Friday, 20 April 2018

Rapes and Indian Mentality


Rapes and Indian Mentality

Good Afternoon Friends.....

Nowadays the whole Indian society is churned in the pain of recent brutal rapes of minor girls in unnao and kathua. Alike nirbhaya case the kathua case is an instance of highly intensified Heinous physical threatening to a 8 year old girl child in Kashmir's Kathua village.. The victim belongs to bharatwal community which is shepherd community and largely Muslim... Two BJP leaders raped that to take revenge of old war between two communities..... The religious Vendettas between the two sides has destroyed the life of 8 year old girl.... She is kept in temple for 8 days repeatedly raped by 5-6 men. Raped by police officer even after killing her physically her dead body is raped....This news has brought misery and melancholy to everyone's heart ♥.....
In second case , in unnao a girl I raped by BJP MLA and not only this but also the nefarious behaviour of Rapist MLA has made cops to arrest victim's father and her father the only witness is also killed by them.... But so called Ram Bhaktas kept mum on this and the great saffron wearing Yogi Government didn't even arrests or expelled that MLA almost for a week. They tried to hide this and only after huge anger and criticism he was arrested...
After this there was sudden rush in social media and in television media about the religious identity of victim and also the accused..... Many of my rightist friends have denied the sympathy for asifa but they found is against their dharma and leftist friends started targeting Hindu Dharma and complete RSS BJP......
How Complete Hindu Dharma can be blamed for this?  and why rights don't take it as just a rape case why they think its aginst dharma and favoring rapists just because they are Hindus and RSS related people......

The humanity and mercy for victim is lost in human society of India.... Nobody want a social security system and a proper judiciary to prevent such incidents...but Even the educated class of India is also divided into rightist and leftists....... And hence Prominent  problems are far away from discussion and Solution seems to be impossible.....
We are having mecauley's destructive education system and his imposed IPC judiciary and this two systems should be reformed..... Because the education is not necessary to get employment but it is exactly what Swami Vivekananda  defined education as the manifestation of the latent perfection in man. Education is for  inculcating human values in society.... And if few amongst the society do not follow the rules of human behaviour i.e. if they behave wrongly or attempt crime like rape or anything which against the morality and existence of any individual human being or society then there must be strong correct appropriate judiciary to punish them so as to prevent such heinous crimes...
We don't have any of it and our politicians don't even think of it...its misery of our society.... Which is based on Krishna's philosophy of kshatratej or ability to govern and perish the devilish elements.. 
Anyway thank you 😊...

Sunday, 1 April 2018

Ancient Vedic Science Evidences ...


आपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का ? आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ? ( एक अभ्यासपूर्ण विवेचन )
सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत वापरून सिद्ध करतो हि सगळी तार्किक दृष्टी आहे. आपला हा सुद्धा दावा आहे कि मानवाने ३०० वर्षात अफाट प्रगती केलेली आहे.
सूर्य-चंद्र ग्रहणे, कोणत्या दिवशी, नेमक्या कोणत्या वेळी, जगात कुठे, कशी दिसतील याची अचूक गणिते या सिद्धांताच्या आधारे आपण गेली तीनशे वर्षे करीत आहोत. असा आपला दावा आहे
ज्या माणसाला वेद म्हणजे काय आहे हे माहित नाही. ज्या माणसाला उपनिषदे म्हणजे काय हे माहित नाही. ज्या माणसाला प्राचीन भारतीय गणिती पद्धत म्हणजे काय हे माहित नाही. ज्या माणसाला प्राचीन भारतीय खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र काय हे माहित नाही त्या माणसाला हा लेख वाचून विज्ञानाबद्दल प्रेमाचे भरते येणे स्वाभाविक आहे. परंतु हे सगळे अर्ध सत्य आहे. मध्यंतरी एका विद्वानाने अशीच टिप्पणी केली होती सगळे काही वेदात असेल तर तुम्ही पुढचे १० -१५ शोध आजच लावा कि, विज्ञान हे शोध लावण्याची वाट का पहात बसला आहात.
तर विज्ञान विरुद्ध प्राचीन भारतीय ज्ञान / अध्यात्म या विषयावर आपण मुद्देसूद, पुराव्यांच्या सह चर्चा करूया. विज्ञानाचे जे प्रेमी असतील त्यांनी आवर्जून हा लेख वाचावा माझ्या मुद्द्यांच्या बद्दल काही आक्षेप असतील ते नोंदवावे. आणि जर माझे मुद्दे योग्य असतील तर मान्य करण्याचा मोठेपणा सुद्धा दाखवावा.
१) https://www.speakingtree.in/allslides/mystery-behind-the-iron-pillar-of-qutab-minar/288949
या पेज ला भेट द्या. कुतुब मिनार च्या समोर एक लोहस्तंभ आहे. २२ फुट उंच सुमारे ६.५ टन वजन असणारा wrought iron अर्थात ओतीव लोखंडाचा बनलेला स्तंभ. ज्याचे वय कमीत कमी १६०० वर्षे आहे. ज्याच्यावर एक अत्यंत पातळ असे आवरण चढवले आहे ज्यामुळे गेली १६०० वर्षे या खांबाला गंज लागलेला नाही. आय आय टी कानपूर च्या धातू तज्ञांनी अभ्यास करून एका विशिष्ट रासायनिक प्रक्रियेचा उल्लेख केला आहे ज्याचे आवरण फक्त १० micron आहे त्यामुळे हा स्तंभ अजूनही गंज पकडत नाही.
आपल्या महान वैज्ञानिक प्रगती चे मापदंड असणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या कारला सुद्धा मुंबईच्या खाऱ्या वातावरणात ३ ते ५ वर्षात बुडाला भरपूर गंज लागतो आणि मुंबईतील जुनी कार नेहमीच निम्म्या किमतीला विकली जाते. १६०० वर्षांच्या पूर्वी जिवंत असणारी अंधश्रद्धाळू विज्ञान परान्मुख माणसे जे करून गेली आहेत त्याची नक्कल तरी करण्याची आजच्या वैज्ञानिकाची आणि त्यांच्या समर्थकांची तयारी आहे का ??
२) https://www.quora.com/What-is-so-unique-about-the-Lepakshi-temple-Andhra-Pradesh
लेपाक्षी मंदिर आंध्र प्रदेश. या मंदिरात एक दगडाचा स्तंभ ( column ) आहे तो अधांतरी आहे. त्या खांबाच्या खालून आपण एक इंच जाडीची कोणतीही वस्तू फिरवून त्याची खात्री करून घेऊ शकतो. याच पद्धतीचा दीपस्तंभ मी विजयनगर साम्राज्यात सुद्धा पहिला होता. एक मेकानिकल इंजिनियर म्हणून मी तो कसा बनवला असेल हे नक्की सांगू शकतो. सुमारे १० टन वजन असणारा एक २ फुट व्यास असणारा दगड घ्या. त्याच्यावर तुम्हाला हवे तसे नक्षीकाम करा ( सुमारे ५ ते १० वर्षे लागणार हे करायला पारंपारिक हत्यारे वापरून. ) नंतर त्या खांबाच्या एका बाजूला एक मोठे गोल भोक करा त्यात लोहकांत दगड ( चुंबकीय गुणधर्म असणारा दगड ) घट्ट ठोकून बसवा. नंतर जिथे हा स्तंभ उभा करायचा असेल तिथे जमिनीत या दगडाचे वारा, पाउस, उन, वादळ या सगळ्या प्रकारात सुद्धा रक्षण करू शकेल इतका मजबूत पायाचा दगड बसवा त्यात तितकाच मजबूत पायाचा लोहकांत दगड ठोकून बसवा. आता या दोन्ही लोह्कांत दगडांचा असा संयोग हवा कि त्यांनी परस्परांना दूर तर लोटले पाहिजे पण ते स्थिर सुद्धा राहिले पाहिजेत ( १० टन वजनाचा दगड घेऊन आजच्या कोणत्याही वैज्ञानिकाने हे करून दाखवावे ) मग खालील दगडावर हा वरील दगड ढकलत ढकलत आणा दोन्ही दगड एकमेकांच्या चुंबकीय क्षेत्रात आले कि ते स्थिर होतील. आणि नंतर १००० वर्ष तसेच राहतील.. ( अजून किती काळ राहतील ते माहित नाही ) असा अफलातून तंत्रज्ञानाचा वापर करणारी मंडळी निर्बुद्ध होती ? त्यांना विज्ञान तुमच्या न्यूटन पेक्षा कमी समजत होते असे तुमचे मत आहे का ? बर हे करणारी मंडळी कलाकार होती, शिल्पी होती, तुमच्या पुरोगामी भाषेत बहुजन.. ब्राह्मण सुद्धा नव्हती तरी त्यांचे गणित, विज्ञान आणि निसर्गाचा अभ्यास इतका पक्का होता कि ती मंडळी या गोष्टी लीलया करत होती.
३) महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर किरणोत्सव : आदिमाया महालक्ष्मीचे हे मंदिर कमीत कमी १००० वर्ष जुने आहे. या मंदिरात भूगोलाचा अभ्यास करून मुख्य द्वार असे बनवले आहे कि दर वर्षी विशिष्ट नक्षत्र असताना सूर्याचे पहिले किरण हे देवीच्या पायावर पडते आणि जसा सूर्य वर वर जातो ती किरणे तिच्या मुखापर्यंत पोचतात. हा सोहळा किरणोत्सव म्हणून ओळखला जातो. ज्या लोकांनी हे मंदिर बांधले त्यांचा भूगोल अत्यंत पक्का असल्या शिवाय आणि त्यांचे गणितीय ज्ञान अत्यंत चपखल असल्याशिवाय हे शक्य होऊ शकेल ? आज असेच एक मंदिर उभे करायचे ठरले तुमचे शास्त्रज्ञ सध्या ज्ञात असणारी साधने आणि तंत्रज्ञान घेऊन सुद्धा १००० वर्ष टिकेल अशी वस्तू निर्माण करू शकतील ? आणि याच पद्धतीचा किरणोत्सव तुमच्या न्यूटन च्या मूर्तीवर पाडून दाखवू शकतील ???
४) कैलाश मंदिर वेरूळ : वेरूळ येथील लेणीनच्या मध्ये असणारे कैलास मंदिर हे जगातील पहिले आधी कळस मग पाया या पद्धतीने बांधलेले मंदिर आहे. ७व्या शतकात बांधलेले हे मंदिर एकाच शीलाखंडाला पूर्णपणे कोरून बनवले आहे. कमीत कमी तीन पिढ्या या मंदिराच्या निर्मितीसाठी राबल्या आहेत. त्या काळातील लोकांना एकच इतका मोठा दगड कसा ओळखू आला असेल. त्याचे माप कसे कळले असेल कि त्यांनी बरोबर तीन मजली मंदिर उभे केले. आधी कळस मग पाया पद्धती वापरून बनवलेले हे एकमेव मंदिर म्हणजे शिल्पकलेचा आणि तत्कालीन लोकांच्या भूमीच्या गर्भाच्या अभ्यासाचा एक जिवंत नमुना आहे.
५) https://plus.google.com/101257929962594949214/posts/gTq2Jyaj8ga
बाण स्तंभ. सोरटी सोमनाथाचे कुप्रसिद्ध मंदिर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे मंदिर गझनीच्या मोहमदने १७ वेळा लुटले होते. या मंदिरात एक बाणस्तंभ आहे. त्या स्तंभावर संस्कृत मध्ये असे कोरले आहे कि या स्तंभापासून अंतर्क्तिका पर्यंत सरळ रेषा मारली तर भूमी लागत नाही. या लेखासोबत त्याच्या लिंक सुद्धा दिल्या आहेत. गुगल map चा फोटो सुद्धा दिला आहे. त्या काळातील लोकांच्याकडे आज असणारी कोणतीही सामुग्री नसताना सुद्धा ते या पद्धतीची घोषणा कशी काय करू शकले असतील ? आज च्या विज्ञानाकडे याचे उत्तर आहे ?? त्यांनी नक्की कोणती यंत्रे, कोणती तंत्रे वापरली असतील ज्यामुळे त्यांना हे ज्ञान प्राप्त झाले ???
६) http://justfunfacts.com/interesting-facts-about-meenakshi-amman-temple/
मीनाक्षी टेम्पल मदुराई : सुमारे २५०० वर्ष जुने मंदिर. बांधकाम करताना ३० ते ३५ टन वजनाच्या शिळा हत्तींच्या सहाय्याने ढकलत आणून निर्मिती केलेली आहे. या मंदिरात सहस्त्रखंबी मंडप आहे. त्यात ९८५ खांब आहेत आणि त्यातील काही खांबांवर आपण नाणे वाजवले तर सा ते नि असे सप्तसूर ऐकू येतात. मी मध्यंतरी डिस्कव्हरी वर एक कार्यक्रम पाहिला होता ज्यात या मंदिराचे वर्णन आहे. त्यात त्यांना सुद्धा हाच प्रश्न पडला कि २५०० वर्षांच्या पूर्वी ३० टन वजनाचा दगड कसा हलवला असेल. त्या साठी त्यांनी एक दगड आणला सुमारे २५ टन वजनाचा कारण आजच्या वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत भारतात दगड वाहण्यासाठी असणारा सगळ्यात मोठा ट्रेलर सुद्धा २५ टन वजनच वाहून नेऊ शकतो. आणि जुन्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे त्यांनी लाकडी ओंडके तासून गोल केले त्यावर तो दगड टाकून त्यांनी हत्तींचा वापर करून ढकलून पहिले आणि त्यांना तसे करता आले . ( ज्याला आपण तरफ चे तत्व किंवा लिव्हर आर्म प्रिन्सिपल म्हणतो त्याच तत्वाचा वापर करून हि अत्यंत अवजड वस्तू हत्तींनी लीलया ढकलून दाखवली )
७) https://en.wikipedia.org/wiki/Konark_Sun_Temple
कोणार्क चे सूर्य मंदिर : संपूर्णपणे लोह्कांत दगड वापरून बनवलेले मंदिर म्हणजे कोणार्क चे सूर्य मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे लोह्कांत दगड एकमेकांचे magnetic forces balance करून घट्ट बसवले होते. त्या नंतर त्यावर शिल्पे घडवली. मंदिराचा कळस हा सुद्धा लोह्कांत दर्जाचा होता आणि तो कळस संपूर्ण मंदिराचे magnetic forces control करत असे. या मंदिराच्या आत जे राशी चक्र काढले होते ते या पद्धतीचे होते कि रोज सूर्य उगवताना ज्या राशीत असेल त्या राशीवर बरोबर सूर्याचे पहिले किरण पडणार. अर्थात रोज राशी बदलला अनुसरून किरणांची जागा बदलणार. कल्पना करा याला भूगोल आणि स्थापत्याचा काय दर्जाचा अभ्यास लागला असेल.
या मंदिराची मला माहित असणारी कथा सांगतो. हे मंदिर समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे. आणि त्या भागात समुद्र किनारा अत्यंत खडकाळ आहे. या किनाऱ्याजवळ येणारी जहाजे त्यातील लोखंड या magnetic forces ने ओढली जाऊन खडकावर आपटून फुटून जात असत.  ज्यावेळी वास्को द गामा भारतात आला त्याच्या दोन पैकी एका जहाजाचा याच पद्धतीने खडकावर आदळून अंत झाला. त्याला यात मंदिराचा काही तरी परिणाम आहे हे लक्षात आले त्याने जहाजावरून तोफा डागल्या. त्यामुळे मंदिराचा कळस निखळला. कळस निघाल्याने सगळे magnetic forces unbalance झाले आणि मंदिर जवळ जवळ उध्वस्त झाले. नंतर ब्रिटीश कालखंडात ब्रीतीशाना कल्पना होती कि आपण हे मंदिर पूर्ववत करू शकत नाही. त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात चक्क कोन्क्रीट ठासून भरले.
आजच्या महान विज्ञान आणि वैज्ञानिकांना आवाहन आहे. ते कोन्क्रीट काढा आणि पुन्हा ते मंदिर पूर्ववत करून दाखवा.

