्थ New Testament अर्थात Bible की रचना की और उसी के अधार पर एक ऐसे नए धर्म ईसाईयत अथवा Christianity
की रचना करी गयी जो यहूदियों के नियंत्रण में था।


 इसका नामकरण भी ईसा की बजाये Christopher के नाम पर किया गया। ईसा के इसके बाद के जीवन के ऊपर खुलासा जर्मन विद्वान् Holger Christen ने अपनी पुस्तक Jesus Lived In India में किया है। Christen ने अपनी पुस्तक में रुसी विद्वान Nicolai Notovich की भारत यात्रा का वर्णन करते हुए बताया है कि निकोलाई 1887 में भारत भ्रमण पर आये थे। जब वे जोजिला दर्र्रा पर घुमने गए तो वहां वो एक बोद्ध मोनास्ट्री में रुके, जहाँ पर उनको Issa नमक बोधिसत्तव संत के बारे में बताया गया। जब निकोलाई ने Issa की शिक्षाओं, जीवन और अन्य जानकारियों के बारे में सुना तो वे हैरान रह गए क्योंकि उनकी सब बातें जीसस/ईसा से मिलती थी। इसके बाद निकोलाई ने इस सम्बन्ध में और गहन शोध करने का निर्णय लिया और वो कश्मीर पहुंचे जहाँ जीसस की कब्र होने की बातें सामने आती रही थी। निकोलाई की शोध के अनुसार सूली पर से बचकर भागने के बाद जीसस Turkey, Persia (Iran) और पश्चिमी यूरोप, संभवतया इंग्लैंड से होते हुए 16 वर्ष में भारत पहुंचे। जहाँ पहुँचने के बाद उनकी माँ marry का निधन हो गया था।



जीसस यहाँ अपने शिष्यों के साथ चरवाहे का जीवन व्यतीत करते हुए 112 वर्ष की उम्र तक जिए और फिर मृत्यु के पश्चात् उनको कश्मीर के पहलगाम में दफना दिया गया। पहलगाम का अर्थ ही गड़रियों का गाँव हैं। और ये अद्भुत संयोग ही है कि यहूदियों के महानतम पैगम्बर हजरत मूसा ने भी अपना जीवन त्यागने के लिए भारत को ही चुना था और उनकी कब्र भी पहलगाम में जीसस की कब्र के साथ ही है। संभवतया जीसस ने ये स्थान इसीलिए चुना होगा क्योंकि वे हजरत मूसा की कब्र के पास दफ़न होना चाहते थे। हालाँकि इन कब्रों पर मुस्लिम भी अपना दावा ठोंकते हैं और कश्मीर सरकार ने इन कब्रों को मुस्लिम कब्रें घोषित कर दिया है और किसी भी गैरमुस्लिम को वहां जाने की इजाजत अब नहीं है। लेकिन इन कब्रों की देखभाल पीढ़ियों दर पीढ़ियों से एक यहूदी परिवार ही करता आ रहा है। इन कब्रों के मुस्लिम कब्रें न होने के पुख्ता प्रमाण हैं।


सभी मुस्लिम कब्रें मक्का और मदीना की तरफ सर करके बनायीं जाती हैं जबकि इन कब्रों के साथ ऐसा नहीं है। इन कब्रों पर हिब्रू भाषा में Moses और Joshua भी लिखा हुआ है जो कि हिब्रू भाषा में क्रमश मूसा और जीसस के नाम हैं और हिब्रू भाषा यहूदियों की भाषा थी। अगर ये मुस्लिम कब्र होती तो इन पर उर्दू या अरबी या फारसी भाषा में नाम लिखे होते। सूली पर से भागने के बाद ईसा का प्रथम वर्णन तुर्की में मिलता है। पारसी विद्वान् F Muhammad ने अपनी पुस्तक Jami- Ut- Tuwarik में लिखा है कि Nisibi(Todays Nusaybin in Turky) के राजा ने जीसस को शाही आमंत्रण पर अपने राज्य में बुलाया था। इसके आलावा तुर्की और पर्शिया की प्राचीन कहानियों में Yuj Asaf नाम के एक संत का जिक्र मिलता है। जिसकी शिक्षाएं और जीवन की कहनियाँ ईसा से मिलती हैं। यहाँ आप सब को एक बात का ध्यान दिला दू की इस्लामिक नाम और देशों के नाम पढ़कर भ्रमित न हो क्योंकि ये बात इस्लाम के अस्तित्व में आने से लगभग 600 साल पहले की हैं। यहाँ आपको ये बताना भी महत्वपूर्ण है कि कुछ विद्वानों के अनुसार ईसाइयत से पहले Alexendria तक सनातन और बौध धर्म का प्रसार था।