८) https://en.wikipedia.org/wiki/Varāhamihira
हि माझी पोपटपंची नाही. विकिपीडियाच वराह मिहीर चे गणितातील योगदान सांगतो आहे. सदरील ऋषींच्या बद्दल अजून एक ज्ञात बाब म्हणजे ते सूक्ष्म देह धारण करून ( यावर विज्ञानाचा बिलकुल विश्वास नाही ) अंतराळात भ्रमण करत असे. आणि त्यांनी काही श्लोक लिहिले आहेत ज्यात त्यांनी तुम्ही अंतराळात प्रवास करत असला आणि तुम्हाला जिथे आहात तेथून सूर्य अथवा पृथ्वी दोन्ही सुद्धा दिसत नसेल तरीपण आपले लोकेशन ( स्थान ) कसे ओळखावे आणि प्रवास करावा यावर मार्गदर्शन केलेले आहे.
मध्यंतरी डिस्कव्हरीवर मंगलयान सफल झाल्यावर एक कार्यक्रम दाखवला गेला. त्यात नासा पहिली प्रयत्नात का अपयशी झाली याची चर्चा होती. आणि भारत का सफल झाला याचे सुद्धा विवरण होते. मंगलयान मंगल ग्रहाच्या कक्षेत स्थिर करताना एक समस्या वर सांगितल्या प्रमाणेच उद्भवली कि मंगल यान मंगल ग्रहाच्या उलट बाजूला होते. एका बाजूला सूर्य अन दुसऱ्या बाजूला पृथ्वी होती यानाला या पैकी काहीही दिसत नव्हते. या ठिकाणी वराह मिहीर ने सांगितलेली पद्धत वापरून प्रोग्राम बनवला होता आणि तो परफेक्ट होता त्या प्रमाणे मंगल यान सफलपणे मंगळावर उतरले.
९)  http://www.ancientpages.com/2014/05/15/atomic-theory-invented-2600-years-ago-acharya-kanad-genius-ahead-time/
आचार्य कणाद ज्यांनी अणु त्याच्या गर्भातील छोटे पार्टिकल यांच्यावर शास्त्रीय भाष्य केलेले आहे. आणि हा लेख वाचा. मी सांगत नाही तज्ञ अश्या पाश्चात्य विद्वानांनी सुद्धा यावर शिक्का मोर्तब केलेलं आहे.
१०) वैदिक गणित, आपले पंचांग आणि त्यावर आधारित पर्जन्य मानाचे अंदाज:
गणित हा भारतीयांनी जगाला दिलेला शोध आहे. शून्यावर आधारित गणमान पद्धती हि भारताची देण आहे. भारतातून हे ज्ञान मध्य पूर्वेला गेले अरब लोकांनी ते युरोपात नेले. त्यामुळे गणिताला युरोपियन लोक अरेबिक म्हणत आणि अरबी लोक हिंदसा म्हणत अर्थात हिंद मधून आलेली गणन पद्धत. यावर आधारित आपले पंचांग हे आज सुद्धा सगळ्यात परफेक्ट आहे. आपल्याकडे पर्जन्यमान दर्शवणारे जितके ग्रंथ आहेत ते नक्षत्रांची स्थिती आणि त्यानुसार पर्जन्य आणि येणारे पिक हा अंदाज वर्तवतात तो अंदाज आपल्या हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा अधिक चांगला असतो.
११) ज्या विज्ञानाच्या यशाच्या आपण गप्पा मारत असतो त्याचा पाया उत्तम गणिती ज्ञान हा आहे आणि त्यात भारतीय खूप आधी पासून तज्ञ आहेत. आज तुम्ही गणिताचे ऑलिम्पियाड जिंकलेल्या कोणत्याही मुलाला विचारा तू काय करणार तो सांगतो मी पाय चे मूल्य अधिकाधिक चांगले मांडणार. पाय हा वर्तुळाचा व्यास मोजण्यासाठी वापरला जाणारा स्थिरांक आहे.
https://hindufocus.wordpress.com/2009/07/16/the-sanskrit-verse-for-the-value-of-pi/
http://www.sanskritimagazine.com/vedic_science/value-pi-upto-32-decimals-rig-veda/
पाय चे मूल्य ३२ अंशापर्यंत या श्लोकातून समजते. पाय चे मूल्य शुल्बसूत्रातून काढले गेले आहे. आधुनिक विज्ञानाने पाय चे मूल्य २२ अंशापर्यंत काढले आहे.

१२)  आपण गणन करण्यासाठी जी पद्धत वापरतो त्यात इंग्रजी अक्षरात
trillion च्या पुढे गणना नाही. आपल्या पद्धतीत. पद्म, महापद्म, अर्व, खर्व पर्यंत गणन करण्यासाठी शब्द आहेत.
१३) https://www.speakingtree.in/blog/from-kedarnath-to-rameswaram-7-ancient-shiva-temples-fall-in-straight-line-638811
प्राचीन भारतातील हि सात शिव मंदिरे एकाच अक्षांशाला संदर्भ घेऊन बांधली आहेत. सर्व मंदिरे एकमेकांच्या पासून कमीत कमी काही हजार किलोमीटर दूर आहेत. असे असताना त्यांना ती एका रांगेत बांधता आली याचा अर्थ त्यांचे भूगोलाचे आणि अक्षांश आणि रेखांशाचे ज्ञान किती परिपूर्ण होते याचे द्योतक आहे.
मी इथे दिलेली माहिती म्हणजे सागरातील काही थेंब आहेत. शक्यतो प्रत्येक मुद्याचे स्पष्टीकरण सुद्धा देण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक विज्ञान म्हणजे कचरा आहे असे माझे बिलकुल मत नाही. आधुनिक विज्ञानाची दृष्टी वेगळी आहे. प्राचीन ऋषींची दृष्टी वेगळी होती. त्यांच्या दृष्टीत लोककल्याणाची तळमळ अधिक होती. त्यांची दृष्टी अधिक निसर्गपूरक होती. दुर्दैवाने सध्याचे विज्ञान हे निसर्गाला आव्हान देण्यासाठी विकसित होते आहे. भारतीय ऋषींनी विकसित केलेले विज्ञान हे निसर्ग आणि मानव यांनी शांततापूर्वक सहजीवन व्यतीत करावे असे होते.
याठिकाणी मला चीनमधील एक महान विचारवंत कान्फूशियस याचे एक वाक्य उधृत करायचे आहे. तुम्ही निसर्गाच्या नियमांना बांधील राहून काही निर्माण केले तर निसर्ग ते टिकण्यास मदत करतो. तुम्ही निसर्गाला आव्हान देऊन काही निर्माण केले तर निसर्ग ते उध्वस्त करण्याच्या उद्योगाला लागतो.
आपले आजचे विज्ञान असे संहारक होऊ लागले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पर्यावरणाच्या बदलांशी झुंजतो आहोत. 
मी अध्यात्माच्या मार्गावर चालणारा एक छोटा पांथस्थ आहे. मला स्वतःला प्राचीन विज्ञान आणि अर्वाचीन विज्ञान असा लढा उभा करण्यात काहीही रस नाही.
 पण इथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते आपल्या देशात चार प्रकारचे लोक आहेत. पहिल्या प्रकारात त्यांना भारतीय आणि त्यातल्यात्यात हिंदू म्हणून जन्माला आलो याची लाज वाटते. त्यांना आपले सगळे जुने ज्ञान म्हणजे कचरा वाटतो आणि ते पाश्चिमात्य ज्ञानाच्या प्रेमात पडलेले असतात. दुसऱ्या प्रकारातील लोक स्वार्थी असतात. त्यांना वेद आणि प्राचीन ज्ञान यातील शून्य माहिती असते परंतु काहीही असले तर ते वेदात आहे म्हणून हि मंडळी ठोकून मोकळी होतात. त्यांचे वेद आणि प्राचीन ज्ञानाच्या बद्दलचे प्रेम बेगडी आणि स्वतःची तुंबडी भरणारे आहे. तिसऱ्या प्रकारातील लोक श्रद्धाळू असतात. लोक म्हणतात म्हणजे वेदात काही तरी भारी असेल असा विचार करून ते गप्प बसतात हि पाप भीरु मंडळी असतात. आणि स्वार्थी लोक यांनाच फसवतात. चौथ्या प्रकारात माझ्या सारखे लोक असतात. जे आपली मती वापरून या प्राचीन ज्ञान सागरातील एक दोन थेंब जरी मिळवता आले तरी त्याची चव कृतज्ञपणे चाखतात...
माझा लेख सर्वत्र प्रसारित करण्यास काहीही हरकत नाही..








sujeet Bhogle.. facebook

Friday, 30 March 2018

History n Maharashtrians.....


History n Maharashtrians.....

Good evening friends......

Recently I was reading a what's app post on different specialities of every Indian State where Bengal was admired for Its literature and Music 🎶 whereas Maharashtra adored by saying history and Victory.....








It pleased my my heart ♥ because we Marathi People are very much connected to our History.... And The complete India Knows it very well... Our first chief minister Yashwantrao Chavhan used to say that All states have geography but Maharashtra has history as well....





For us History means King  Shivaji Saint Dnyaneshwar Ahilyadevi Rani Zansi Peshwa Bajirao ... Panipat N sooo much we have In our mind....


 But History  of Great Hindu King 👑 Chhatrpati Shivaji is very much closer to everyone's heart as compared to the other parts of Maratha History.... Shivaji is Having a special corner inside every Marathi's Heart... Even if he's Brahmin or Dalit Or let it be from any caste.....


King 👑 Shivaji Has incontestable acceptance or rule on every Maharashtrian's Heart..... Dalit's were harassed for many years in Maharashtra but Dr. Ambedkar Dalit Emancipator... Has also never criticized King Shivaji and His Hindu Dharma.. As he is called as HINDAVI SWARAJYA SANSTHAPAK..... And his regime and the Kshtriya Dharma is never criticized by even dalits......



We Marathi people never bothered about history exam.. Especially for learning years of different events in history...... Now after 8 years of my matriculation I Remember 10 plus years of main historic events.. Viz....
1275/45 1630 1674 1680 1689 1700 1707 1717 1719 1739 1761 1762 1803 1818 1797 1857 1848 1891 1920 1956 1966




These are the most important years of Maratha History and many battles births and deaths of warrior occurred between these years...




Haaaash....   happy to be a part of such victorious community...

Jai Bhavani Jai Maharashtra

Monday, 12 February 2018

शोध सुश्रुताचा

शोध सुश्रुताचा - भाग १
देश इंग्लंड. जानेवारी १७३१ चा हाडे गोठवून टाकणारा थंड गारठा. इंग्रजी भाषेला इंग्लंडच्या राष्ट्रभाषेचा दर्जा मिळून फक्त ८० वर्षे झालेली. सन १०६६ नंतर इंग्लंडमध्ये इंग्रजी बोलणे कमीपणाचे मानले जात असे. सध्या मराठीचे जे मुंबईत हाल आहेत तेच इंग्रजीचे इंग्लंडमध्ये हाल होते. तिला अशिक्षित खेडवळांची भाषा मानली जात असे. इंग्रजीत कोणतीही साहित्यनिर्मिती होत नसे. जवळपास ५५० हून अधिक वर्षे खुद्द इंग्लंडमध्ये इंग्रजी भाषा फ्रेंच आणि लॅटिन भाषेच्या वर्चस्वाखाली होती. लोकांच्या दबावामुळे शेवटी १६५० मध्ये कोर्टाच्या निकालाने जानेवारी १६५१ पासून इंग्रजीचा सार्वत्रिक वापर (राज्यकारभारात / न्यायदानात / सार्वजनिक शिक्षणात इत्यादी.) इंग्लंडमध्ये पुन्हा सुरु झाला आणि इंग्रजीला पुन्हा वैभवाचे दिवस आले. त्या तपशीलवार इतिहासाबद्दल पुन्हा कधीतरी.