इसके आलावा कुछ प्रमाण ईसाई ग्रंथ Apocrypha से भी मिलते हैं। ये Apostles के लिखे हुए ग्रंथ हैं लेकिन चर्च ने इनको अधिकारिक तौर पर कभी स्वीकार नहीं किया और इन्हें सुने सुनाये मानता है। Apocryphal (Act of Thomas) के अनुसार सूली पर लटकाने के बाद कई बार जीसस sant Thomus से मिले भी और इस बात का वर्णन फतेहपुर सिकरी के पत्थर के शिलालेखो पर भी मिलता है। इनमे Agrapha शामिल है जिसमे जीसस की कही हुई बातें लिखी हैं जिनको जान बुझकर बाइबिल में जगह नहीं दी गयी और जो जीसस के जीवन के अज्ञातकाल के बारे में जानकारी देती हैं। इसके अलावा उनकी वे शिक्षाएं भी बाइबिल में शामिल नहीं की गयी जिनमे कर्म और पुनर्जन्म की बात की गयी है जो पूरी तरह पूर्व के धर्मो से ली गयी है और पश्चिम के लिए एकदम नयी चीज थी। लेखक Christen का कहना है की इस बात के 21 से भी ज्यादा प्रमाण हैं कि जीसस Issa नाम से कश्मीर में रहा और पर्शिया व तुर्की का मशहूर संत Yuj Asaf जीसस ही था।


जीसस का जिक्र कुर्द लोगों की प्राचीन कहानियों में भी है। Kristen हिन्दू धर्म ग्रंथ भविष्य पुराण का हवाला देते हुए कहता है कि जीसस कुषाण क्षेत्र पर 39 से 50 AD में राज करने वाले राजा शालिवाहन के दरबार में Issa Nath नाम से कुछ समय अतिथि बनकर रहा। इसके अलावा कल्हण की राजतरंगिणी में भी Issana नाम के एक संत का जिक्र है जो डल झील के किनारे रहा। इसके अलावा ऋषिकेश की एक गुफा में भी Issa Nath की तपस्या करने के प्रमाण हैं। जहाँ वो शैव उपासना पद्धति के नाथ संप्रदाय के साधुओं के साथ तपस्या करते थे। स्वामी रामतीर्थ जी और स्वामी रामदास जी को भी ऋषिकेश में तप करते हुए उनके दृष्टान्त होने का वर्णन है। विवादित हॉलीवुड फ़िल्म The Vinci Code में भी यही दिखाया गया है कि ईसा एक साधारण मानव थे और उनके बच्चे भी थे।
इसा को सूली पर टांगने के बाद यहूदियों ने ही उसे अपने फायदे के लिए भगवान बनाया।


वास्तव में इसा का Christianity और Bible से कोई लेना देना नहीं था। आज भी वैटिकन पर Illuminati अर्थात यहूदियों का ही नियंत्रण है और उन्होंने इसा के जीवन की सच्चाई और उनकी असली शिक्षाओं कोको छुपा के रखा है।
वैटिकन की लाइब्रेरी में बहार के लोगों को इसी भय से प्रवेश नहीं करने दिया जाता। क्योंकि अगर ईसा की भारत से ली गयी शिक्षाओं, उनके भारत में बिताये गए समय और उनके बारे में बोले गए झूठ का अगर पर्दाफाश हो गया तो ये ईसाईयत का अंत होगा और Illuminati की ताकत एकदम कम हो जायेगी। भारत में धर्मान्तरण का कार्य कर रहे वैटिकन/Illuminati के एजेंट ईसाई मिशनरी भी इसी कारण से ईसाईयत के रहस्य से पर्दा उठाने वाली हर चीज का पुरजोर विरोध करते हैं। प्रभु जीसस जहाँ खुद हिन्दू धर्मं/ भारतीय धर्मों को मानते थे, वहीँ उनके नाम पर वैटिकन के ये एजेंट भोले-भाले गरीब लोगों को वापिस उसी पैशाचिकता की तरफ लेकर जा रहे हैं जिन्होंने प्रभु Issa Nath को तड़पा तड़पाकर मारने का प्रयास किया था।
जिस सनातन धर्म को प्रभु Issa ने इतने कष्ट सहकर खुद आत्मसात किया था उसी धर्म के भोले भाले गरीब लोगों को Issa का ही नाम लेकर वापिस उसी पैशाचिकता की तरफ ले जाया जा रहा है।




साभार : भाई अर्पित दीक्षित जी


हि पोस्ट उगल वरून घेतलेली आहे यातल्या मजकुराशी माझा काहीही संबंध नाही.
कुतूहल म्हणून इथे टाकलेली आहे .

पूर्वजांशी संबंधित जगातील उत्सव



पूर्वजांप्रती कृतज्ञता
ही जागतिक भावना ;


भारतात पितृपंधरवडा होतो...


⚜ सर्वपित्री अमावस्या तसा कर्नाटकात म्हाळ किंवा म्हाळवस,
⚜ तामिळनाडुत आदि अमावसायी


⚜ केरलमध्ये करिकडा वावुबली अशा सणांद्वारे पूर्वजांना आदरांजली वाहातात.
⚜ नेपाळमध्ये ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान गायजात्रा म्हणजे गावभर गाय फिरवून गोदानाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडले असे मानतात..