तर पुन्हा वळूया जानेवारी १७३१. पुण्यात शनिवारवाड्याचे बांधकाम संपले नव्हते. अमेरिकेला स्वातंत्र्य मिळायला ४५ वर्षे शिल्लक होती. त्यावेळेला इंग्लंडमध्ये एडवर्ड केव्ह नावाच्या माणसाने जगातले पहिलेवहिले मासिक छापले. 'द जन्टलमन्स मॅग्झिन' हे त्याचे नाव. एडवर्ड हा एका चांभाराचा मुलगा. अत्यंत धडपड्या. त्याने ही मासिकाची कल्पना लंडनमध्ये बऱ्याच लोकांकडे मांडली पण कुणाला पसंत पडली नाही. शेवटी त्याने स्वतःच कागद आणि मशीन विकत घेऊन अंक छापले. हे ते आद्य मासिक आणि त्यानंतर आलेली जगातली सर्व मासिके ह्याच 'द जन्टलमन्स मॅग्झिन' वर बेतलेली आहेत. त्या काळचे अनेक लोकप्रिय लेखक ह्या मासिकासाठी लिहीत असत. युरोपात ह्या मासिकाला प्रचंड मागणी होती. ईस्ट इंडिया कंपनी त्या वेळी भारतात आपले हातपाय पसरत होती. त्यामुळे पूर्वेकडील देशांमधील विविध गोष्टी - चालीरीती ह्या मासिकामूळेच युरोपात कळाल्या. तब्बल २०० वर्षे हे मासिक चालले आणि १९२२ मध्ये बंद झाले. ह्या लेखाचा विषय हे मासिक नाहीये. मी ह्या मासिकाचे जुने अंक चाळत असताना ऑक्टोबर १७९४ मध्ये ह्या मासिकात आलेला एक लेख माझ्या पहाण्यात आला. तो लेख हा कुतूहलाचा मुद्दा आहे. तो काय ते आपण पाहूया.
ह्या लेखाचे नाव होते "A portrait illustrative of a remarkable chirurgical operation" (म्हणजे मराठीत: "एका शल्यक्रियेचे चित्र आणि लेख"). ह्या चित्रात एक कावसजी नावाचा मराठी (होय!) माणूस दाखवला आहे. काळासावळा. डोक्यावर पागोटे असलेला. खांद्यावर फडके घेतलेला. एकदम दमदार गडी. कावसजीचे चित्र 'द जन्टलमन्स मॅग्झिन' मध्ये यायचे कारण म्हणजे पुण्यात (होय पुण्यात!) त्याच्यावर झालेली Rhinoplasty (ऱ्हीनोप्लास्टी: म्हणजे कृत्रिम नाक बसवण्याची शस्त्रक्रिया!). १७९४ मध्ये जेव्हा युरोपातील डॉक्टर शरीरातील एकीकडील त्वचा दुसरीकडे लावू शकत नव्हते तेव्हा कावसजीचे संपूर्ण नाक कृत्रिमरित्या बसवले होते. आणि ते कोणत्या राजवाड्यात नाही तर पुण्यातील रस्त्यावर - आणि तेपण एका पार्ट टाईम शल्यविशारदाने!
ह्या चित्रानंतर एक लेख होता. त्याचा सारांश असा - दोन ब्रिटीश डॉक्टर्स थॉमस क्रुसो आणि जेम्स त्रीन्डले ह्यांनी कावसजीचे संपूर्ण नाक बसवायची शस्त्रक्रिया पुण्यातल्या रस्त्यावर प्रत्यक्ष पाहिली. तिसऱ्या इंग्रज टिपू युद्धात कावसजी इंग्रजांच्या बाजूने लढत होता आणि टिपूच्या सैन्याद्वारे पकडला गेला. कावसजी हा काही शिपाई नव्हता आणि सैन्यात बैलगाडी चालवत होता. त्यावेळच्या प्रचलित शिक्षेनुसार कावसजीचे नाक कापून टाकले गेले. कावसजी तिथून पुण्याला गेला आणि एका कुंभाराकडून - होय कुंभाराकडून - हे नवीन नाक बसवून घेतले.
त्या कुंभाराने सर्वप्रथम मेणाने कावसजीच्या नाकाच्या मापाचा आकार बनवून घेतला. तो कावसजीच्या कपाळावर (चेहेऱ्यावर नाकाच्या ठिकाणी नव्हे!) बसवला. कपाळावर त्या मेणाभोवती त्याचा आकार (outline) काढून घेतला. नंतर एका चाकूने त्या आकाराची त्वचा कापली पण ती संपूर्ण कापून टाकली नाही. दोन डोळ्यांच्या मध्ये थोडीशी जागा शिल्लक ठेवली. त्यानंतर मेणाला नाकाचा आकार देऊन ते नाकाच्या जागी बसवले. कपाळावरून आणलेली त्वचा त्याच्यावर पांघरली. थोड्या जडीबुटी लावल्या. काही आठवड्यात ती त्वचा नवीन ठिकाणी (मेणाच्या नाकावर) रुजली. कपाळाचा व्रण तीन महिन्यांनी भरला. ह्या लेखाचा समारोप "This operation is very generally successful." ह्या वाक्याने केलेला आहे. अधिक माहितीसाठी सोबतचे कावसजीचे मूळ चित्र पहा.
ह्या लेखाने युरोपात खळबळ माजवली. युरोपिअन डॉक्टर्स ह्या गोष्टीवर अनेक वर्षे रिसर्च करत होते. पण शरीराचा कोणताही भाग कापला आणि दुसऱ्या ठिकाणी लावला की तो वाळून जात असे. त्याला योग्य रक्तपुरवठा अथवा प्राणवायू न मिळाल्याने तो कोमेजून जात असे. युरोपिअन डॉक्टर्स गालांवरून अथवा मांड्यांवरुन नीट त्वचा कापू शकत असत पण ती खोट्या नाकावर बसवली की ती कडक होऊन जात असे - आणि ह्यासाठी त्यांच्याकडे कोणताही उपाय नव्हता. पण ह्या पुणेरी कुंभाराने हा प्रश्न सोडवला होता. डोळ्यांच्या मध्ये ती त्वचा मूळ शरीराशी संलग्न असल्याने ती वाळून जायचा अथवा कडक व्ह्यायचा प्रश्न उरला नाही. त्या त्वचेला रक्त आणि प्राणवायू नियमित मिळाल्याने नवीन ठिकाणी (मेणाच्या नाकावर) ती व्यवस्थित रुजत होती. आणि एकदा का ती रुजली की मग डोळ्यांच्या मधील तो ब्रीज कापून टाकत असत. कपाळावर व्रण रहात असे पण संपूर्ण नाक नसण्यापेक्षा हे केव्हाही बरे होते!
कावसजीबद्दलच्या या लेखाबद्दल गेली अनेक शतके वाद सुरु आहेत. अगदी २००९ मध्येपण ब्रिटीश मेडिकल जर्नल्स हा विषय चघळत होती. हा कावसजीबद्दलचा लेख खरा असो वा नसो पण ह्या एका लेखाने संपूर्ण युरोपातील डॉक्टर्स आणि सर्जन्सना हलवून टाकले. त्यांची विचारसरणी बदलून टाकली. सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी ह्या शाखांमधील मूलभूत बदलांसाठी हा लेख कारणीभूत ठरला. सर्जरीसाठी लागणाऱ्या विविध शस्त्रांमध्ये बदल करण्यासाठी ते प्रवृत्त झाले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्राचीन भारताबद्दल आणि भारतीय चिकित्सापद्धतीबद्दल त्यांच्या मनात आदर आणि उत्सुकता निर्माण झाली. आयुर्वेदाचे नाव युरोपात ह्याआधी गेले होते. कोणी एक 'सुश्रुत' हा "Father of Plastic Surgery" म्हणून त्यांना माहीत होता. त्याची 'सुश्रुत संहिता' ऐकून माहीत होती. पण त्याची पद्धत वापरून त्या कुंभाराने केलेले ऑपरेशन मात्र सर्वांची वाहवा मिळवून गेले.
कोण होता हा सुश्रुत? खरंच होता का तो "Father of Plastic Surgery"? पाहूया आपण पुढच्या भागात!
क्रमश:
- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut
फोटो: 'द जन्टलमन्स मॅग्झिन'चा संस्थापक एडवर्ड केव्ह, कावसजीचे ऑक्टोबर १७९४ मधले चित्र
ता. क. १: ज्यांना हा मूळचा १७९४ चा लेख पहायचा असेल त्यांनी खालील लिंकवर पान ८९१ पहावे.
ता. क. २: जिज्ञासूंना 'द जन्टलमन्स मॅग्झिन' चे काही लेख खालील लिंकवर वाचायला मिळतील:

LikeShow more reactions
Comment
शोध सुश्रुताचा - भाग २
मागील भागात आपण पाहिलं की ऑक्टोबर १७९४ मध्ये पुण्यातल्या एका कुंभाराने कावसजीवर केलेल्या सर्जरीमुळे युरोपातील - विशेषतः इंग्लंडमधील डॉक्टरांची आणि सर्जन्सची झोप उडाली. येथे एक गोष्ट सांगणे महत्त्वाचे आहे की ती वाहवा त्या सर्जरीला मिळाली होती - ती एका 'कुंभाराने' केली होती म्हणून नव्हे. इंग्लंडमधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स - जिची फेलोशिप जगातले डॉक्टर्स मिळवतात आणि मानाने Fellow of Royal College of Surgeons (F.R.C.S.) असे स्वतःच्या नावामागे लावतात - ह्या संस्थेचे संस्थापक मूळचे न्हावी होते. इंग्लंडमध्ये पंधराव्या - सोळाव्या शतकांमध्ये जखमी सैनिकांवर सर्जरी मुख्यतः हे न्हावी (ज्यांना 'बार्बर सर्जन्स' म्हणत) करत असत. आजही इंग्लंडमध्ये पारंपारिक सर्जन्सना स्वतःला 'डॉक्टर' म्हणून घ्यायला आवडत नाही. त्यांच्यामते औषधे देणारा साधा 'मेडिसिन मॅन' म्हणजे 'डॉक्टर' - 'सर्जन' म्हणजे त्यांच्यापेक्षा वरच्या दर्जाचा (शैक्षणिकदृष्ट्या) जो प्रत्यक्ष ऑपरेशन करतो आणि म्हणून त्यांच्या स्वतः च्या नावामागे ते 'मिस्टर' लावतात आणि नावापुढे FRCS. रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सची स्थापना १८०० ची म्हणजे कावसजीवर केलेल्या ऑपरेशननंतर फक्त ६ वर्षांनंतर झाली - हा नक्कीच योगायोग नव्हता!
आता पुन्हा सुश्रुताकडे वळूया. त्याआधी एक गोष्ट करून पहा. गुगल ईमेज सर्च मध्ये 'Sushrut Surgeon India' हे सर्च करून पहा. पहिला जो फोटो येतो तो आपण सगळीकडे पाहिलेला असतो. एक दाढीवाला तेजस्वी माणूस एका रुग्णाच्या चेहेऱ्यावर काहीतरी शस्त्रक्रिया करत आहे. साधी पांढरी धोतरे घातलेले त्यांचे दोन सहाय्यक आहेत ज्यांनी रुग्णाला धरून ठेवले आहे - एक साडी नेसलेल्या बाई हातात काहीतरी घेऊन त्यांना मदत करत आहेत. एक सहाय्यक फक्त मागे उभा राहून हे सर्व पहात आहे. राजा रवि वर्म्याने काढल्यासारखे वाटते हे चित्र. बरेचदा त्याखाली लिहिलेले असते "सुश्रुत - ईसवी सन ६०० मध्ये प्लास्टिक सर्जरी करताना" किंवा "सुश्रुत - ईसवी सन ६०० मध्ये डोळ्याचे ऑपरेशन करताना". चित्र तेच असते फक्त कॅप्शन्स वेगवेगळ्या असतात. ह्या असल्या चित्रांखाली मी 'सुश्रुत' हे नाव पहिल्यांदा वाचले.
मग मी शोधायचा प्रयत्न केला कोणी बरं काढलं आहे हे चित्र? चित्रातला माणूस खरंच 'सुश्रुत' आहे का? काही तथ्य आहे का ह्या कॅप्शन्समध्ये? बऱ्याच शोधाअंती समजलं की हे चित्र कुणा भारतीयाने काढलेले नाहीयेच! १९४८ मध्ये पार्क - डेव्हीस नावाच्या औषधे बनवणाऱ्या अमेरिकन कंपनीने रॉबर्ट थोम नावाच्या चित्रकाराला ८५ चित्रे काढायचे काम दिलेले होते - त्याने ८ वर्षे रिसर्च करून ही सगळी चित्रे काढली - त्यातलेच हे एक चित्र! पार्क - डेव्हीस कंपनीने ही सगळी चित्रे एकत्र करून त्याचे विविध संच बनवले आणि अमेरिकेतल्या सगळ्या डॉक्टरांकडे पाठवून दिले. अनेक डॉक्टरांनी ही चित्रे आपापल्या वेटिंग रूम मध्ये लावून टाकली. मग पार्क - डेव्हीस कंपनीने हळूच कंपनी ब्रांडीगसाठी ही चित्रे वापरून टाकली. आपण जे हे 'सुश्रुता'चे चित्र पहातोय त्याची फुल पेज जाहिरात १० ऑगस्ट १९५९ च्या 'टाईम' मासिकात आलेली होती. खाली लिहिले होते "Plastic Surgery, usually regarded as a recent medical advance, was practised thousands of years ago by a Hindu surgeon, Susruta. Living in a society that punished wrongdoers with physical disfigurement, his restorative skills were greatly in demand. His writings contributed to the spread of Hindu medicine throughout the ancient world.". पुढच्या काही दशकांमध्ये हे चित्र भारतात आले. आपल्याकडे त्याच्या लाखो-करोडो कॉप्या बनल्या आणि एका औषधे बनवणाऱ्या अमेरिकन कंपनीच्या ऐवजी हे चित्र आयुर्वेद आणि सुश्रुताचे 'ब्रांडीग' करू लागले!
जर पार्क - डेव्हीस कंपनीला खात्री होती की सुश्रुत होता आणि तो ही ऑपरेशन्स करायचा मग आपण कशाला आपलं डोकं खपवतोय? रॉबर्ट थोमने सुद्धा जवळपास ८ वर्षे अभ्यास करून मगच ही चित्रे काढली होती - मिळाले असेल त्याला एखादे सुश्रुताचे चित्र - आपल्याला काय करायचेय? पण आपण जर इथेच थांबलो तर आपल्याला सुश्रुताचा 'शोध' कधीच लागणार नाही. भारतात जवळपास १००० वर्षांपूर्वी ही ऑपरेशन्स होत असत ह्याची खात्री देता येणार नाही. खरंच सुश्रुत नावाचा कोणी माणूस होऊन गेला का? खरंच तो प्लास्टिक सर्जरी करायचा का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत रहातात!
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायच्या आधी आपण छोट्या प्रश्नांपासून सुरुवात करूया. सुश्रुत कोण होता? याचा कार्यकाल काय होता? अनेक संदर्भ - अगदी पार्क - डेव्हीसच्या जाहिरातीपण - सांगतात की सुश्रुत ह्या शास्त्राचा जनक होता. ह्या शास्त्राची सर्व सूत्रे सुश्रुतच्या पुस्तकात - 'सुश्रुत संहिते'त मिळतात. सुश्रुताबद्दल आपल्याकडे काहीच माहिती नाही पण नशिबाने 'सुश्रुत संहिता' मात्र उपलब्ध आहे.
मग कोणी लिहिली 'सुश्रुत संहिता' आणि कधी? शोधू शकतो का आपण? हे आपण पुढच्या भागात पाहूया!
क्रमश:
- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut
शोध सुश्रुताचा - भाग ३
एक मात्र नक्की की सुश्रुत नावाचा कोणी एक माणूस होऊन गेला ह्याची आपल्याकडे काहीही ऐतिहासिक नोंद नाही. इतिहास लिखाणाच्या बाबतीत एकूणच उदासीनता. मग कसं शोधायचं ह्या सुश्रुताला? पहिले सोप्पे उत्तर - अर्थातच सुश्रुत संहितेतून. इंटरनेटवर शोधले तर सुश्रुत संहितेबद्दल भरपूर म्हणजे अगदी भरपूर लेख, पुस्तके, आणि वर्तमानपत्रातले लेख मिळतात. पण सर्वात व्यापक आणि विश्वसनीय असे सुश्रुत संहितेचे इंग्रजीतले भाषांतर १९०७ साली केलेले कविराज कुंजलाल भिशग्रत्न ह्यांचे आहे. सूत्रस्थान / निदानस्थान - कल्पस्थान / उत्तर तंत्र असे हे तीन खंड आहेत. ह्या खंडांमध्ये कविराजांनी त्यांना उपलब्ध असणाऱ्या सर्व पुरातन हस्तलिखितांमधल्या सर्व 'सुश्रुत' ह्या नावाने येणाऱ्या व्यक्तींच्या वैद्यकीय कामाचा समावेश केला आहे. हे तीनही खंड बघण्यासारखे आहेत. लेखाच्या शेवटी मी ह्या तीनही खंडांच्या लिंक्स दिलेल्या आहेत त्या जिज्ञासूंनी पहाव्यात.
आता आपण सुश्रुत संहितेबद्दलच्या समस्या पाहूया. आज आपल्याला उपलब्ध असणारी सुश्रुत संहिता ही कमीत कमी एक वेळा आधीच्या एका सुश्रुत संहितेवर बेतलेली आहे. बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुन ह्याने ही आज आपल्याला माहित असलेली संहिता बनवलेली आहे. त्यामुळे हे सांगणे अशक्य आहे की त्यातले किती मूळचे आणि किती नागार्जुनाने वाढवलेले अथवा वगळलेले आहे. दुसरी समस्या म्हणजे कविराजांनी बघितलेल्या हस्तलिखितांमध्ये एकापेक्षा जास्त सुश्रुतांचा उल्लेख येतो. (सुश्रुताचा उल्लेख महाभारतातपण आहे!) त्यामुळे हे ठरवणे कठीण आहे की नेमका 'आपला' सुश्रुत कोणता! कविराजांच्या मते हा सुश्रुत गौतम बुद्धाच्या आधी २०० वर्षे होऊन गेला असावा - म्हणजे त्याचा काल ईसवी सन पूर्व ८०० येतो - पण ह्याबद्दल कोणतेच पुरावे नाहीत. काही इतिहास संशोधकांचे मत आहे की सुश्रुत बुद्धानंतर झाला. नक्की काहीच माहित नाही.
अजून पुढे काही प्रश्न उभे रहातात. सुश्रुत संहिता ही स्वतः सुश्रुताने लिहिली का त्याच्यानंतर काही शतकांनी त्याच्या एखाद्या शिष्याने? सुश्रुत मर्त्य मानव होता की पुराणांमधल्या अश्विनीकुमारांसारखा एखादा 'देव'? मी त्याला 'देव' म्हणण्याचे कारण सांगतो. हे उदाहरण पहा. समजा (असे न होवो पण) लंडन एखाद्या नैसर्गिक प्रलयामुळे गाडले गेले आणि आजपासून २००० वर्षानंतर उत्खनन सुरु असताना 'Leadership lessons from life of James Bond' ह्या नावाचे एक पुस्तक सापडले ज्याची काहीच मधली पाने शिल्लक आहेत. त्या वेळचे संशोधक काय अंदाज बांधतील? ते म्हणतील २००० वर्षांपूर्वी जेम्स बॉन्ड नावाचा कुणी एक महान नेता लंडनमध्ये होऊन गेला होता. आज आपली तीच परिस्थिती सुश्रुताबद्दल नाहीये का? आपल्याला फक्त लिखाणात 'सुश्रुत' भेटतो आणि बाकी कुठल्याच इतिहासात नाही. माझ्या म्हणण्याचा मुद्दा हा आहे की सुश्रुत संहिता पुस्तकाच्या कालावरून सुश्रुत कधी होऊन गेला (आणि झाला की नाही!) ह्याची काहीच माहिती मिळत नाही. पण आपल्याला समजा एखादे असे पुस्तक अथवा हस्तलिखित मिळाले ज्यामध्ये सुश्रुताच्या आयुष्याचा 'उल्लेख' येतो तर मग आपण मान्य करू की सुश्रुत नावाचा माणूस खरंच होऊन गेला. आणि हा उल्लेख जर एखाद्या शल्यक्रियेविषयीच्या हस्तलिखीतामध्ये मिळाला तर आपण नक्की म्हणू शकू की सुश्रुत नावाचा वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत माणूस होऊन गेला असावा. आपल्या लंडनच्या उदाहरणाकडे पुन्हा जाऊया. जर २००० वर्षांनंतर संशोधकांना २०१८ सालच्या वर्तमानपत्रात (ज्याची तारीख शाबूत आहे) जेम्स बॉन्ड चित्रपट परीक्षणाचा काही भाग वाचायला मिळाला तर? तर त्यांना असे म्हणता येईल की आधी मिळालेल्या पुस्तकातली व्यक्ती आणि परीक्षणातली व्यक्ती एकच आहे. ते असा निष्कर्ष काढू शकतील की जेम्स बॉन्ड हा २०१८ च्या आसपास होऊन गेला. पण हा माणूस खरा होता की नाही हे ते सांगू शकतील का? अजिबात नाही!
पुढची पायरी म्हणजे एखादे जुने हस्तलिखित (ज्यात सुश्रुताचा उल्लेख आहे) मिळवून त्याचा काल निश्चित करणे आणि त्यावरून सुश्रुताच्या कालखंडाचा अंदाज करणे. पण हेही खूप कठीण आहे कारण आपल्याकडच्या हस्तलिखित ग्रंथांचे कालखंड फारसे जुने नाहीयेत. आपल्याकडच्या सर्वात जुन्या ऋग्वेदाची प्रत सन १४६४ मधली आहे (पुण्याच्या भांडारकर ईन्स्टीटयुटमध्ये ठेवलेली आहे) - ह्यावरून असं म्हणायचं का की ऋग्वेद फक्त ५५० वर्षे जुना आहे? किंवा ह्याआधी भारतात ग्रंथच लिहीले गेले नाहीत? म्हणजे ही पद्धतपण संपूर्ण विश्वसनीय नाहीये. दुर्दैवाने सुश्रुत नावाच्या माणसाचा आपला शोध येथे येऊन थांबल्यासारखा होतो.
आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न - इटलीमध्ये कागदोपत्री पुरावे आहेत की त्यांच्याकडे सोळाव्या शतकात त्वचारोपणाचे प्रयोग सुरु झाले होते आणि काही यशस्वीसुद्धा होत होते. मग मागील लेखात पाहिल्याप्रमाणे सुश्रुतालाच जग ह्या शास्त्राचे जनक का म्हणते? कशावरून हे जगमान्य आहे की भारतात त्यांच्या आधी हे शास्त्र विकसित झालेले होते? असे एखादे हस्तलिखित अथवा ग्रंथ आहे की ज्यात सुश्रुताचा उल्लेख आढळतो आणि जो १९०७ सालच्या आधी कविराजांनी अभ्यासला नाही? ह्याचे उत्तर आहे - होय! कविराजांनी त्यांचे ग्रंथ प्रकाशित करायच्या आधी ही हस्तलिखिते लेह भागात घडलेल्या एका संशयित रशियन गुप्तहेराच्या खूनामुळे आणि त्यातून उद्भवलेल्या अपघातात्मक परिस्थितीमुळे सापडली होती. एखाद्या हॉलीवूडपटात शोभावी अशी ती घटना होती. काय झाले होते नक्की? कशी शोधली गेली ही हस्तलिखिते? पुढच्या लेखात पाहूया!
क्रमश:
- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut
फोटो: कविराज कुंजलाल भिशग्रत्न
सुश्रुत संहिता - खंड १: https://archive.org/stream/englishtranslati01susruoft…
सुश्रुत संहिता - खंड २: https://archive.org/…/Sushrut…/SushrutSamhitaDvitiyaKhanda1…
सुश्रुत संहिता - खंड ३: https://archive.org/…/Sushrut…/SushrutSamhitaTritiyaKhanda1…