⚜ लाओस, थायलँडमध्ये उल्लंबन म्हणतात. तेथील महायान आणि थेरवादी बौद्ध लोक तो पाळतात..
⚜ कंबोडीयात प्रचुम बेंडा हा दिवस त्यासाठी पाळतात. खेमर कालगणनेतील दहाव्या महिन्यातला पाचवा दिवस यासाठी निवडला आहे. या दिवशी सर्व लोक संध्याकाळी बुद्धविहीरात जमतात. येताना भात, मासळी घेऊन येतात. पूर्वजांच्या नावे लिहीलेली निमंत्रणे त्यांचा नावाचा पुकारा करून आगीत जाळतात. त्यावर आपण आणलेला भात घालतात, मासळी घालतात..

⚜ कोरीयात यालाच सेवालाल म्हणतात. चार पिढ्यांपर्यंतचे मृतात्मे वंशाशी जोडलेले असतात असे मानतात विशिष्ठ वाणाचा भाताचा पिंड करून वाहातात त्याला सोंग पियॉन असे नाव आहे. येथे फक्त पुरूषच हे कार्य करतात..
⚜ मलेशियामध्ये माह मेरी जमातीचे लोक अरी मोयांग नावाने हे कार्य करतात..


⚜ विएतनाम मध्ये थान मिन्ह या नावाने पितरांना आठवण्याचे दिवस घातले जातात..
⚜ चीनमध्ये गेल्या २५०० वर्षांपासून क्विंग मिन्ह नावाने हे दिवस साजरे करतात. तेथे हे दिवस एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात येतात. त्या काळात तेथे पाऊस असतो, सुगी असते..

⚜ जपानमध्ये पर्वेकडील भागात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तर पश्चिमेकडील भागात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवस यासाठी देतात. या दिवसांना ओबोन ओमात्सुरी म्हणतात. पूर्वजांसाठी आकाश कंदिल लावतात. दिवे पाण्यात सोडतात, तिसर्‍या दिवशी तीरो नागाशी – विशेष अन्नपदार्थ करतात..


⚜ इंग्लंडमध्ये ही पद्धत १५३६ पासून सुरू झाली. या काळात पूर्वजांच्या थडग्यांची डागडूजी करतात. त्यावर आरास करतात..
⚜ जर्मनीत एर्नटं डांक फेस्ट हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असतो..
⚜ रोम मध्ये लेम्युलारिया हा तत्सम सण आहे..


⚜ मादागास्कर बेटांमध्ये दर सात वर्षांनी पूर्वजांची प्रेते उकरून त्यांचे कपडे बदलतात..
⚜ हैती देशात वुडू धर्मीय लोक पूर्वजांचे स्मरण करतात त्या दिवसांचे नाव आहे – जोर दे औक्स. आपल्या पूर्वजांचे मृतात्मे मानव आणि देव यांच्यात संवाद सांधण्याचे काम करतात असे ते मानतात..


⚜ मेक्सिकोमध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात "दिआ द ला मुरतोस" हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे..
⚜ अमेरिकेत युरोपीय वंशजांसाठी मे मधला शेवटचा सोमवार मनवतात तर सप्टेंबरमधला शेवटचा रविवार आदिनिवासी अमेरिकी पूर्वजांसाठी..
⚜ ऑल सोल्स डे नावाने अनेक देशांमध्ये पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते..


⚜ याशिवायही अनेक देशांमध्ये, लोकसमूहांमध्ये ‘पितरं घालण्याच्या’ पद्धती असू शकतील..
⚜ बहुतेक सर्व सभ्यतांमध्ये पूर्वजांची आठवण करण्याची प्रथा आहे. त्यात रूढ असलेल्या कृती वेगवेगळ्या आहेत असे दिसते. ते ते स्थानिक लोक त्या-त्या कृती त्या-त्या दिवसात केल्या नाहीत किंवा त्यांना जमले नाही तर हळहळत असतील, पाप लागले असे म्हणत असतील..


⚜ जगभर रूढी वेगवेगळ्या आहेत त्यामुळे त्या न केल्याबद्दल 'पाप' लागायचेच असेल तर सगळ्यांनाच पाप लागणार कारण कोणीच जगातल्या सर्वच्या सर्व रुढी पाळत नाहीत..
⚜ रुढी कालानुसार बदलतात पण आपल्या जन्माला कारण असणार्‍यांबद्दल कृतज्ञ राहाण्याची भावना मात्र सर्वांच्यात शाबूत दिसते...
🙏​

मस्त कविता

कविता कोणाची आहे माहिती नाही पण कविता खरच खुप सूंदर आहे😂😂😂 

नागपूरच्या चड्डीला
बारामतीचा नाडा
दर सहा महिन्याला
बांधा आणि सोडा !


कमळाबाईंनी दिली परीक्षा
अन् घड्याळ झाले पास
धनुष्याचा हुकला नेम अन्
नशिबी आला वनवास !


शरदाच्या चांदण्यात
देव इंद्र झाला राजा
कुठ नेवून ठेवला मित्रांनो
खरच महाराष्ट्र माझा !


आजचा विधान सभेतला उखाणा

फडणवीसांच्या पुस्तकाला पवारांचं कव्हर ..राष्ट्रवादी निघाली कमळाबाईची लव्हर......!!!😂