LikeShow more reactions
Comment
शोध सुश्रुताचा - भाग ४
सोबतचे पहिले चित्र पहा. दिसतात की नाही दोघे दाढीवाले सख्खे भाऊ? अगदी सख्खे नसले तरी सख्खे मावसभाऊ होते हे दोघे. पण त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे एकोणीसाव्या शतकातल्या जगातल्या दोन सर्वशक्तिमान साम्राज्यांचे सम्राट होते. डावीकडचा आहे रशियाचा झार दुसरा निकोलस आणि उजवीकडचा आहे इंग्लंडचा पाचवा जॉर्ज (आपल्यासाठी त्या काळचा 'भो पंचम भूप जॉर्ज' वगैरे वगैरे). ह्या दोन भावांमध्ये एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी एक भयानक चढाओढ सुरु झाली - मध्य आशियात साम्राज्य विस्ताराची. रशियाला मध्य आशियात वर्चस्व हवे होते आणि ब्रिटीशांची भारतीय उपखंडातली सत्ता त्यांना सलत होती. आणि ब्रिटीशांना मध्य आशियामधले रशियाचे अस्तित्व नकोच होते. त्यादृष्टीने ते प्रयत्नशील होते. ह्या चढाओढीचे नावपण इतिहासात समर्पकपणे ठेवलेले आहे - 'द ग्रेट गेम'. ह्या काळात झालेल्या राजकीय चाली आणि हालचालींवर अनेक वाचनीय पुस्तके उपलब्ध आहेत. ह्याच चढाओढीत काही वर्षांनी ह्या दोघांचा तिसरा मावस भाऊ उतरला - तो म्हणजे जर्मनीचा सम्राट दुसरा कैझर विल्हेम आणि ह्या ग्रेट गेमचे रुपांतर पहिल्या जागतिक महायुद्धात झाले. तीन मावस भावांनी आपापसात खेळलेले हे युद्ध - पण संपूर्ण जगाला त्याची झळ बसली!
आपल्याला पहिल्या महायुद्धाइतके दूर जायचे नाहीये. आपण एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी थांबूया. सन १८८८. इराण नावाचा देश तेव्हा अस्तित्वात नव्हता. त्या ठिकाणी भरपूर टोळ्या आणि अनेक छोटी मोठी संस्थाने होती. 'खानत' म्हणत असत त्यांना. अमिरांच्या अमिराती आणि खानांच्या खानत. अफगाणिस्थानची परिस्थिती अगदी आजच्यासारखी होती. कोणतीही मध्यवर्ती राजवट नसलेली. (आणि असली तरी तिला न जुमानणाऱ्या 'सार्वभौम' टोळ्या!). मध्य आशियातल्या देशांमधले बरेचसे ब्रिटीश, रशियन, तुर्की, आणि अफगाणी व्यापारी पार्ट टाईम व्यापार करायचे आणि पार्ट टाईम इंग्लंडसाठी किंवा रशियासाठी हेरगिरी करायचे. त्यांचे मोठे मोठे व्यापारी काफिले असायचे त्यामुळे हेरगिरी वगैरे उद्योग सोपे पडायचे आणि वरून भरपूर पैसे. हेरगिरी म्हणजे त्या त्या भागातली माहिती (विशेषकरून सैनिकी) आणायची आणि आपापल्या ब्रिटीश किंवा रशियन मालकांना पुरवायची. असाच एक स्कॉटीश व्यापारी होता. ॲंड्रू दाल्ग्लेइश (Andrew Dalgleish) हे त्याचे नाव. हा ब्रिटीश हेर होता. ह्याची बायको मध्य आशियातल्या यार्कंद भागातली होती. स्वतः ॲंड्रूला तिकडची स्थानिक उघ्यूर भाषा नीट अवगत होती. त्यामुळे व्यापार आणि हेरगिरी दोन्ही सुरळीत चालले होते. लेह-लडाख मधून मध्य आशियात हा व्यापारासाठी बरीच ये-जा करायचा.
मार्च १८८८ मध्ये व्यापारासाठी ॲंड्रू लेहवरून यार्कंदला जायला निघाला होता. त्याच्याबरोबर बरेचसे नोकर आणि अनेक स्थानिक यात्रेकरू होते. काही अंतर गेल्यावर दाउद मोहोम्मद नावाचा एक क्वेट्टा भागातला पठाण त्याच्या काफिल्यात सामील झाला. दाउद मोहोम्मद पूर्वीचा व्यापारी होता पण व्यापारात दिवाळे निघाल्याने सध्या रशियासाठी लपून-छपून हेरगिरी करत होता. ८ एप्रिल १८८८ रोजी हा काफिला काराकोरम खिंडीत पोहोचला. ॲंड्रू सगळ्यांच्या पुढे होता. काराकोरम खिंड पार करून त्याने आपला तंबू बर्फात टाकला होता. संध्याकाळ झाली होती. थोडे चहापाणी करून आवरेपर्यंत बाकीच्या सगळ्यांची खिंड पार करून झाली. बाकी काफिल्याचे तंबू ठोकून झाले. ॲंड्रू सगळ्या तंबूंची पहाणी करायला निघाला. अनेक लोकांनी त्याला चहा विचारला पण सस्मित नाही म्हणून तो पुढे निघाला. जाताजाता प्रत्येक तंबूमधून रोटीचा छोटा तुकडा घ्यायला तो विसरला नाही. (मुस्लिम जगतात बंधुभाव दाखवण्यासाठी ह्या प्रथेला फार मोठे महीत्त्व होते - आणि ॲंड्रूला हे नीट माहित होते!) चालत चालत तो काफिल्याच्या शेवटी पोहोचला. दाउद मोहोम्मदचा तंबू नुकताच लावून झाला होता. त्याच्या तंबूत बसून ॲंड्रूने त्याचा हालहवाल विचारला. व्यापार नीट कसा करावा ह्याचा ॲंड्रू त्याला सल्ला देत होता. अचानक मोहोम्मद उठला. ॲंड्रूने विचारले, "कुठे चाललास?" मोहोम्मद म्हणाला, "काही नाही. जरा बाहेर जाऊन येतो." मोहोम्मद ताडकन तंबूबाहेर गेला. ॲंड्रूला कसलाच संशय आला नाही. मोहोम्मद बाहेर जाउन त्याची बंदूक घेऊन आला आणि तंबूच्या भिंतीमधून त्याने ॲंड्रूवर पाठीमागून गोळी चालवली. गोळी ॲंड्रूया खांद्याला लागली. तो कळवळला पण लगेच उठायचा प्रयत्न त्याने केला. त्याचा तंबू होता सर्वात पुढे म्हणजे अगदी लांब. त्यामुळे कोणतेही हत्यार आणणे अशक्य होते आणि आता दाउद मोहोम्मद नंगी तलवार घेऊन त्या तंबूत घुसला होता. दाउदने केलेले तलवारीचे वार ॲंड्रूने दोन हातांनी झेलायचा प्रयत्न केला पण व्यर्थ. शेवटी तो जखमी अवस्थेत बाहेर पळाला आणि बर्फात उताणा पडला. दाउद मोहोम्मदाने त्याचावर सपासप वार करून त्याला यमसदनास धाडले. ॲंड्रूचे नोकर आणि असलेले यात्रेकरू हा सगळा प्रसंग घाबरून बघत होते. दाऊदने त्या सर्वांना धमकावले. रात्रीचे जेवण बनवले गेले. दाउद ॲंड्रूच्या तंबूत परतला आणि ॲंड्रूच्या पलंगावरच त्या रात्री झोपला. सकाळी तो तिथून निघून गेला. अश्या प्रकारे एक ब्रिटीश हेर एका रशियन हेराकडून मारला गेला.
ॲंड्रू ब्रिटीशांचा 'माणूस' असल्याने ब्रिटीश सरकारने ह्या सर्व प्रकारचे साक्षी पुरावे करून लागलीच पुढच्या वर्षी - म्हणजे १८८९ मध्ये - हॅमिल्टन बॉवर नावाच्या एका आर्मी इन्टलीजन्स ऑफिसरला ह्या कामगिरीवर लेहला धाडले. ह्याचे काम एकच होते ते म्हणजे दाउद मोहोम्मदला पकडणे. संपूर्ण मध्य आशियामधून एका माणसाला शोधणे आणि त्याला पकडणे अशक्यप्राय काम होते. पण हॅमिल्टन बॉवरने हे काम स्वीकारले. तो लेहमधून निघाला आणि दाउद मोहोम्मदचा शोध घेत घेत तिआन शान डोंगरांच्या पायथ्याशी कुशर नावाच्या गावात पोहोचला. ह्या गावात दाउद मोहोम्मदची चौकशी करता करता त्याला एक तुर्की माणूस भेटला. त्याने बॉवरला सांगितले की जवळच एक वाळवंट आहे आणि स्थानिक लोक मानतात की त्याच्या खाली एक शहर गाडलेले आहे. तो माणूस आणि त्याचा मित्र तिथे खजिना शोधायला गेले होते. पण त्यांना तेथे काहीच मिळाले नाही. फक्त एक जुनाट पुस्तकासारखे काहीतरी मिळाले. बॉवरला आश्चर्य वाटले आणि त्याने त्याला ते घेऊन यायला सांगितले. तासाभरात तो माणूस ते घेऊन परत आला. ते पुस्तक म्हणजे एक हस्तलिखित पोथी होती. (बॉवरच्या मूळ इंग्लिश ट्रॅव्हल रेकॉर्डस मध्ये 'पोथी' हाच शब्द आहे!) त्यातली अक्षरे संस्कृतसारखी होती. सहज उत्सुकता म्हणून बॉवरने ही पोथी पैसे देऊन विकत घेतली. पुढे आपले 'नेटवर्क' वापरून बॉवरने दाउद मोहोम्मदला समरकंदजवळ पकडले. (कसे पकडले ते सांगायची ही जागा नाही!) पण तुरुंगात दाउद मोहोम्मदने संशयितरीत्या फाशी लावून घेऊन आत्महत्या केली. (त्याच्याशी आपल्याला काही देणेघेणे नाही!) बॉवरने लेहमध्ये ॲंड्रू दाल्ग्लेइशसाठी एक स्मारक बांधले आणि तो कलकत्त्याला परत आला. त्याने ती विकत घेतलेली पोथी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालला सुपूर्द केली. त्याची भाषा अगदी वरवर संस्कृतसारखी वाटली तरी अगम्य भाषेत ती लिहिली होती - त्यांना काही ती वाचता येईना. कोणीतरी तज्ञ माणसाकडून त्यात काय लिहिले आहे हे समजून घेणे गरजेचे होते.
पुढे कोणी केले हे काम? नक्की काय होते त्या पोथीत लिहीलेले?
पुढच्या भागात पाहूया!
क्रमश:
- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut

शोध सुश्रुताचा - भाग ५
ऑगस्टस फ्रेडेरिक रुडॉल्फ हर्न्ले (Hoernle) - आपल्यापैकी किती जणांनी ऐकलय हे नाव? माझी खात्री आहे की बहुतेकांनी नाही.
हर्न्लेचा जन्म सन १८४१ चा. उत्तर भारतातल्या आग्र्यात एका प्रोटेस्टन्ट जर्मन मिशनऱ्याच्या घरात. त्या वेळेच्या प्रथेनुसार वयाच्या ७ व्या वर्षी हर्न्लेला शिक्षणासाठी युरोपमध्ये पाठविण्यात आले. ह्याचे शालेय शिक्षण स्वित्झर्लंडमध्ये झाले. त्याला संस्कृत भाषेत विशेष रस होता म्हणून त्यानंतर पुढे तो लंडनमध्ये त्यावेळेचा संस्कृत भाषेचा पंडित थिओडोर गोल्डस्टूकर (हा पण जर्मन होता!) ह्याच्याकडे संस्कृत शिकायला गेला. संस्कृतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर हर्न्ले १८६५ मध्ये भारतात परत आला. बनारस हिंदू विश्वविद्यालयातील क्वीन्स कॉलेजात संस्कृतचा प्रोफेसर म्हणून ह्याने आपली कारकीर्द सुरु केली. बनारसमध्ये हिंदू धर्मसुधारक आणि धर्मशास्त्रपारंगत दयानंद सरस्वतींचा हर्न्ले चांगला मित्र बनला. दयानंद सरस्वतींवर एक पुस्तकही त्याने लिहिले होते. बनारसला अनेक वर्षे राहून हर्न्ले नंतर १८८५ च्या सुमारास कलकत्ता विश्वविद्यालयात नोकरी करायला गेला.
मागील लेखात आपण पाहिले की हॅमिल्टन बॉवरने ती हस्तलिखित पोथी कलकत्त्यात एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालला सुपूर्द केली. बॉवरने आणलेले म्हणून ह्या हस्तलिखिताचे नामकरण झाले 'बॉवर मॅन्युस्क्रीप्टस'. हर्न्ले त्यावेळी कलकत्त्याला होता. संस्कृतबरोबर मध्य आशियात बोलली जाणारी खोतानी भाषादेखील हर्न्लेला अवगत होती. त्यामुळे ते हस्तलिखित साहजिकपणे त्याच्याकडे भाषांतरासाठी सोपविण्यात आले. हे वर्ष होते सन १८९१.
हर्न्लेने ह्या बॉवर मॅन्युस्क्रीप्टसचा अभ्यास सुरु केला. सर्वात प्रथम अडचण होती भाषेची. त्या हस्तलिखिताची भाषा संस्कृतसम होती पण संस्कृत नव्हती. लिपीपण नेहमीपेक्षा वेगळी होती. भाषा अगम्य आणि लिपी अगम्य! भाषा वेगळी आणि लिपी वेगळी - असे कसे शक्य आहे? उदाहरण देतो: 'एक्झाम्पल' - इंग्रजीत हा शब्द 'Example' असा लिहिता आला असता पण हा इंग्रजी 'भाषे'तला शब्द मी देवनागरी 'लिपी'त लिहिलाय. हर्न्लेची समस्या नक्की समजण्यासाठी हेच उदाहरण आपण पुढे नेऊया. समजा मी देवनागरीत लिहिले 'बाएश्पीएल' आणि सांगितलं की इंग्रजीत भाषांतर करा - तर तुम्हाला काय समजेल? तुम्हाला मराठीत वाचता येतंय पण अर्थ लागत नाही - मग काय करणार तुम्ही ह्याचे भाषांतर? जोपर्यंत तुम्हाला हे माहित नाहीये की मी देवनागरी लिपीतून जर्मन भाषेत हा शब्द लिहिलाय तोपर्यंत तुम्ही त्याचे भाषांतर करूच शकणार नाही. आणि ह्यासाठी मराठी (लिपी), जर्मन (भाषा) आणि इंग्रजी (भाषांतर भाषा) ह्या तिन्ही भाषा जाणणारा माणूस लागेल. (जाता जाता सांगतो 'बाएश्पीएल' म्हणजे जर्मनमध्ये 'उदाहरण' आणि इंग्रजीत 'Example'). नेमका असाच प्रश्न हर्न्लेला पडला होता आणि त्या वेळेला इंटरनेट अथवा गुगल वगैरे काही नसल्याने हाताशी असेल तेवढेच संदर्भ वापरून त्याला त्या हस्तलिखितांचे भाषांतर करायचे होते. त्यात अजून ती हस्तलिखिते लिहिलेली होती बर्च झाडाच्या पानांवर. बरेचसे भाग पुसट झालेले होते - काही भाग वाचण्याच्या परिस्थितीत नव्हते हापण एक त्रास होताच. हर्न्लेला अनेक जुने संदर्भग्रंथ अभ्यासावे लागले. त्याला तेव्हा कळाले की ती लिपी 'गुप्त ब्रह्मी' लिपी होती. भारतात गुप्त साम्राज्याच्या काळात (ई स २४० ते ई स ५५०) ही लिपी संस्कृत आणि तत्सम भाषा लिहिण्यासाठी वापरली जात असे. त्या हस्तलिखिताची लिपी जरी 'गुप्त ब्रह्मी' लिपी असली तरी भाषा नक्की कोणती होती ते हर्न्लेला नीट समजत नव्हते. पण त्याला ही माहिती मिळाली की बौद्ध धर्माचे बरेचसे साहित्य ब्रह्मी लिपीत आहे आणि ह्यासाठी त्याने बौद्ध धर्माचा अभ्यास सुरु केला.
असं मानतात की ई स पूर्व चौथ्या शतकात पाणिनीने वैदिक भाषेवरून संस्कृत भाषेचे नियम निश्चित केले. संस्कृत ह्या शब्दाचा अर्थच मुळी 'संपूर्णपणे बनलेली' / 'नियमांनी बांधलेली' असा होतो. गौतम बुद्धाचा काल पाणिनीच्याच आसपासचा मानतात. पण त्या काळी संस्कृत भाषा उच्चवर्णीयांची आणि कर्मकांडाची भाषा झाल्याने बुद्धाने त्याचे तत्त्वज्ञान सामान्यांच्या ब्रह्मी आणि पाली भाषांत सांगितले. पण काही वर्षांनंतर संस्कृत हीच सामान्यांची मुख्य प्रचलित भाषा बनली आणि त्यामुळे त्यावरून बौद्ध भिक्षूंनी त्यांची स्वतःची अशी संस्कृतोद्भव संकरीत भाषा बनवली. हे बॉवर मॅन्युस्क्रीप्टस ह्या संस्कृतोद्भव संकरीत भाषेत पण 'गुप्त ब्रह्मी' लिपीत लिहिलेले होते. चार वर्षे - होय - चार वर्षे अथक परिश्रम करून हर्न्लेने शेवटी शोधून काढले की ती लिपी आणि भाषा नेमकी कोणती होती! फक्त कल्पना करा चार वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर जेव्हा हर्न्लेला ह्याचा शोध लागला असेल तेव्हा त्याला किती अफाट आनंद झाला असेल! त्यानंतर पुढे बारा वर्षे बसून हर्न्लेने ते बॉवर मॅन्युस्क्रीप्टस इंग्रजीत भाषांतरित केले आणि त्याचे थोडे थोडे भाग दर दोन तीन वर्षांनी प्रकाशित केले. आयुष्यातली एकूण अठरा ते वीस वर्षे हर्न्लेने बॉवर मॅन्युस्क्रीप्टसवर खर्च केली.
हर्न्लेने हे पण सिद्ध केले की ती हस्तलिखिते ई स ६०० च्या आसपासच्या काळातली आहेत. त्या वेळेपर्यंत भारतात सापडलेली सर्वात जुनी कागदपत्रे हीच होती. लंडनमध्ये अनेक वर्तमानपत्रांत ह्याच्या बातम्या आल्या. (सध्याचे कार्बन डेटिंग तंत्र वापरून हे सिद्ध झाले आहे की ती हस्तलिखिते ई स ६५० च्या आसपासचीच आहेत. म्हणजे त्याचा अंदाज बरोबरच होता!) त्यामध्ये एकूण ७ खंड होते - २ ज्योतिषविषयक खंड होते, २ बौद्ध रीतीरिवाजविषयक खंड होते, आणि ३ पुरातन वैद्यकीय विषयक. दुर्दैवाने हे वैद्यकीय खंड अपूर्ण होते. जर ते का पूर्ण असते तर संपूर्ण जगातले सर्वात प्राचीन आणि सर्वसंपूर्ण असे ठरले असते. ह्या अपूर्ण खंडांमध्येपण भरपूर वैद्यकीय ज्ञान भरलेले होते - इतके की हर्न्लेच्या ह्या वैद्यकीय खंडांच्या भाषांतरांची दखल चक्क जून १८९५ च्या ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये पण "The Most Ancient Sanskrit Medical Treatise Extant" ह्या मथळयाने घेतली गेली. त्यातल्या भारतीय वैद्यकीय ज्ञानाने त्यांच्या इतकं 'पोटात दुखलं' की ह्या लेखाचा शेवट असा केला आहे - "No doubt many of the articles of the Hindu materia medica are of important therapeutic character and might with advantage be tested in hospitals; but a collection of complex farragos prescribed according to a fanciful and erroneous pathology is practically useless."
असं नक्की काय होतं त्या वैद्यकीय खंडांमध्ये? सुश्रुताचा आणि त्याच्या प्लॅस्टीक सर्जरीच्या पध्दतींचा ह्यात काही संदर्भ मिळाला का? १७९४ मध्ये पुण्यात त्या कुंभाराने वापरलेली पध्दत त्यात सांगितलेली होती का? पाहूया पुढच्या आणि शेवटच्या भागात!

शोध सुश्रुताचा - भाग ६
हर्न्लेने केलेल्या बॉवर मॅन्युस्क्रीप्टसच्या भाषांतराने जगभरात खळबळ उडवून दिली. जगभरातले पुरातत्त्वसंशोधक अजून नवीन काही हस्तलिखिते सापडतील ह्या आशेने मध्य आशियाकडे धाव घेऊ लागले. अनेकांना ती सापडली - पण बॉवर मॅन्युस्क्रीप्टस इतके महत्त्वाचे काहीही नव्हते. गौतम बुद्धानंतर बौद्ध धर्माचा प्रसार भारतात सुरु होऊन त्यानंतर प्रामुख्याने मध्य आशियातून युरोपकडे जाणाऱ्या पश्चिमेकडील खुश्कीच्या मार्गावरून (सिल्क रूट) होत गेला होता. बौद्ध धर्माला बरेच श्रीमंत व्यापारी अनुयायी म्हणून लाभले होते. त्यांनीच दिलेल्या धनामुळे मध्य आशियात बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी अनेक बौद्ध स्तूप, विहार, आणि बुद्धप्रतिमा (उदाहरण: अफगाणिस्थानमधील बामियानच्या बुद्ध मूर्ती - ज्या २००१ मध्ये तालिबानने तोडल्या!) बनवल्या गेल्या होत्या.
हे झाले थोडे विषयांतर. पुन्हा बॉवर मॅन्युस्क्रीप्टसकडे वळूया. मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे हर्न्लेने शोधून काढले की त्यांमध्ये एकूण ७ खंड होते: २ ज्योतिषविषयक, २ बौद्ध रीतीरिवाजविषयक, आणि ३ पुरातन वैद्यकीय विषयक. ह्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बॉवर मॅन्युस्क्रीप्टसच्या सुरुवातीला १० अश्या 'पवित्र' व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे की ज्या हिमालयाच्या परिसरात रहात होत्या आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत होत्या. ही नावे होती: अत्रेय, हरित, पराशर, भेल, गार्ग, संभव्य, वसिष्ठ, कारल, काप्य आणि - आणि - सुश्रुत! ह्यापुढे जाऊन हे जे ३ पुरातन वैद्यकीय खंड बॉवर मॅन्युस्क्रीप्टसमध्ये होते त्याचे लेखक होते: चरक, भेल, आणि - होय - सुश्रुत!
अश्याप्रकारे भारतातील एक ऋषीतुल्य व्यक्तीचे नाव एका ऐतिहासिक दस्तावेजात येण्याची जगातली ही पहिली वेळ होती. बॉवर मॅन्युस्क्रीप्टसचा कालखंड विज्ञानाच्या आधारे निश्चित करता येत होता आणि त्यामध्ये सुश्रुताचे नाव एक वैद्य म्हणून आल्याने हे निश्चित झाले की भारतीयांना कमीतकमी ईसवी सन ६५० मध्ये सुश्रुताच्या सुश्रुत संहितेबद्दल आणि त्यात सांगितलेल्या सर्जरी व प्लास्टिक सर्जरीबद्दल माहिती होती. मागील एका भागात दिलेल्या जेम्स बॉन्डच्या उदाहरणाप्रमाणे आपण अजूनही सुश्रुत खरा होता की नव्हता ह्याबद्दल ठामपणे सांगू शकत नाही. पण आपण हे म्हणू शकतो की ईसवी सन ६५० मध्ये कोणी एक सुश्रुत नावाची व्यक्ती वैद्यकीय शास्त्रज्ञ मानली जात होती आणि त्याच्या नावाने एक 'सुश्रुत संहिता' नावाचा ग्रंथ लिहिला गेला होता. कविराज कुंजलाल भिषगरत्न म्हणतात त्याप्रमाणे सुश्रुत संहितेचा काल ईसवी सन पूर्व ८०० असेलही कदाचित पण हाती असलेल्या पुराव्यांनी इतके नक्कीच म्हणता येते की ईसवी सन ६५० मध्ये आज माहित असलेली सुश्रुत संहिता नक्की माहित होती. ह्या सर्जरीच्या विषयावर लिहिले गेलेले आणि ह्यापेक्षा जुने असे दुसरे कोणतेही पुस्तक संपूर्ण जगात उपलब्ध नाही - त्यामुळे निश्चितच ही आपल्या भारतीयांसाठी मोठ्या गर्वाची गोष्ट आहे!
पण सुश्रुत संहिता खरच इतकी भारी आहे? का उगाच फक्त ती भारतीय आहे म्हणून मी तिचे गोडवे गातोय? माझे आयुर्वेदावरचे ज्ञान जवळपास शून्य आहे. पण इतक्या शतकांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ह्या ग्रंथात जे वैद्यकीय क्षेत्रासंबंधित ज्ञान संपादित केलेले आहे ते पाहून माझ्यासाख्या (थोडेफार फक्त इतिहास विषयाशिवाय इतर वाचन नसणाऱ्या) माणसाचेसुद्धा भान हरपून जायला होते. उदाहरणार्थ: ह्या संहितेत ७६ प्रकारचे डोळ्याचे रोग सांगितलेले आहेत - १२१ प्रकारच्या सर्जरीत वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचे उल्लेख आहेत - ४२ सर्जीकल प्रोसेसेसचे उल्लेख आहेत - आणि हे सर्व कमी आहे की काय म्हणून जवळपास ७०० विविध वनस्पतींचे त्यांच्या औषधी गुणानुसार ३७ विविध गटांमध्ये वर्गीकरण केलेले आहे! आणि हे सर्व - कविराजांचे मत ग्राह्य धरले तर २८०० वर्षांपूर्वी - किंवा हाती असलेल्या बॉवर मॅन्युस्क्रीप्टसचे वय लक्षात घेतले तर १४०० वर्षांपूर्वी!
आता एक अप्रुपाची गोष्ट. सुश्रुत संहितेच्या पहिल्या खंडातील - सूत्रस्थानमधील - सोळाव्या अध्यायात खालील श्लोक आहेत:
विश्लेषितायास्त्वथ नासिकाया वक्ष्यामि सन्धानविधिं यथावत् |
नासाप्रमाणं पृथिवीरुहाणां पत्रं गृहीत्वा त्ववलम्बि तस्य ||२७||
तेन प्रमाणेन हि गण्डपार्श्वादुत्कृत्य बद्धं त्वथ नासिकाग्रम् |
विलिख्य चाशु प्रतिसन्दधीत तत् साधुबन्धैर्भिषगप्रमत्तः ||२८||
सुसंहितं सम्यगतो यथावन्नाडीद्वयेनाभिसमीक्ष्य बद्ध्वा |
प्रोन्नम्य चैनामवचूर्णयेत्तु पतङ्गयष्टीमधुकाञ्जनैश्च ||२९||
सञ्छाद्य सम्यक् पिचुना सितेन तैलेन सिञ्चेदसकृत्तिलानाम् |
घृतं च पाय्यः स नरः सुजीर्णे स्निग्धो विरेच्यः स यथोपदेशम् ||३०||
रूढं च सन्धानमुपागतं स्यात्तदर्धशेषं तु पुनर्निकृन्तेत् |
हीनां पुनर्वर्धयितुं यतेत समां च कुर्यादतिवृद्धमांसाम् ||३१||
(भावार्थ: आता मी तुम्हाला कृत्रिम नाक जोडायची पद्धत सांगतो. सुरुवातीला झाडाचे एक पान घ्या जे नाकाच्या कापल्या गेलेल्या भागावर लांबीरुंदीने व्यवस्थित बसेल. हे माप घेऊन झाले की ह्या मापाने गालावर खूण करून घेऊन खालून वर सुरीने त्वचा कापून घावी. ही त्वचा संपूर्णपणे शरीरापासून वेगळी होऊ न देता नाकावर लावण्यात यावी. त्यानंतर थंड डोक्याच्या डॉक्टरने त्यावर एक विशिष्ट प्रकारची पट्टी (साधुबंद) बांधावी. डॉक्टरने हे पण पहावे की सर्व भाग व्यवस्थित चिकटले आहेत आणि त्यानंतर दोन नळ्या श्वासोच्छवासाठी आणि त्वचा खाली नाकात चिकटू नये म्हणून तेथे घाल्याव्यात.)
लागला क्लू? ओळखीची वाटतेय ही पद्धत? पहिल्या भागात आपण पाहिलेल्या कावसजीच्या ऑपरेशनशी ही पद्धत किती मिळतीजुळती आहे पहा - फक्त फरक इतकाच की त्या कुंभाराने कपाळावरची त्वचा वापरली आणि सुश्रुत गालावरची त्वचा वापरायला सांगतो - बस्स बाकी काही नाही! पण त्वचा वाळू न द्यायची 'ट्रीक' तीच आहे - की मूळ शरीरापासून ती वेगळी होऊ न देणे. कावसजीच्या आधी कमीतकमी १००० वर्षे ही पद्धत भारतात वापरली जात होती हे बॉवर मॅन्युस्क्रीप्टसमुळे सिद्ध झाले आणि हे जगन्मान्य आहे!
थोडंसं विषयांतर पण अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बॉवर मॅन्युस्क्रीप्टसमधली भाषा आणि लिपी त्या वेळच्या वापरल्या जाणाऱ्या सामान्यांच्या वापरातील होती. भारतात ज्ञानसाधना ही कोणत्याही आर्थिक किंवा सामाजिक वर्गाची मक्तेदारी नव्हती असाही ह्यातून निष्कर्ष काढता येतो. हेच ज्ञान परंपरागत पुढे गेले. १७९४ मध्येही त्या कुंभाराने चक्क सुश्रुत संहितेतील पध्दत वापरली ह्यात कोणालाही वावगं काही वाटलं नाही ह्यातूनही तेच अधोरेखित होते.
पुढे ह्या कावसजीबद्दलच्या लेखाने जगातली प्लास्टिक सर्जरीची दिशा खरंच बदलली. त्यादृष्टीने वेगवेगळे प्रयोग सुरु झाले. कावसजीचा लेख १७९४ मध्ये येउन गेल्यानंतर एक इंग्लिश सर्जन जोसेफ कॉन्स्टन्टाइन कार्प्यू (Carpue) हा सुश्रुताची कृत्रिम नाक बसवायची पद्धत लंडनमध्ये वापरू लागला. त्याने १८१४ आणि १८१५ मध्ये ह्या पद्धतीने दोन यशस्वी ऑपरेशन्स केली. ह्यावर त्याने १८१६ मध्ये 'An Account of two successful operations for restoring a lost nose from the integuments of the forehead' ह्या नावाने एक प्रबंधपण लिहिला. कार्प्यूच्या प्रबंधाचे १८१७ मध्ये कार्ल फर्डिनांड फॉन ग्रेफ (Graefe) ह्या जर्मन सर्जनने जर्मन भाषेत भाषांतर केले. त्यानंतर पुढे त्याने स्वतःचे एक पुस्तक लिहिले ज्याचे नाव होते ‘ऱ्हीनोप्लास्टिक' (Rhinoplastik). ह्या सर्जरीला 'प्लास्टिक' हे नाव सर्वात प्रथम त्याने वापरले. कार्प्यू आणि ग्रेफच्या कामाची युरोपात भरपूर प्रशंसा झाली. 'ऱ्हीनोप्लास्टी' ह्या कृत्रिम नाक बसवायच्या सर्जरीला खूप मागणी येऊ लागली. आधुनिक प्लास्टिक सर्जरीचा पाया जगात ह्या दोघांनी ऱ्हीनोप्लास्टीद्वारे घातला असे मानले जाते. कावसजीची गोष्ट खरी असो वा नसो - पण ह्याचे मूळ श्रेय सुश्रुताला आणि सुश्रुत संहितेला जाते हे मात्र त्रिवार सत्य आहे - म्हणूनच सुश्रुताला आणि सुश्रुत संहितेला 'Father of Plastic Surgery' आपण सर्व जगात छातीठोकपणे म्हणू शकतो!
समाप्त
- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut
फोटो: बॉवर मॅन्युस्क्रीप्टचा एक भाग
ता क: बॉवर मॅन्युस्क्रीप्टस सध्या कुठे आहेत? इंग्लंडमध्ये ऑक्सफर्डमध्ये - युनिवर्सिटी ऑफ ऑक्सफर्डच्या बॉडलिअन लायब्ररीत हर्न्लेची आठवण म्हणून ह्या जतन करून ठेवलेल्या आहेत. जर कुणी लंडनला येणार असेल तर मला नक्की सांगा, आपण बघायला जाऊया!
जिज्ञासूंना हर्न्लेने केलेले बॉवर मॅन्युस्क्रीप्टसचे भाषांतर येथे वाचायला मिळेल:https://archive.org/stream/TheBowerManuscript…
LikeShow more reactions
Comment
फोटो १: रशियाचा झार दुसरा निकोलस आणि इंग्लंडचा पाचवा जॉर्ज, हॅमिल्टन बॉवर
फोटो २: बॉवरला मिळालेली 'पोथी' आणि त्यातील अगम्य भाषा

LikeShow more reactions
Comment
फोटो: रॉबर्ट थोमचे सुप्रसिद्ध चित्र
Image may contain: 1 person, sitting

L